शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

शेतकऱ्यांना अतिरिक्त व्याजाच्या डागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:17 IST

जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळाने होरपळला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी कर्जपुनर्गठनाचे मृगजळ दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जपुनर्गठनातून शेतकºयावर अतिरिक्त व्याजाचा भार लादल्या जाणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळी उपाययोजनांचा फार्स : व्याजमाफी करून मिळावे नवीन पीक कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळाने होरपळला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी कर्जपुनर्गठनाचे मृगजळ दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जपुनर्गठनातून शेतकऱ्यावर अतिरिक्त व्याजाचा भार लादल्या जाणार आहे. शासनकर्ते बँकांच्या धार्जिने धोरण राबवून आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला कायमचेच दफनायला निघाल्याचे दिसून येते.सातत्याने जिल्ह्यात चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणातूनच हा दुष्काळ निश्चित झाला आहे. दुष्काळी उपाययोजनेच्या नावाखाली मात्र शेतकऱ्यांकडून अतिरिक्त व्याज दराची वसुली करण्याचा घाट शासनकर्त्यांनी घातला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१८-१९ या खरीप हंगामासाठी एक हजार १८६ कोटी पीक कर्जाची उचल केली आहे. आता या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकºयांना दुष्काळामुळे सवलत मिळाली आहे. मात्र पुनर्गठनाने शेतकºयांसमोरील समस्या वाढणार आहे. पुनर्गठन केल्यानंतर वाढीव मुदतीचे व्याजमाफ होणे अपेक्षित आहे. यावर प्रशासन चकारशब्द बोलायला तयार नाही. उलट दुष्काळात कर्जपुनर्गठन करून पुढील हंगामासाठी नव्याने कर्ज दिले जाईल. संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला दोन्ही वर्षाच्या पीक कर्जाची व्याजासह परतफेड करावी लागणार आहे. यातून पुन्हा शेतकरी कायमचाच कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापुढील हंगामासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जच मिळणार नाही. एकंदर शेतकऱ्यांला कायम अतिरिक्त व्याजाच्या चक्रव्युहात अडकवून राज्य शासन आपण शेतकऱ्यांसाठी फार उदार भूमिका घेऊन धोरण ठरवित असल्याचा देखावा करीत आहे.गत चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाचा सामना करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांची स्थिती आर्थिक दृष्ट्या हलाखीची झाली आहे. केवळ कर्जपुनर्गठन करून हा प्रश्न सुटणार नाही. त्याकरिता कर्जावरील व्याजही माफ करणे गरजेचे आहे. तसा प्रस्तावच शासनाकडे सादर करण्यात आला आहे.किशोर तिवारी,अध्यक्ष, स्वावलंबन मिशनयावर्षीची स्थिती पाहता राज्य शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र कर्जपुनर्गठन करून हा प्रश्न सुटणार नाही. अतिरिक्त व्याजाने शेतकऱ्यांना आणखीन आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जच माफ करावे.- मनीष जाधवस्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज