शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

आदर्श गाव गुजरीमध्ये स्मशानभूमी अभावी उभ्या पिकात करावे लागताहेत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

गावात स्मशानभूमी नसल्याने  शेतातील कपाशीचे उभे पीक कापून  म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. गावात ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी व जागा स्वतः शोधावी लागते. हे या आदर्श ग्राम गुजरी गावाचे वास्तव आहे. म्हातारीच्या वाट्याला आलेल्या एक एकर पिकाचा नायनाट करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गाव तेथे स्मशानभूमी असा शासनाचा उपक्रम असताना राळेगाव तालुक्यातील आदर्श ग्राम गुजरी  येथे ग्रामस्थांना उभ्या पिकात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.  स्वातंत्र्यानंतरही येथे स्मशानभूमीची व्यवस्था होऊ शकली नाही, हे दुर्भाग्य आहे. गुजरी येेेेथे १४ ऑगस्ट रोजी गावातील शेवंताबाई बापूराव वाघाडे (६५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना चार मुले असून तीन एकर शेत त्यांना सिलिंगचे मिळाले आहे. त्यातील दोन एकर शेत त्यांनी आपल्या मुलांच्या नावाने केले, उर्वरित एक एकर शेत स्वतःच्या नावावर ठेवले हाेते. गावात स्मशानभूमी नसल्याने  शेतातील कपाशीचे उभे पीक कापून  म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. गावात ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी व जागा स्वतः शोधावी लागते. हे या आदर्श ग्राम गुजरी गावाचे वास्तव आहे. म्हातारीच्या वाट्याला आलेल्या एक एकर पिकाचा नायनाट करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या समस्येबाबत ग्रामसेवक व सरपंचांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली. गट क्रमांक २९१ मधील झीरो ४० आर क्षेत्र स्मशानभूमीकरिता राखीव आहे. परंतु स्थानिक राजकारण व काही लोकांचा विरोध असल्यामुळे या जागेवर अनेक वर्षांपासून स्मशानभूमी उभारता आली नाही. तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतला ही जागा हस्तांतरित करण्यात आली. या जागेवर १३ ऑगस्टला स्मशानभूमीची राखीव जागा म्हणून फलक लावल्याचे ग्रामपंचायत  सदस्य अखिल धांडे यांनी सांगितले. स्मशानभूमीकरिता गावात राखीव जागा आहे. दोन वेळा निधी आला, परंतु जागा उपलब्ध न झाल्याने व गावातील राजकारणाने निधी परत गेल्याचे ग्रामसचिव विजया पाटील यांनी सांगितले. 

प्रशासनाचा कानाडोळा, राजकारण्यांचे दुर्लक्ष- आदर्श ग्राम गुजरी येथे गीताचार्य तुकाराम दादा यांनी भेट दिली आहे. या गावाने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेेत. त्यानंतरही येथील स्मशानभूमीची समस्या निकाली निघाली नाही. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना राजकारण्यांचे. त्यामुळेच ग्रामस्थांतून कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत