शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

उमरखेड तालुक्यात दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: July 16, 2016 02:36 IST

तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनात दोन तरुणांचा मृत्यू झाला. उमरखेड येथील आयटीआयमध्ये विजेच्या धक्क्याने

उमरखेड : तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनात दोन तरुणांचा मृत्यू झाला. उमरखेड येथील आयटीआयमध्ये विजेच्या धक्क्याने कामगार तरुणाचा तर दिंडाळा येथील एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. उमरखेड येथील आयटीआय कॉलेजच्या इमारतीवर नेमप्लेटचे काम करताना विजेचा धक्का लागून दिवाराम इराजी देवासी (२४) रा. डोंगरगाव, ता. बागोडा जि. जालोर (राजस्थान) जागीच ठार झाला. येथील बाळदी रोडवरील शासकीय औद्योगिक महाविद्यालयात तो नेमप्लेट बसविण्याचे काम शुक्रवारी करीत होता. त्याला विजेचा जबर धक्का लागल्याने तो ३० फूट उंच इमारतीवरुन खाली कोसळला आणि जागीच ठार झाला. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना उमरखेड तालुक्यातील दिंडाळा येथे घडली. गावानजीकच्या शेतातील विहिरीवर पोहायला गेलेल्या विशाल शरद जाधव (१५) याचा बुडून मृत्यू झाला. तो गुरूवारी दुपारी ११ वाजता गावानजीकच्या शेतातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. तो घरी परत आला नाही. म्हणून त्याचा शोध घेतला परंतु थांगपत्ता लागला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गावकऱ्यांनीही त्याचा विहिरीत शोध घेणे सुरू केले तेव्हा रात्री १० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)