शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

काँग्रेसवर बैठक रद्द करण्याची नामुष्की

By admin | Updated: January 17, 2015 00:11 IST

चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती यवतमाळच्या बैठकीतही होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ...

यवतमाळ : चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती यवतमाळच्या बैठकीतही होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी चक्क आपल्या गृहजिल्ह्यातील ही बैठकच रद्द केली. काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा जाहीर केला होता. त्यानुसार त्यांनी काही जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. १६ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक निश्चित करण्यात आली होती. त्या दृष्टीने जिल्हा काँग्रेस कमिटीने तयारीही केली होती. तत्पूर्वी १५ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. गटबाजीवरून ही बैठक चांगलीच गाजली. प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेण्याऐवजी खुद्द कार्यकर्तेच प्रदेशाध्यक्षांना धारेवर धरत असल्याचे विसंगत चित्र या बैठकीत पहायला मिळाले. प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीत गटबाजीला खतपाणी घातल्याचा, निष्ठावंतांना डावलून अन्य पक्षातील नवख्यांना महत्वाची पदे दिली गेल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. महिला पदाधिकाऱ्याने माणिकरावांच्या भाषणात सतत व्यत्यय आणला. चंद्रपूरची ही बैठक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. यवतमाळच्या बैठकीतही चंद्रपूरची पुनरावृत्ती होऊ शकते याची जाणीव माणिकरावांना झाली असावी म्हणून त्यांनी आपल्या गृहजिल्ह्यातील शुक्रवारची नियोजित बैठकच रद्द केली. कार्यकर्त्यांना शुक्रवारी सकाळी बैठक रद्दचे संदेश पाठविण्यात आले. चंद्रपूरच्या घटनेची पुनरावृत्ती करण्याची तयारी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी करून ठेवली होती. त्यांना केवळ बैठकीची प्रतीक्षा होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या अन्य नेत्यांनाही धारेवर धरण्याचा सामान्य कार्यकर्त्यांचा मनसुबा होता. मात्र बैठकच रद्द झाल्याने कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली. कार्यकर्त्यांचा सर्वाधिक रोष हा विधानसभा निवडणुकीत दारव्हा व यवतमाळ मतदारसंघात दिलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून होता. यवतमाळ मतदारसंघात अनेक जुने कार्यकर्ते असताना माणिकरावांनी ऐनवेळी मुलाला रिंगणात उतरविले. तर आपल्या गृहमतदारसंघातून स्वत: अथवा मुलाला लढविण्याऐवजी बंडखोराला उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. हाच रोष या नियोजित बैठकीत व्यक्त होणार होता. मात्र त्याच्या भीतीने ही बैठकच रद्द करून प्रदेशाध्यक्षांनी स्वत:च बचाव करून घेतला. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीतही माणिकरावांनी अनेक केवळ लेटर हेडपुरते दिसणाऱ्या कार्यकर्त्यांना नियुक्ती दिली. त्यांना बैठकांनाही बोलविले जात नाही. हे पदाधिकारीही पक्षाच्या लेटरहेडवरच खूश असल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)