मुळावा : उमरखेड तालुक्यातील तरोडा येथे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामसभेत सत्ताधारी व विरोधकात हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांच्या ३१ जणांसह सरपंच व उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरोडा येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. रविवारी ग्रामसभा सुरू असताना शाब्दिक बाचाबाची झाली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांविरुद्ध तक्रारी नोंदविल्या. सरपंच सोनूताई गजानन कुरकुटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपसरपंच ओंकार चव्हाण, सुभाष जाधव, कैलास पवार, आनंद चव्हाण, मनोहर गायकवाड, प्रवीण गायकवाड, अरविंद गायकवाड, अनिल गायकवाड, कपिल गायकवाड, विश्वास चव्हाण, रोहिदास चव्हाण, रमेश फुलावे, राहुल फुलावे, संतोष चव्हाण व रामचंद्र गायकवाड सर्व रा. तरोडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.उपसरपंच ओंकार चव्हाण यांच्या तक्रारीवरून शिवाजी चव्हाण, कपिल चव्हाण, ओमप्रकाश चव्हाण, पंजाब ठाकरे, प्रवीण देवकर, संतोष ठाकरे, जनार्दन गिरी, अरविंद धुळे, गजानन कुरकुटे, भीमराव धुळे, रवींद्र धुळे, विजय राठोड, सरपंच सोनू कुरकुटे, कोमल जाधव, अनिता ठाकरे, अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा नोंदविला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, उपनिरीक्षक अरुण डोईफोडे हे पुढील तपास करीत आहे. (वार्ताहर)
तरोडाच्या ग्रामसभेत पाण्यावरून हाणामारी
By admin | Updated: May 3, 2016 02:54 IST