शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

माजी सरपंचासह पुसद तालुक्यात १६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बळींची संख्या २९ झाली आहे. सध्या १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.

ठळक मुद्देएका महिलेचा मृत्यू । कोरोना बाधितांची संख्या हजारांवर, १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. शनिवारी श्रीरामपूर येथील माजी सरपंचासह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सोबतच एका महिलेचा मृत्यू झाला. तूर्तास तालुक्यात १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून एकूण बाधितांची संख्या हजाराच्यावर पोहोचली आहे.गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बळींची संख्या २९ झाली आहे. सध्या १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. तालुक्याचा एकूण कोरोना बाधितांचा आकडा एक हजार ५३ वर पोहोचला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत ८३८ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.शहर आणि तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी ६७ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात १२ पॉझिटिव्ह तर ५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. याशिवाय १४१ नागरिकांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १३७ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. शहरातील वसंतनगर येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.पुसदसह उपविभागातील दिग्रस तालुक्यातही सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिग्रस तालुक्यातही आतापर्यंत कोरोनाने १७ नागरिकांचे बळी घेतले आहे. दिग्रस शहर व तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची भर पडत आहे. शनिवारी दुपारपर्यंत दिग्रस तालुक्यातील ११ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तत्पूर्वी शुक्रवारी दिग्रस शहरातील एक पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत असल्याने पुसद व दिग्रस या दोन्ही तालुक्यात प्रशासनाची तारांबळ उडत आहे. नागरिकांमध्ये धास्ती असली तरीही अनेक नागरिक बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसत आहे.साखळी तोडण्यासाठी ‘एसएमएस’चा अवलंबशहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी आता एसएमएसचा अवलंब करण्याची गरज आहे. एसएमएस अर्थात सोशल डिस्टन्सिंग मास्क व सॅनिटायझर वापराची त्रिसूत्री आहे. या त्रिसुत्रीने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासन वारंवार या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन करीत आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या नेतृत्वात प्रशासकीय यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या