शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उच्चशिक्षितांचा आदर्श विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:47 IST

विवाह सोहळ्यावर अनाठायी खर्च करु नये, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांनी वारंवार सांगितले. याच विचाराने प्रेरित उच्चशिक्षितांनी केलेला विवाह समाजासाठी आदर्श ठरला आहे.

आॅनलाईन लोकमतकळंब : विवाह सोहळ्यावर अनाठायी खर्च करु नये, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांनी वारंवार सांगितले. याच विचाराने प्रेरित उच्चशिक्षितांनी केलेला विवाह समाजासाठी आदर्श ठरला आहे.कळंब तालुक्याच्या चिंचोली या अतिशय छोट्या गावची रहिवासी असलेली चंदा पाचारे. तिची घरची परिस्थिती हलाखीची. सावरगाव येथील नेहरु विद्यालयात शिकत असताना तिची अभ्यासातील गती आणि बौध्दिक क्षमता पाहून शिक्षक मनोहर जुननकर, नाना गंडे, श्रीराम गावंडे यांनी तिला शिक्षणासाठी प्रेरीत केले. शेवटी तिचे प्रामाणिक प्रयत्न व चिकाटी कामी आली. दरम्यान ती यवतमाळ येथे वसतिगृहावर अधीक्षक म्हणून रुजू झाली.भोई समाजाच्या परिचय मेळाव्यात तिचा हनुमंत ठाकरे याच्याशी परिचय झाला. हनुमंत हा पुलगाव येथील सैनिक शाळेत नोकरीवर आहे. तोही जेमतेम परिस्थितीतून समोर आला. दुसऱ्याच्या घरी राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. राष्ट्रसंतांच्या विचार व कार्याने पे्ररित झालेला हा युवक. त्यामुळे दोघांनीही अतिशय साध्या पध्दतीने सातजन्माच्या गाठी बांधण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आपल्या घरच्या मंडळीशी चर्चा करुन जहागीरपूर येथे पुष्पहार घालून विवाह करण्याचा निर्णय घेतला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा आदर्शवत विवाह सोहळा पार पडला.