शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

बनावट राशन कार्ड आढल्यास कारवाई

By admin | Updated: August 15, 2015 02:36 IST

बनावट राशन कार्ड आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. लाखो राशनकार्ड धारकांना प्रत्येक महिन्यात स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो.

सचिंद्र प्रताप सिंह : जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरवठा विभागाचा आढावा, नियमित तपासणीचे अधिकाऱ्यांना निर्देश यवतमाळ : बनावट राशन कार्ड आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. लाखो राशनकार्ड धारकांना प्रत्येक महिन्यात स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या पुरवठा व्यवस्थेत शासकीय यंत्रणेसोबतच रास्तभाव दुकानादारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे दुकानदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता वाटपाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. पुरवठा विभागाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची गार्डन हॉल येथे बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुरवठ्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी गावकऱ्यांना मोबाईल एसएमएससह दक्षता समित्याच्या सदस्यांसमोरच धान्याची उचल व वाटप करण्याचे निर्देश पुन्हा त्यांनी बैठकीत दिले. पात्र नसताना ठिकठिकाणी अनेकांचा अन्नधान्य लाभाच्या यादीत समावेश असण्याची शक्यता आहे. रास्तभाव दुकानदारांनी पुढाकार घेऊन अशा व्यक्तींची नावे निदर्शनास आणून दिली पाहिजे. या व्यक्ती यादीतून वगळल्यास अन्य गरजू व्यक्तींना अन्नधान्याचा लाभ दिला जाऊ शकतो, असे जिल्हाधिकारी म्हणाले. पुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. काही व्यक्तींचा हस्तक्षेप किंवा दबाव असल्यास तसेही सांगावे. त्यानंतर मात्र पुरवठ्यात गैरप्रकार आढळल्यास क्षमा केली जाणार नाही. प्रत्येक वाटपाच्या किाणी वाटपासंदर्भात चार्ट लावण्यात यावा. नागरिकांना देण्यात येणाऱ्या अन्नधान्याची माहिती या चार्टमध्ये नमुद करावी, त्यामुळे वाटपात पारदर्शकता येईल. पुरवठा विभागाच्या कामात तसेच वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी रास्तभाव दुकानांची दर्जात्मक निरिक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या निरिक्षणामुळे पुरवठ्यातील त्रृट्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काही वेळा बोगस राशनकार्डव्दारे धान्याचे उचल होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी दुकानदारांचाही यात सहभाग असू शकतो, असे बोगस राशनकार्ड आढळल्यास संबंधित दुकान रद्द करण्यासोबतच अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गंत फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्या जाती, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राशनकार्डसाठी नागरिकांचे अर्ज असल्यास ते तातडीने निकाली काढा, अर्ज प्रलंबित राहू देऊ नका. लाभार्थ्यांचे राशनकार्ड त्यांच्याकडे असावे, काही ठिकाणी दुकानदारांकडे राशनकार्ड असल्याचा तक्रारी होत असतात. जिल्ह्यात असे होता काम नये, असे सांगून तालुकानिहाय कर्मचाऱ्यांच्या अडचणीही यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी समजून घेतल्या व सबंधितांना सूचना दिल्या. (प्रतिनिधी)