शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

जात पडताळणीची ७० टक्के प्रकरणे रक्तांच्या नातेवाईकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 07:00 IST

caste verification Yawatmal News जात प्रमाणपत्र पडताळणी समितीपुढे येणारी ७० टक्के प्रकरणे ही रक्ताच्या नातेवाईकांची राहत असून त्यांची समितीसमोरील हजेरी व दस्तऐवज तपासणी केवळ औपचारिकता ठरत असल्याचे निरीक्षण एका समितीने नोंदविले आहे.

ठळक मुद्देसमितीचे निरीक्षणजात प्रमाणपत्र वैधतेतील सुलभतेसाठी सुचविले बदल

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीपुढे येणारी ७० टक्के प्रकरणे ही रक्ताच्या नातेवाईकांची राहत असून त्यांची समितीसमोरील हजेरी व दस्तऐवज तपासणी केवळ औपचारिकता ठरत असल्याचे निरीक्षण एका समितीने नोंदविले आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काही सूचना या समितीने शासनाकडे पाठविल्या आहेत.

राज्यभरातील जात प्रमाणपत्र आणि त्याची पडताळणी सुलभ व्हावी, या माध्यमातून शासकीय यंत्रणेवरील कामाचा ताण कमी व्हावा आणि नागरिकांचा वेळ व पैसा वाचावा या उद्देशाने अमरावतीच्या जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी अलिकडेच शासनाला बदलाच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत.त्यानुसार, सद्यस्थितीत जात पडताळणी समितीकडे येणाऱ्या अर्जांपैकी सुमारे ७० टक्के अर्ज हे रक्तसंबंधातील व्यक्तीचे वैधता प्रमाणपत्र जोडलेले असतात. अशा प्रकरणात समितीसमोर हजेरी ही केवळ औपचारिक प्रक्रिया राहते.

मुंबई उच्च न्यायालयानेही मंगेश काशीद प्रकरणात हे निरीक्षण नोंदविले आहे. अशा प्रकरणात संबंधिताला पडताळणी समोर हजर न राहताही प्रकरण निकाली काढले जाऊ शकते. त्यासाठी नातेवाईकांना जात प्रमाणपत्र देताना त्यावरच पडताळणीचा उल्लेख करण्याची सूचना केली गेली आहे. कुणाची तक्रार असेल तरच असे प्रकरण समितीसमोर आणले जावे. यापूर्वी गैरसमज, अपुरे प्रशिक्षण, माहितीचा अभाव यामुळे चुकीने कुणाला वैधता दिली गेली असेल तर ती प्रकरणे पुनर्विचारासाठी समितीकडे आणली जाऊ शकतात. सध्या अशा प्रकरणात वेळ व पैसा खर्च करून थेट उच्च न्यायालयात जावे लागते.

मागासवर्गीयांनाच सर्वाधिक फटकामाधुरी पाटील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात नसल्याची बाबही पुढे आली आहे. सध्याच्या व्यवस्थेत अडचणींचा डोंगर आहे. त्याचा फटका मागासवर्गीयांनाच बसतो, असेही शासनाला पाठविलेल्या जात पडताळणी टिप्पणीत नमूद करण्यात आले आहे.

जात प्रमाणपत्र व पडताळणीसाठीही संघर्षकोणत्याही नागरिकाला आधी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यासाठी विविध मूळ दस्तऐवज जन्म झालेल्या तालुक्याच्या एसडीओंना द्यावे लागतात. त्यानंतर या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते. त्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पुन्हा मूळ दस्तऐवज देऊन समक्ष हजर रहावे लागते. त्यामुळे नागरिकांना शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास होतो.अर्जदाराच्या रक्ताच्या नातेवाईकांची जात वैधता प्रमाणपत्र तपासणी झाली असल्यास त्याला जात प्रमाणपत्र देतानाच त्यावर तसे नमूद करून दिलासा दिला जाऊ शकतो. हा बदल केल्यास शासकीय यंत्रणा व नागरिकांचाही त्रास वाचेल. शासकीय कामकाज सुकर होईल.- सुनील वारेउपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती पडताळणी समिती, अमरावती.