शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

दारू दुकानांना ‘एक्साईज’चे अभय

By admin | Updated: March 6, 2017 01:23 IST

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची दारू दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

महेश पवार : जिल्हा दारूबंदीसाठी ८ मार्चपासून पुन्हा आंदोलनयवतमाळ : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची दारू दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक पराग नवलकर हे यातील काही दुकाने वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप स्वामिनी जिल्हा दारुमुक्ती अभियानाचे संयोजक महेश पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय, राजकीय नेत्यांचेही दारूविक्रेत्यांना अभय असून त्या विरोधात ८ मार्चपासून जिल्हाभर आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.१५ डिसेंबर २०१६ रोजी तामिळनाडू राज्य सरकार विरुद्ध के. बालू व इतर प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या दारू दुकानांबाबत जो निर्णय दिला, त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याची गरज आहे. या निर्णयानुसार, येत्या ३१ मार्चपर्यंत ही दारू दुकाने कायमस्वरुपी बंद करणे आवश्यक आहे. परंतु, उत्पादन शुल्क विभागाने आजवर महाराष्ट्रात एकाही दारू दुकानावर कारवाई केली नाही. उलट या दरम्यान काही दुकानांचे परवानेही नूतनीकरण करून देण्यात आल्याची शक्यता महेश पवार यांनी पत्रकार परिषदेत वर्तविली. महामार्गापासून ५०० मीटरच्या अंतरातील दारू दुकाने हटविण्याचा न्यायालयाचा आदेश आहे. मात्र, दुकानदार व काही राजकीय नेते संगनमत करून ही दुकाने दुसऱ्या जागेवर स्थानांतरित करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, असे झाल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. यवतमाळातून गेलेला राज्य मार्ग नगरपरिषद हद्दीत घेण्यासाठी एका रात्रीत फाईल तयार करून वरिष्ठांकडे पाठविण्यात आली. हे काम मंत्री, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्यच नाही. गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा दारूबंदीसाठी आंदोलन सुरू असताना एकाही राजकीय नेत्याने मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी पाठपुरावा केला नाही. मात्र तेच नेते आता दारू दुकाने वाचविण्यासाठी रात्रन्दिवस एक करीत असल्याचा आरोप महेश पवार यांनी केला. जिल्ह्यातील एकूण ५२५ पैकी ४५१ दारू दुकाने बंद होत आहे, असे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी आम्हाला सांगितले. मात्र, त्यांची यादी देण्यासाठी टाळाटाळ करीत असून उर्वरित दुकाने वाचविण्यासाठी ते माहिती दडवित असल्याचा आरोप महेश पवार यांनी केला. या पत्रकार परिषदेला कळंब तालुका संयोजक मनिषा काटे, शेखर सरकटे, नितीन सुरसकार, अशोक उम्रतकर, विनोद देवतळे, सारिका ताजने, योगेश राठोड, पियूष गाभ्रनी, रूपेश सावरकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)१४ टक्के दुकाने दारू पुरवणार का ?जिल्ह्यातील ८६ टक्के दारू दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करावी लागतील, असे उत्पादन शुल्कचे म्हणणे आहे. मग १४ टक्केच दुकाने का सुरू ठेवता, असा सवाल स्वामिनी अभियानाचे संयोजक महेश पवार यांनी उपस्थित केला. ही १४ टक्के दुकाने यापुढील काळात संपूर्ण जिल्हाभर दारू पुरविणार का? ५२५ पैकी ४५१ दुकाने बंद होत असतील उर्वरित दुकानेही बंद करून यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी घोषित करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठी ८ मार्चपासून प्रत्येक तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार असल्याचे पवार म्हणाले. ‘घुमवून फिरवून’ मोजले अंतरन्यायालयाच्या आदेशात दारू दुकाने कशी बंद करावी हे स्पष्ट आहे. महामार्गाच्या कडेपासून दारू दुकानाचे अंतर मोजायचे आहे. मात्र यवतमाळात अनेक ठिकाणी महामार्गाच्या मध्यबिंदूपासून मोजणी करण्यात आली. काही दुकानांच्या बाबतीत तर ‘घमवून फिरवून’ अंतर वाढविण्यात आले आहे. त्यामुळे दारू दुकाने वाचविण्यासाठी राजकीय नेते, जिल्हा प्रशासन, उत्पादन शुल्क यांचे संगनमत असल्याचे दिसून येते. ३१ मार्चपर्यंत ‘अ‍ॅडजस्टमेंट’ करायची असल्यानेच उत्पादन शुल्क दारू दुकानांची यादी दडवत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पवार यांनी केला.