शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 21:31 IST

सन २०१६-१७ शैक्षणिक सत्रात माध्यमिक शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रीया होऊन तीन आठवडे उलटले.

ठळक मुद्देदिवाळी वेतनाविना : रूजू करून घेण्यास संस्थाचालकांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सन २०१६-१७ शैक्षणिक सत्रात माध्यमिक शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रीया होऊन तीन आठवडे उलटले. मात्र ३४ शिक्षकांनना संस्थाचालकांनी अजुनही रुजू न करून घेतल्याने ते अधांतरी लटकले आहेत. ऐन दिवाळीच्या काळात या ३४ शिक्षकांचे वेतन थांबविल्याने सदर शिक्षकांची दिवाळी अंधारात गेली.विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्याने सन २०१६-१७ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील ५० शिक्षक अतिरिक्त ठरले. मात्र जिल्ह्यातच १५० जागा रिक्त असल्याने सर्वांचे जिल्ह्यातच समायोजन होणार, यावर्षी कुणालाही वेतनाविना राहण्याची वेळ येणार नाही. अशी शिक्षकांची अपेक्षा होती. मात्र शिक्षण विभागाच्या नरम धोरणामुळे शिक्षकांची ही आशा फोल ठरली. शिक्षकांचे समायोजन करताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करणारे परिपत्रक शिक्षण संचालकांनी २५ सप्टेंबरला काढून सर्व शिक्षणाधिकाºयांना पाठविले. त्या पत्राच्या अनुषंगाने शिक्षणाधिकाºयांनी अतिरिक्त शिक्षकांच्या व रिक्त जागा असणाºया मुख्याध्यापकांना समायोजनाच्या दिवशी बोलाविले. परंतु रिक्त जागा अशणाºया शाळांचे अनेक मुख्याध्यापक हजरच झाले नाहीत. ५० पैैकी ४४ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. जिल्ह्यात एच.एससी.डी.एड् शिक्षकांच्या जागा रिक्त नसल्याने सहा शिक्षकांना विभागीय स्तरावरील समायोजनाची वाट पहावी लागणार आहे. मात्र समायोजन झालेल्या ४४ पैैकी केवळ १० शिक्षकांनाच संस्था चालकांनी रुजू करून घेतले. ३४ शिक्षकांना मूळच्या शाळेतून कार्यमुक्त करूनही समायोजीत शाळेत रुजू करून न घेतल्याने त्यांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन कोणत्याही शाळेमधून काढण्यात आले नाही. त्यामुळे या शिक्षकांची दिवाळी अंधारात गेली. मागील अनेक महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या समस्येवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्यात अद्याप पूर्णत: यश आले नाही.नियम धाब्यावरअतिरिक्त शिक्षकांना समायोजित शाळेने रुजू करून घेतल्याशिवाय मूळच्या शाळेतून कार्यमुक्त करू नये, असा शाळा सेवाशर्थीमध्ये नियम आहे. परंतु शिक्षण संचालकांनी हा नियम मोडीत काढून अतिरिक्त शिक्षकांना मूळच्या शाळेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे शिक्षकांचे वेतन कुठून काढावे, हा प्रश्न निर्माण झाला.