शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोलडेपोंवरील कारवाई थंडबस्त्यात

By admin | Updated: August 14, 2016 00:52 IST

प्रदूषण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या येथील १५ कोलडेपोधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्र देऊन कोलडेपो बंद करण्याचे आदेश दिले...

पत्र देऊन ‘एमपीसीबी’ गप्प : वीज वितरणची कोलडेपोधारकांना नोटीस, वीज पुरवठा बंद होणार वणी : प्रदूषण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या येथील १५ कोलडेपोधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्र देऊन कोलडेपो बंद करण्याचे आदेश दिले खरे, पण आता ही कारवाई नेमकी करायची कुणी, असा प्रश्न स्थानिक प्रशासनाला पडला आहे. कोलडेपोधारकांना पत्र देऊन पंधरवडा उलटला. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येथे येऊन अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीने मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगण्यावरून संबंधित कोलडेपोधारकांना वीज पुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस बजावली आहे. मात्र संबंधित कोलडेपोधरकांचे ग्राहक क्रमांक शोधण्यातच वीज वितरण कंपनीचा वेळ जात आहे. २८ जुलैै रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वणी उपविभागीय कार्यालयामार्फत कोल डेपो संचालकांना कोलडेपो बंद करण्याबाबत पत्र दिले. बंद होणार असलेल्या कोलडेपोंमध्ये मनिष श्यामसुंदर बत्रा, चंदा अनिल लहरिया, प्रशांत प्रविण जैन, शब्बीर बेग जमिर बेग, हरिष देवकिशन भट्टड, सुनिल रामनारायण भट्टड, लिलाधर श्यामसुंदर अग्रवाल, गोविंद रामचंद्र मोदी, विजयकुमार गुलाबचंद चांडक, अशोक जगन्नाथ केला, महावीन कोल प्रा.लि., मातोश्री ट्रेडर्स, बाजोरिया ट्रेडिंग कार्पोरेशन, के.के.एंटरप्राईजेस, पुरूषोत्तम रामलख मालू यांच्या कोलडेपोचा समावेश आहे. कोलडेपोंसोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज वितरण कंपनीला पत्र देऊन संबंधित कोलडेपोंचा वीज पुरवठा बंद करण्याबाबत सूचना केली. तसेच ज्या ग्रामपंचायत हद्दीत हे कोलडेपो येतात, त्या ग्रामपंचायतींना या कोलडेपोंचा पाणी पुरवठादेखील बंद करण्याचे आदेश दिले. एवढ्याच कारवाईवर सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ थांबले आहे. कोलडेपोंना पत्र दिल्यानंतर महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रत्यक्ष येथे येऊन कोलडेपो बंद करण्याची कारवाई करतील, अशी अपेक्षा स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना होती. मात्र तसे न घडल्याने अधिकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत असलेली धिम्यागतीची कारवाई सामान्यांना बुचकळ्यात टाकणारी आहे. वणी- यवतमाळ मार्गावर असलेल्या या कोलडेपोंमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे. नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वारंवार सूचना देऊनही कोलडेपोधारकांकडून प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसते. (कार्यालय प्रतिनिधी)