शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

६५० गाळेधारकांकडे अडीच कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 21:53 IST

नगरपरिषदेने शहरात विविध भागांत ६५० गाळे बांधून भाडेतत्त्वावर दिले आहे. मात्र, गाळेधारकच नगरपरिषदेवर शिरजोर झाले असून दहा वर्षांपासून सेवा करच भरला नाही. सेवा कर विभागाच्या आयुक्तांनी नगरपरिषदेवर सक्तीची वसुली लादली. दोन कोटी ७१ लाख ४१ हजारांचा सेवा कर भरावा लागणार आहे. पालिकेने नोटीसा बजावत ३१ जुलैचा अल्टीमेटम दिल्यावरही गाळेधारकांकडून अजिबात प्रतिसाद नाही.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषदेचा सेवाकर : नोटीस जारी, ३१ जुलैचा अल्टीमेटम, मात्र गाळेधारकांची मुजोरी कायम
<p>लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेने शहरात विविध भागांत ६५० गाळे बांधून भाडेतत्त्वावर दिले आहे. मात्र, गाळेधारकच नगरपरिषदेवर शिरजोर झाले असून दहा वर्षांपासून सेवा करच भरला नाही. सेवा कर विभागाच्या आयुक्तांनी नगरपरिषदेवर सक्तीची वसुली लादली. दोन कोटी ७१ लाख ४१ हजारांचा सेवा कर भरावा लागणार आहे. पालिकेने नोटीसा बजावत ३१ जुलैचा अल्टीमेटम दिल्यावरही गाळेधारकांकडून अजिबात प्रतिसाद नाही.नगरपरिषदेला दुकान भाडे आणि सेवा कर वसूल करावा लागतो. शहरातील ६५० दुकानदारांकडून २००८ पासून सेवा करच वसूल केला गेला नाही. मूळ ६९ लाख ४४ हजार ९५७ रुपये असलेला सेवा कर व्याज आणि दंड यामुळे पावणेतीन कोटीच्या घरात पोहोचला. नगरपालिका प्रतिसाद देत नसल्याने सेवा कर विभागीय आयुक्तांनी थेट पालिकेवर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस बजावली. यानंतर पालिका प्रशासनाने तत्काळ न्यायालयात धाव घेऊन सेवा करात लावण्यात आलेला दंड, व्याज व विलंब शुल्क कमी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. यावर अजून निर्णय लागायचा आहे. सोबतच नगरपरिषद बाजार विभागाने गाळेधारकांना नोटीस बजावून ३१ जुलैची मुदत दिली. यानंतर सेवा कर भरणाऱ्यांवर अतिरिक्त दंड आकारला जाईल, असा इशाराही दिला. मात्र यालाही गाळेधारक जुमानत नसल्याचे दिसून येते. ३० जुलैपर्यंत केवळ तीन ते चार जणांनीच सेवा कराचा भरणा केला. गाळेधारक पालिका प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून येते. आता ३१ जुलैनंतर सेवा कराच्या वसुलीसाठी बाजार विभाग कुठली शक्कल लढवतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा आर्थिक संकटातील नगरपरिषदेवर स्वत:च्या गंगाजळीतून पावणेतीन कोटींचा सेवा कर जमा करावा लागण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.आठवडीबाजारातील गाळ्यांना प्रतिसाद नाहीनगरपरिषदेने आठवडीबाजार परिसरात संकुल बांधून ४० गाळे काढले. या गाळ्यांचा लिलाव करण्यात आला. त्यात ४० जणांची निवड झाली. आता अनामत रक्कम जमा करून गाळ्यांचा ताबा घेण्यासाठी कुणीच पुढे येताना दिसत नाही. नगरपरिषदेने दरमहा ठरविलेल्या भाड्यानुसार वर्षभराचे भाडे अनामत रक्कम म्हणून मागितले आहे. त्याचा भरणा करण्यासाठी चार महिन्यांपासून स्मरणपत्र दिले जात आहे. पण प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता निविदा अनामत रक्कम जप्तीची कारवाई केली जाणार आहे.