शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

विकासाचे वाजले बारा

By admin | Updated: July 11, 2014 00:30 IST

मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांच्या विकासाचे बारा वाजले आहे़

अण्णाभाऊ कचाटे - मारेगाव

मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांच्या विकासाचे बारा वाजले आहे़ उमरघाट, पेंंढरी आणि आंबेझरी ही तीन गावे मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात विखुरली आहेत. मात्र ती ना धड मारेगाव तालुक्यात आहेत, ना झरीजामणी तालुक्यात आहेत. तालुका एक आणि पंचायत समिती दुसरीच अशी या गावांची अवस्था झाली आही. तालुका आणि पंचायत समितीच्या वादात ही तीन गावे सापडल्याने त्यांचा विकासच खुंटला आहे. मारेगाव तालुक्याचे १९९२ मध्ये विभाजन होऊन झरीजामणी तालुक्याची निर्मिती झाली. तालुका विभाजनात उमरघाट व पेंढरी ही गावे मारेगाव तालुक्यात राहिली. आंबेझरी गाव झरीत समाविष्ट करण्यात आले़ त्यावेळी तहसीलचे विभाजन झाले, मात्र दोन्ही तालुक्यांसाठी एकच मारेगाव पंचायत समिती होती. झरीजामणी तालुका निर्मितीनंतर पाच वर्षांनी १९९७ मध्ये मारेगाव पंचायत समितीचेही विभाजन झाले. नवीन झरीजामणी पंचायत समिती निर्माण झाली. मात्र दोन पंचायत समिती होताच उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या गावांची खरी परवड सुरू झाली. पंचायत समिती विभाजनात मारेगाव तालुक्यातील उमरघाट आणि पेंढरी गावांना झरी पंचायत समितीमधील अनुक्रमे सुर्ला आणि सुसरी ग्रामपंचायतीमध्येच ठेवण्यात आले, तर झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी गावाला मारेगाव पंचायत समितीमधील सगनापूर ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आले. तेथूनच या तिनही गावांचा विकास रखडला़ पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मारेगाव तालुक्यातील उमरघाट व पेंढरीचे ग्रामस्थ झरीजामणी पंचायत समितीच्या गट व गणासाठी, तर झरीजामणी तालुक्यातील आंबेझरीचे मतदार मारेगाव पंचायत समितीच्या गट व गणासाठी मतदान करतात. ग्रामपंचायत निवडणुकीत मारेगाव तालुक्यातील उमरघाटचे मतदार झरी तालुक्यातील सुर्ला ग्रामपंचायतीसाठी, तर पेंढरीचे मतदार सुसरी ग्रामपंचायतीसाठी आणि झरीजामणी तालुक्यातील आंबेझरीचे मतदार मारेगाव तालुक्यातील सगनापूर ग्रामपंचायतीसाठी मतदान करतात़ ही तिनही गावे वणी विधानसभा आणि आता चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात येतात. तथापि आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींना या गावांची आठवण केवळ निवडणुकीपुरतीच होते. याबाबत नुकतेच गेल्या मार्चमध्ये ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून या तीन गावांची दैनावस्था मांडली होती. दोन तालुके आणि दोन पंचायत समितीच्या वादात या गावांचा विकास खुंटल्याचे त्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले होते. कोणत्या तहसीलकडे आणि पंचायत समितीकडे दाद मागावी, असा प्रश्न तेथील ग्रामस्थांना सतावत होता. या गावांना धड आरोग्य सेवाही मिळत नाही़ कृषी विभागाच्या योजनांचा लाभही मिळत नाही़ दोनही पंचायत समित्यांना विकास निधी परस्परांना वळता करावा लागतो़ आता गंभीर समस्येची दखल घेण्यात आली आहे. नुकतीच उपविभागीय अधिकाऱ्यांना या तीन गावांच्या बाबतीत विविध माहिती मागविण्यात आली आहे. त्यांनी येथील तहसीलदारांना पत्र देऊन या तीन गावांची वस्तुस्थिती मागविली आहे. त्यामुळे आता तरी या तीन गावांचा वनवास संपेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंचायत समिती आणि तालुका विभाजनाचे हे झेंगट दूर व्हावे, अशी अपेक्षा आहे़