शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अतिरिक्त व्याजाच्या डागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:17 IST

जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळाने होरपळला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी कर्जपुनर्गठनाचे मृगजळ दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जपुनर्गठनातून शेतकºयावर अतिरिक्त व्याजाचा भार लादल्या जाणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळी उपाययोजनांचा फार्स : व्याजमाफी करून मिळावे नवीन पीक कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळाने होरपळला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी कर्जपुनर्गठनाचे मृगजळ दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जपुनर्गठनातून शेतकऱ्यावर अतिरिक्त व्याजाचा भार लादल्या जाणार आहे. शासनकर्ते बँकांच्या धार्जिने धोरण राबवून आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला कायमचेच दफनायला निघाल्याचे दिसून येते.सातत्याने जिल्ह्यात चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणातूनच हा दुष्काळ निश्चित झाला आहे. दुष्काळी उपाययोजनेच्या नावाखाली मात्र शेतकऱ्यांकडून अतिरिक्त व्याज दराची वसुली करण्याचा घाट शासनकर्त्यांनी घातला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१८-१९ या खरीप हंगामासाठी एक हजार १८६ कोटी पीक कर्जाची उचल केली आहे. आता या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकºयांना दुष्काळामुळे सवलत मिळाली आहे. मात्र पुनर्गठनाने शेतकºयांसमोरील समस्या वाढणार आहे. पुनर्गठन केल्यानंतर वाढीव मुदतीचे व्याजमाफ होणे अपेक्षित आहे. यावर प्रशासन चकारशब्द बोलायला तयार नाही. उलट दुष्काळात कर्जपुनर्गठन करून पुढील हंगामासाठी नव्याने कर्ज दिले जाईल. संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला दोन्ही वर्षाच्या पीक कर्जाची व्याजासह परतफेड करावी लागणार आहे. यातून पुन्हा शेतकरी कायमचाच कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापुढील हंगामासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जच मिळणार नाही. एकंदर शेतकऱ्यांला कायम अतिरिक्त व्याजाच्या चक्रव्युहात अडकवून राज्य शासन आपण शेतकऱ्यांसाठी फार उदार भूमिका घेऊन धोरण ठरवित असल्याचा देखावा करीत आहे.गत चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाचा सामना करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांची स्थिती आर्थिक दृष्ट्या हलाखीची झाली आहे. केवळ कर्जपुनर्गठन करून हा प्रश्न सुटणार नाही. त्याकरिता कर्जावरील व्याजही माफ करणे गरजेचे आहे. तसा प्रस्तावच शासनाकडे सादर करण्यात आला आहे.किशोर तिवारी,अध्यक्ष, स्वावलंबन मिशनयावर्षीची स्थिती पाहता राज्य शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र कर्जपुनर्गठन करून हा प्रश्न सुटणार नाही. अतिरिक्त व्याजाने शेतकऱ्यांना आणखीन आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जच माफ करावे.- मनीष जाधवस्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज