शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील आरोपी सून ठाण्यातून पसार

By admin | Updated: July 16, 2014 00:27 IST

अंध सासऱ्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करणाऱ्या सुनेने मध्यरात्रीच्या सुमारास बिटरगाव पोलीस ठाण्यातून पोबारा केला. या प्रकाराने पोलिसांची पाचावर धारण बसली. रात्रीपासूनच शोध मोहीम सुरू झाली.

पोलिसांची दमछाक : आठ तासानंतर लागला छडा, सासऱ्याच्या खुनाचे प्रकरणढाणकी : अंध सासऱ्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करणाऱ्या सुनेने मध्यरात्रीच्या सुमारास बिटरगाव पोलीस ठाण्यातून पोबारा केला. या प्रकाराने पोलिसांची पाचावर धारण बसली. रात्रीपासूनच शोध मोहीम सुरू झाली. अखेर भोजनगर येथील नागरिकांच्या मदतीने तिला पकडण्यात यश आले आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. उमरखेड तालुक्यातील नारळी येथील पंचफुला गणेश राठोड या महिलेने सासरा वसराम धनसिंग राठोड यांचा गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून रविवारी रात्री खून केला. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला बांधून ठेवले. पोलिसांनी तिला अटक करून बिटरगाव पोलीस ठाण्यात आणले. सोमवारी न्यायालयापुढे हजर करून तीन दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली. ती बिटरगाव पोलिसांच्या कोठडीत असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लघूशंकेचे निमित्त केले. तिच्यावर निगराणी ठेवून असलेल्या एका महिला पोलीसासोबत ती ठाण्याच्या आवारात आली. परंतु काही कळायच्या आत पंचफुलाने महिला पोलिसाला गुंगारा दिला आणि तेथून पळ काढला. हा प्रकार तिने त्वरित ठाणेदार विजय राठोड यांना सांगितला. ठाणेदारांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यासह बिटरगाव परिसर रात्रीतून पिंजून काढला. इकडे पंचफुला भोजनगर तांड्यातील किसन जाधव यांच्या शेतात लपून बसली होती. तिला गजानन राठोड याने पाहिले. एव्हाना परिसरात पंचफुला पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची बातमी पसरली होती. त्यामुळेच गजाननला संशय येताच पंचफुलाला इतर महिलांसोबत निंदनाच्या कामात गुंतविले. तसेच ठाणेदार राठोड यांना पंचफुला भोजनगरमध्ये असल्याची माहिती दिली. राठोड यांनी तातडीने भोजनगर गाठून मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचफुलाला ठाण्यात आणले आणि सुटकेचा नि:श्वास सोडला.(वार्ताहर)ठाणेदाराची कानउघाडणीरात्रभर परिसर पिंजून काढल्यानंतरही आरोपी पंचफुला पोलिसांच्या हाती लागली नाही. या गंभीर घटनेची माहिती ठाणेदार विजय राठोड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना दूरध्वनीवरून दिली. या वेळी पोलीस अधीक्षक शर्मा त्यांच्यावर चांगलेच संतापले. एकतर कुठल्याही गंभीर गुन्ह्यातील आरोपी सहसा पोलिसांच्या हाती लागत नाही. नागरिक आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतात. तेव्हा त्यांना सांभाळताही येत नसल्याचे एसपी शर्मा म्हणाले. पंचफुला हाती न लागल्यास आपल्यावर कारवाई होईल, असा सज्जड दमही एसपी शर्मा यांनी ठाणेदार राठोड यांना दिला होता, अशी माहिती पोलिसातून देण्यात आली.