शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

काँग्रेसवर बैठक रद्द करण्याची नामुष्की

By admin | Updated: January 17, 2015 00:11 IST

चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती यवतमाळच्या बैठकीतही होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ...

यवतमाळ : चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती यवतमाळच्या बैठकीतही होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी चक्क आपल्या गृहजिल्ह्यातील ही बैठकच रद्द केली. काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा जाहीर केला होता. त्यानुसार त्यांनी काही जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. १६ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक निश्चित करण्यात आली होती. त्या दृष्टीने जिल्हा काँग्रेस कमिटीने तयारीही केली होती. तत्पूर्वी १५ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. गटबाजीवरून ही बैठक चांगलीच गाजली. प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेण्याऐवजी खुद्द कार्यकर्तेच प्रदेशाध्यक्षांना धारेवर धरत असल्याचे विसंगत चित्र या बैठकीत पहायला मिळाले. प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीत गटबाजीला खतपाणी घातल्याचा, निष्ठावंतांना डावलून अन्य पक्षातील नवख्यांना महत्वाची पदे दिली गेल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. महिला पदाधिकाऱ्याने माणिकरावांच्या भाषणात सतत व्यत्यय आणला. चंद्रपूरची ही बैठक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. यवतमाळच्या बैठकीतही चंद्रपूरची पुनरावृत्ती होऊ शकते याची जाणीव माणिकरावांना झाली असावी म्हणून त्यांनी आपल्या गृहजिल्ह्यातील शुक्रवारची नियोजित बैठकच रद्द केली. कार्यकर्त्यांना शुक्रवारी सकाळी बैठक रद्दचे संदेश पाठविण्यात आले. चंद्रपूरच्या घटनेची पुनरावृत्ती करण्याची तयारी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी करून ठेवली होती. त्यांना केवळ बैठकीची प्रतीक्षा होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या अन्य नेत्यांनाही धारेवर धरण्याचा सामान्य कार्यकर्त्यांचा मनसुबा होता. मात्र बैठकच रद्द झाल्याने कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली. कार्यकर्त्यांचा सर्वाधिक रोष हा विधानसभा निवडणुकीत दारव्हा व यवतमाळ मतदारसंघात दिलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून होता. यवतमाळ मतदारसंघात अनेक जुने कार्यकर्ते असताना माणिकरावांनी ऐनवेळी मुलाला रिंगणात उतरविले. तर आपल्या गृहमतदारसंघातून स्वत: अथवा मुलाला लढविण्याऐवजी बंडखोराला उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. हाच रोष या नियोजित बैठकीत व्यक्त होणार होता. मात्र त्याच्या भीतीने ही बैठकच रद्द करून प्रदेशाध्यक्षांनी स्वत:च बचाव करून घेतला. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीतही माणिकरावांनी अनेक केवळ लेटर हेडपुरते दिसणाऱ्या कार्यकर्त्यांना नियुक्ती दिली. त्यांना बैठकांनाही बोलविले जात नाही. हे पदाधिकारीही पक्षाच्या लेटरहेडवरच खूश असल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)