शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गाव गुजरीमध्ये स्मशानभूमी अभावी उभ्या पिकात करावे लागताहेत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

गावात स्मशानभूमी नसल्याने  शेतातील कपाशीचे उभे पीक कापून  म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. गावात ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी व जागा स्वतः शोधावी लागते. हे या आदर्श ग्राम गुजरी गावाचे वास्तव आहे. म्हातारीच्या वाट्याला आलेल्या एक एकर पिकाचा नायनाट करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गाव तेथे स्मशानभूमी असा शासनाचा उपक्रम असताना राळेगाव तालुक्यातील आदर्श ग्राम गुजरी  येथे ग्रामस्थांना उभ्या पिकात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.  स्वातंत्र्यानंतरही येथे स्मशानभूमीची व्यवस्था होऊ शकली नाही, हे दुर्भाग्य आहे. गुजरी येेेेथे १४ ऑगस्ट रोजी गावातील शेवंताबाई बापूराव वाघाडे (६५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना चार मुले असून तीन एकर शेत त्यांना सिलिंगचे मिळाले आहे. त्यातील दोन एकर शेत त्यांनी आपल्या मुलांच्या नावाने केले, उर्वरित एक एकर शेत स्वतःच्या नावावर ठेवले हाेते. गावात स्मशानभूमी नसल्याने  शेतातील कपाशीचे उभे पीक कापून  म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. गावात ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी व जागा स्वतः शोधावी लागते. हे या आदर्श ग्राम गुजरी गावाचे वास्तव आहे. म्हातारीच्या वाट्याला आलेल्या एक एकर पिकाचा नायनाट करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या समस्येबाबत ग्रामसेवक व सरपंचांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली. गट क्रमांक २९१ मधील झीरो ४० आर क्षेत्र स्मशानभूमीकरिता राखीव आहे. परंतु स्थानिक राजकारण व काही लोकांचा विरोध असल्यामुळे या जागेवर अनेक वर्षांपासून स्मशानभूमी उभारता आली नाही. तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतला ही जागा हस्तांतरित करण्यात आली. या जागेवर १३ ऑगस्टला स्मशानभूमीची राखीव जागा म्हणून फलक लावल्याचे ग्रामपंचायत  सदस्य अखिल धांडे यांनी सांगितले. स्मशानभूमीकरिता गावात राखीव जागा आहे. दोन वेळा निधी आला, परंतु जागा उपलब्ध न झाल्याने व गावातील राजकारणाने निधी परत गेल्याचे ग्रामसचिव विजया पाटील यांनी सांगितले. 

प्रशासनाचा कानाडोळा, राजकारण्यांचे दुर्लक्ष- आदर्श ग्राम गुजरी येथे गीताचार्य तुकाराम दादा यांनी भेट दिली आहे. या गावाने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेेत. त्यानंतरही येथील स्मशानभूमीची समस्या निकाली निघाली नाही. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना राजकारण्यांचे. त्यामुळेच ग्रामस्थांतून कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत