शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचे वाजले बारा

By admin | Updated: July 11, 2014 00:30 IST

मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांच्या विकासाचे बारा वाजले आहे़

अण्णाभाऊ कचाटे - मारेगाव

मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांच्या विकासाचे बारा वाजले आहे़ उमरघाट, पेंंढरी आणि आंबेझरी ही तीन गावे मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात विखुरली आहेत. मात्र ती ना धड मारेगाव तालुक्यात आहेत, ना झरीजामणी तालुक्यात आहेत. तालुका एक आणि पंचायत समिती दुसरीच अशी या गावांची अवस्था झाली आही. तालुका आणि पंचायत समितीच्या वादात ही तीन गावे सापडल्याने त्यांचा विकासच खुंटला आहे. मारेगाव तालुक्याचे १९९२ मध्ये विभाजन होऊन झरीजामणी तालुक्याची निर्मिती झाली. तालुका विभाजनात उमरघाट व पेंढरी ही गावे मारेगाव तालुक्यात राहिली. आंबेझरी गाव झरीत समाविष्ट करण्यात आले़ त्यावेळी तहसीलचे विभाजन झाले, मात्र दोन्ही तालुक्यांसाठी एकच मारेगाव पंचायत समिती होती. झरीजामणी तालुका निर्मितीनंतर पाच वर्षांनी १९९७ मध्ये मारेगाव पंचायत समितीचेही विभाजन झाले. नवीन झरीजामणी पंचायत समिती निर्माण झाली. मात्र दोन पंचायत समिती होताच उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या गावांची खरी परवड सुरू झाली. पंचायत समिती विभाजनात मारेगाव तालुक्यातील उमरघाट आणि पेंढरी गावांना झरी पंचायत समितीमधील अनुक्रमे सुर्ला आणि सुसरी ग्रामपंचायतीमध्येच ठेवण्यात आले, तर झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी गावाला मारेगाव पंचायत समितीमधील सगनापूर ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आले. तेथूनच या तिनही गावांचा विकास रखडला़ पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मारेगाव तालुक्यातील उमरघाट व पेंढरीचे ग्रामस्थ झरीजामणी पंचायत समितीच्या गट व गणासाठी, तर झरीजामणी तालुक्यातील आंबेझरीचे मतदार मारेगाव पंचायत समितीच्या गट व गणासाठी मतदान करतात. ग्रामपंचायत निवडणुकीत मारेगाव तालुक्यातील उमरघाटचे मतदार झरी तालुक्यातील सुर्ला ग्रामपंचायतीसाठी, तर पेंढरीचे मतदार सुसरी ग्रामपंचायतीसाठी आणि झरीजामणी तालुक्यातील आंबेझरीचे मतदार मारेगाव तालुक्यातील सगनापूर ग्रामपंचायतीसाठी मतदान करतात़ ही तिनही गावे वणी विधानसभा आणि आता चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात येतात. तथापि आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींना या गावांची आठवण केवळ निवडणुकीपुरतीच होते. याबाबत नुकतेच गेल्या मार्चमध्ये ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून या तीन गावांची दैनावस्था मांडली होती. दोन तालुके आणि दोन पंचायत समितीच्या वादात या गावांचा विकास खुंटल्याचे त्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले होते. कोणत्या तहसीलकडे आणि पंचायत समितीकडे दाद मागावी, असा प्रश्न तेथील ग्रामस्थांना सतावत होता. या गावांना धड आरोग्य सेवाही मिळत नाही़ कृषी विभागाच्या योजनांचा लाभही मिळत नाही़ दोनही पंचायत समित्यांना विकास निधी परस्परांना वळता करावा लागतो़ आता गंभीर समस्येची दखल घेण्यात आली आहे. नुकतीच उपविभागीय अधिकाऱ्यांना या तीन गावांच्या बाबतीत विविध माहिती मागविण्यात आली आहे. त्यांनी येथील तहसीलदारांना पत्र देऊन या तीन गावांची वस्तुस्थिती मागविली आहे. त्यामुळे आता तरी या तीन गावांचा वनवास संपेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंचायत समिती आणि तालुका विभाजनाचे हे झेंगट दूर व्हावे, अशी अपेक्षा आहे़