शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

माजी सरपंचासह पुसद तालुक्यात १६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बळींची संख्या २९ झाली आहे. सध्या १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.

ठळक मुद्देएका महिलेचा मृत्यू । कोरोना बाधितांची संख्या हजारांवर, १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. शनिवारी श्रीरामपूर येथील माजी सरपंचासह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सोबतच एका महिलेचा मृत्यू झाला. तूर्तास तालुक्यात १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून एकूण बाधितांची संख्या हजाराच्यावर पोहोचली आहे.गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बळींची संख्या २९ झाली आहे. सध्या १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. तालुक्याचा एकूण कोरोना बाधितांचा आकडा एक हजार ५३ वर पोहोचला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत ८३८ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.शहर आणि तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी ६७ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात १२ पॉझिटिव्ह तर ५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. याशिवाय १४१ नागरिकांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १३७ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. शहरातील वसंतनगर येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.पुसदसह उपविभागातील दिग्रस तालुक्यातही सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिग्रस तालुक्यातही आतापर्यंत कोरोनाने १७ नागरिकांचे बळी घेतले आहे. दिग्रस शहर व तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची भर पडत आहे. शनिवारी दुपारपर्यंत दिग्रस तालुक्यातील ११ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तत्पूर्वी शुक्रवारी दिग्रस शहरातील एक पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत असल्याने पुसद व दिग्रस या दोन्ही तालुक्यात प्रशासनाची तारांबळ उडत आहे. नागरिकांमध्ये धास्ती असली तरीही अनेक नागरिक बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसत आहे.साखळी तोडण्यासाठी ‘एसएमएस’चा अवलंबशहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी आता एसएमएसचा अवलंब करण्याची गरज आहे. एसएमएस अर्थात सोशल डिस्टन्सिंग मास्क व सॅनिटायझर वापराची त्रिसूत्री आहे. या त्रिसुत्रीने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासन वारंवार या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन करीत आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या नेतृत्वात प्रशासकीय यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या