शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

माजी सरपंचासह पुसद तालुक्यात १६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बळींची संख्या २९ झाली आहे. सध्या १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.

ठळक मुद्देएका महिलेचा मृत्यू । कोरोना बाधितांची संख्या हजारांवर, १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. शनिवारी श्रीरामपूर येथील माजी सरपंचासह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सोबतच एका महिलेचा मृत्यू झाला. तूर्तास तालुक्यात १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून एकूण बाधितांची संख्या हजाराच्यावर पोहोचली आहे.गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बळींची संख्या २९ झाली आहे. सध्या १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. तालुक्याचा एकूण कोरोना बाधितांचा आकडा एक हजार ५३ वर पोहोचला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत ८३८ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.शहर आणि तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी ६७ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात १२ पॉझिटिव्ह तर ५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. याशिवाय १४१ नागरिकांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १३७ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. शहरातील वसंतनगर येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.पुसदसह उपविभागातील दिग्रस तालुक्यातही सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिग्रस तालुक्यातही आतापर्यंत कोरोनाने १७ नागरिकांचे बळी घेतले आहे. दिग्रस शहर व तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची भर पडत आहे. शनिवारी दुपारपर्यंत दिग्रस तालुक्यातील ११ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तत्पूर्वी शुक्रवारी दिग्रस शहरातील एक पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत असल्याने पुसद व दिग्रस या दोन्ही तालुक्यात प्रशासनाची तारांबळ उडत आहे. नागरिकांमध्ये धास्ती असली तरीही अनेक नागरिक बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसत आहे.साखळी तोडण्यासाठी ‘एसएमएस’चा अवलंबशहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी आता एसएमएसचा अवलंब करण्याची गरज आहे. एसएमएस अर्थात सोशल डिस्टन्सिंग मास्क व सॅनिटायझर वापराची त्रिसूत्री आहे. या त्रिसुत्रीने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासन वारंवार या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन करीत आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या नेतृत्वात प्रशासकीय यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या