शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

कोलडेपोंवरील कारवाई थंडबस्त्यात

By admin | Updated: August 14, 2016 00:52 IST

प्रदूषण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या येथील १५ कोलडेपोधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्र देऊन कोलडेपो बंद करण्याचे आदेश दिले...

पत्र देऊन ‘एमपीसीबी’ गप्प : वीज वितरणची कोलडेपोधारकांना नोटीस, वीज पुरवठा बंद होणार वणी : प्रदूषण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या येथील १५ कोलडेपोधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्र देऊन कोलडेपो बंद करण्याचे आदेश दिले खरे, पण आता ही कारवाई नेमकी करायची कुणी, असा प्रश्न स्थानिक प्रशासनाला पडला आहे. कोलडेपोधारकांना पत्र देऊन पंधरवडा उलटला. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येथे येऊन अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीने मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगण्यावरून संबंधित कोलडेपोधारकांना वीज पुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस बजावली आहे. मात्र संबंधित कोलडेपोधरकांचे ग्राहक क्रमांक शोधण्यातच वीज वितरण कंपनीचा वेळ जात आहे. २८ जुलैै रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वणी उपविभागीय कार्यालयामार्फत कोल डेपो संचालकांना कोलडेपो बंद करण्याबाबत पत्र दिले. बंद होणार असलेल्या कोलडेपोंमध्ये मनिष श्यामसुंदर बत्रा, चंदा अनिल लहरिया, प्रशांत प्रविण जैन, शब्बीर बेग जमिर बेग, हरिष देवकिशन भट्टड, सुनिल रामनारायण भट्टड, लिलाधर श्यामसुंदर अग्रवाल, गोविंद रामचंद्र मोदी, विजयकुमार गुलाबचंद चांडक, अशोक जगन्नाथ केला, महावीन कोल प्रा.लि., मातोश्री ट्रेडर्स, बाजोरिया ट्रेडिंग कार्पोरेशन, के.के.एंटरप्राईजेस, पुरूषोत्तम रामलख मालू यांच्या कोलडेपोचा समावेश आहे. कोलडेपोंसोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज वितरण कंपनीला पत्र देऊन संबंधित कोलडेपोंचा वीज पुरवठा बंद करण्याबाबत सूचना केली. तसेच ज्या ग्रामपंचायत हद्दीत हे कोलडेपो येतात, त्या ग्रामपंचायतींना या कोलडेपोंचा पाणी पुरवठादेखील बंद करण्याचे आदेश दिले. एवढ्याच कारवाईवर सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ थांबले आहे. कोलडेपोंना पत्र दिल्यानंतर महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रत्यक्ष येथे येऊन कोलडेपो बंद करण्याची कारवाई करतील, अशी अपेक्षा स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना होती. मात्र तसे न घडल्याने अधिकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत असलेली धिम्यागतीची कारवाई सामान्यांना बुचकळ्यात टाकणारी आहे. वणी- यवतमाळ मार्गावर असलेल्या या कोलडेपोंमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे. नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वारंवार सूचना देऊनही कोलडेपोधारकांकडून प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसते. (कार्यालय प्रतिनिधी)