शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बनावट राशन कार्ड आढल्यास कारवाई

By admin | Updated: August 15, 2015 02:36 IST

बनावट राशन कार्ड आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. लाखो राशनकार्ड धारकांना प्रत्येक महिन्यात स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो.

सचिंद्र प्रताप सिंह : जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरवठा विभागाचा आढावा, नियमित तपासणीचे अधिकाऱ्यांना निर्देश यवतमाळ : बनावट राशन कार्ड आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. लाखो राशनकार्ड धारकांना प्रत्येक महिन्यात स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या पुरवठा व्यवस्थेत शासकीय यंत्रणेसोबतच रास्तभाव दुकानादारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे दुकानदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता वाटपाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. पुरवठा विभागाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची गार्डन हॉल येथे बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुरवठ्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी गावकऱ्यांना मोबाईल एसएमएससह दक्षता समित्याच्या सदस्यांसमोरच धान्याची उचल व वाटप करण्याचे निर्देश पुन्हा त्यांनी बैठकीत दिले. पात्र नसताना ठिकठिकाणी अनेकांचा अन्नधान्य लाभाच्या यादीत समावेश असण्याची शक्यता आहे. रास्तभाव दुकानदारांनी पुढाकार घेऊन अशा व्यक्तींची नावे निदर्शनास आणून दिली पाहिजे. या व्यक्ती यादीतून वगळल्यास अन्य गरजू व्यक्तींना अन्नधान्याचा लाभ दिला जाऊ शकतो, असे जिल्हाधिकारी म्हणाले. पुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. काही व्यक्तींचा हस्तक्षेप किंवा दबाव असल्यास तसेही सांगावे. त्यानंतर मात्र पुरवठ्यात गैरप्रकार आढळल्यास क्षमा केली जाणार नाही. प्रत्येक वाटपाच्या किाणी वाटपासंदर्भात चार्ट लावण्यात यावा. नागरिकांना देण्यात येणाऱ्या अन्नधान्याची माहिती या चार्टमध्ये नमुद करावी, त्यामुळे वाटपात पारदर्शकता येईल. पुरवठा विभागाच्या कामात तसेच वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी रास्तभाव दुकानांची दर्जात्मक निरिक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या निरिक्षणामुळे पुरवठ्यातील त्रृट्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काही वेळा बोगस राशनकार्डव्दारे धान्याचे उचल होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी दुकानदारांचाही यात सहभाग असू शकतो, असे बोगस राशनकार्ड आढळल्यास संबंधित दुकान रद्द करण्यासोबतच अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गंत फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्या जाती, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राशनकार्डसाठी नागरिकांचे अर्ज असल्यास ते तातडीने निकाली काढा, अर्ज प्रलंबित राहू देऊ नका. लाभार्थ्यांचे राशनकार्ड त्यांच्याकडे असावे, काही ठिकाणी दुकानदारांकडे राशनकार्ड असल्याचा तक्रारी होत असतात. जिल्ह्यात असे होता काम नये, असे सांगून तालुकानिहाय कर्मचाऱ्यांच्या अडचणीही यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी समजून घेतल्या व सबंधितांना सूचना दिल्या. (प्रतिनिधी)