शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचे वाजले बारा

By admin | Updated: July 11, 2014 00:30 IST

मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांच्या विकासाचे बारा वाजले आहे़

अण्णाभाऊ कचाटे - मारेगाव

मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांच्या विकासाचे बारा वाजले आहे़ उमरघाट, पेंंढरी आणि आंबेझरी ही तीन गावे मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात विखुरली आहेत. मात्र ती ना धड मारेगाव तालुक्यात आहेत, ना झरीजामणी तालुक्यात आहेत. तालुका एक आणि पंचायत समिती दुसरीच अशी या गावांची अवस्था झाली आही. तालुका आणि पंचायत समितीच्या वादात ही तीन गावे सापडल्याने त्यांचा विकासच खुंटला आहे. मारेगाव तालुक्याचे १९९२ मध्ये विभाजन होऊन झरीजामणी तालुक्याची निर्मिती झाली. तालुका विभाजनात उमरघाट व पेंढरी ही गावे मारेगाव तालुक्यात राहिली. आंबेझरी गाव झरीत समाविष्ट करण्यात आले़ त्यावेळी तहसीलचे विभाजन झाले, मात्र दोन्ही तालुक्यांसाठी एकच मारेगाव पंचायत समिती होती. झरीजामणी तालुका निर्मितीनंतर पाच वर्षांनी १९९७ मध्ये मारेगाव पंचायत समितीचेही विभाजन झाले. नवीन झरीजामणी पंचायत समिती निर्माण झाली. मात्र दोन पंचायत समिती होताच उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या गावांची खरी परवड सुरू झाली. पंचायत समिती विभाजनात मारेगाव तालुक्यातील उमरघाट आणि पेंढरी गावांना झरी पंचायत समितीमधील अनुक्रमे सुर्ला आणि सुसरी ग्रामपंचायतीमध्येच ठेवण्यात आले, तर झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी गावाला मारेगाव पंचायत समितीमधील सगनापूर ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आले. तेथूनच या तिनही गावांचा विकास रखडला़ पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मारेगाव तालुक्यातील उमरघाट व पेंढरीचे ग्रामस्थ झरीजामणी पंचायत समितीच्या गट व गणासाठी, तर झरीजामणी तालुक्यातील आंबेझरीचे मतदार मारेगाव पंचायत समितीच्या गट व गणासाठी मतदान करतात. ग्रामपंचायत निवडणुकीत मारेगाव तालुक्यातील उमरघाटचे मतदार झरी तालुक्यातील सुर्ला ग्रामपंचायतीसाठी, तर पेंढरीचे मतदार सुसरी ग्रामपंचायतीसाठी आणि झरीजामणी तालुक्यातील आंबेझरीचे मतदार मारेगाव तालुक्यातील सगनापूर ग्रामपंचायतीसाठी मतदान करतात़ ही तिनही गावे वणी विधानसभा आणि आता चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात येतात. तथापि आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींना या गावांची आठवण केवळ निवडणुकीपुरतीच होते. याबाबत नुकतेच गेल्या मार्चमध्ये ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून या तीन गावांची दैनावस्था मांडली होती. दोन तालुके आणि दोन पंचायत समितीच्या वादात या गावांचा विकास खुंटल्याचे त्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले होते. कोणत्या तहसीलकडे आणि पंचायत समितीकडे दाद मागावी, असा प्रश्न तेथील ग्रामस्थांना सतावत होता. या गावांना धड आरोग्य सेवाही मिळत नाही़ कृषी विभागाच्या योजनांचा लाभही मिळत नाही़ दोनही पंचायत समित्यांना विकास निधी परस्परांना वळता करावा लागतो़ आता गंभीर समस्येची दखल घेण्यात आली आहे. नुकतीच उपविभागीय अधिकाऱ्यांना या तीन गावांच्या बाबतीत विविध माहिती मागविण्यात आली आहे. त्यांनी येथील तहसीलदारांना पत्र देऊन या तीन गावांची वस्तुस्थिती मागविली आहे. त्यामुळे आता तरी या तीन गावांचा वनवास संपेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंचायत समिती आणि तालुका विभाजनाचे हे झेंगट दूर व्हावे, अशी अपेक्षा आहे़