शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांसाठी ‘एसीबी’चे जाळे

By admin | Updated: April 8, 2015 23:52 IST

गोरगरिबांना क्षुल्लक कामासाठी पैशाची मागणी करणाऱ्या लाचखोरांना जाळ्यात अडकविण्यासाठी अ‍ॅन्टी करप्शनने जिल्हाभर जाळे फेकले आहे.

दोघे निशाण्यावर : २१ आधीच जाळ्यात, आणखी ४८ ‘ट्रॅप’ची तयारीयवतमाळ : गोरगरिबांना क्षुल्लक कामासाठी पैशाची मागणी करणाऱ्या लाचखोरांना जाळ्यात अडकविण्यासाठी अ‍ॅन्टी करप्शनने जिल्हाभर जाळे फेकले आहे. या जाळ्यात दोन जण अलगद अडकण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी एसीबी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. लाचखोरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर (एसीबी) सोपविली आहे. त्यासाठी एसीबी तत्पर आहे. लाचखोरांना जाळ्यात ओढता यावे म्हणून एसीबीने आपल्या तत्परतेच्या माध्यमातून जाळे विणले आहे. सध्या शासनाचे दोन कर्मचारी एसीबीच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्याबाबत रितसर तक्रार पोहोचली आहे. त्यांनी लाच मागितल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाल्याची माहिती आहे. मात्र एसीबीला या दोनही कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडायचे आहे. म्हणून एसीबी आणखी काही दिवस प्रतीक्षा करण्याच्या मानसिकतेत आहे. सावध होऊन लाच स्वीकारली न गेल्यास एसीबी त्या दोनही कर्मचाऱ्यांवर लाच मागितल्याप्रकरणी कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. गेल्या काहीवर्षांपासून पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुमधडाक्यात कारवाई सुरू आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च या तीनच महिन्यात एसीबीने तब्बल १२ ट्रॅप यशस्वी केले असून त्यात २१ आरोपी आहेत. त्यामध्ये महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. एकट्या जानेवारी महिन्यात चार ट्रॅप यशस्वी झाले. फेब्रुवारीत दोन तर मार्चमध्ये पाच ट्रॅप केले गेले आहे. गृह, महसूल, जलसंपदा, शिक्षण, राज्य परिवहन या विभागाचे कर्मचारी लाच घेताना सापडले आहे. त्यात पोलीस शिपाई, वाहतूक निरीक्षक, मंडल अधिकारी, तलाठी, जमादार, मुख्याध्यापक, मजूर आदींचा समावेश आहे. आणखी ४८ ट्रॅपचे टार्गेट एसीबीपुढे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)६० लाचखोरांना पकडण्याचे उद्दिष्ट लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गेली कित्येक वर्ष केवळ दहा ते बारा जणांना वर्षभरात ट्रॅप केले जात होते. वर्षानुवर्षे गतवर्षीपेक्षा एखाद-दोन ट्रॅप जास्त करून एसीबीकडून खानापूर्ती केली जात होती. मात्र एसीबीला प्रवीण दीक्षित महासंचालक म्हणून रुजू झाले आणि या विभागाच्या कामाची गती कितीतरी पटीने वाढली. दीक्षित यांच्याकडून राज्यभराचा दररोज कामाचा अहवाल घेतला जाऊ लागला. त्यामुळे एसीबीत साईड ब्रँच म्हणून सुस्त झालेले पोलीस कर्मचारी अचानक (नाईलाजाने का होईना) चार्ज झाले. त्यांच्या कामाची गती वाढली. पर्यायाने कोण्या एका जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातच एका पाठोपाठ लाचखोरांवर ट्रॅप यशस्वी होऊ लागले. त्यांची संख्या वार्षिक दुपटीने वाढली. एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा विचार केल्यास पूर्वी येथे वर्षाचे १२ ते १४ ट्रॅप होत होते. महासंचालक प्रवीण दीक्षित आणि येथील उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या कार्यकाळात हा आकडा तिपटीने वाढून ४६ वर पोहोचला. आता सन २०१५ मध्ये किमान पाच डझन लाचखोरांना आपल्या जाळ्यात पकडण्याचे उद्दीष्ट एसीबीने ठेवले आहे. एसीबीमार्फत काही अपसंपदेच्या तक्रारींवरही कार्यवाही सुरू आहे. कुठे खुली तर कुठे गोपनीय चौकशी केली जात आहे. ‘तक्रार आली तरच कारवाई’चा पायंडा मोडणार कोण ?‘जो सापडला तो चोर आणि इतर साव’ या म्हणीप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही, हे सर्वश्रुत आहे. गोरगरीब जनतेचा थेट संबंध येणाऱ्या कार्यालयांमध्ये खुलेआम पैसे घेतले जात आहे. नागरिकांची लूट सुरू आहे. एसीबीपासूनही ही बाब लपलेली नाही. मात्र तक्रार आली तरच कारवाई अशी एसीबीची भूमिका आहे. एसीबी स्वत:हून कुणाविरुद्ध कारवाई करीत नाही, हे विशेष. त्यामुळे लाचखोरांविरुद्ध निर्भिडपणे पुढे येऊन एसीबीकडे तक्रारी करणे, त्यांना रंगेहात पकडून देणे हाच पर्याय आहे. यापूर्वी तर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर कारवाई होईलच याची हमी नव्हती. कारण अनेकदा तक्रार मिळताच संबंधिताला ‘अलर्ट’ दिला जात होता. त्यातूनच स्थानिक पथकांवर अविश्वास दर्शवून विभागीय कार्यालयाकडे थेट तक्रारी करण्याचे आणि लोकल पथकामार्फत ट्रॅप न करण्याची विनवणी तक्रारदाराकडून केली जात होती. मात्र हे प्रकार आता नियंत्रणात आहेत. ट्रॅपच्या वाढत्या संख्येमुळे एसीबीवरील नागरिकांचा विश्वासही वाढताना दिसतो आहे. त्यातूनच एसीबीकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.