शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

अबब...धनगरवाडीत मुलांनी राबविली निवडणूक प्रक्रिया; अन् मुलांनीच निवडला मुलांसाठी सरपंच

By विलास गावंडे | Updated: September 15, 2023 18:20 IST

गजानन अक्कलवार कळंब : आजच्या निवडणूकीमध्ये अनेकदा चुकीचे लोकप्रतिनिधी निर्वाचित होतात. त्यामुळे नागरिकांच्या मुलभूत समस्या जैसे-थेच राहतात. बरेचदा निवडलेल्या ...

गजानन अक्कलवारकळंब : आजच्या निवडणूकीमध्ये अनेकदा चुकीचे लोकप्रतिनिधी निर्वाचित होतात. त्यामुळे नागरिकांच्या मुलभूत समस्या जैसे-थेच राहतात. बरेचदा निवडलेल्या चुकीचा लोकप्रतिनिधीमुळे नागरिकांवर पश्चाताप करण्याची वेळ येते. यावर मात करण्यासाठी आतापासूनच शाळकरी मुलांना निवडणूक व त्याचे महत्व कळावे यासाठी धनगरवाडीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. एवढेच नाही तर मुलांनी मुलांसाठी लोकशाही पध्दतीने सरपंच आणि उपसरपंचाची निवडही केली.      आपला भारत देश लोकशाहीप्रधान आहे. निवडणूक ही या लोकशाहीची अविभाज्य महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे मुलांना आतापासूनच निवडणूक प्रक्रिया समजावी, यासाठी धनगरवाडीच्या बालगरीत बालग्रामसभेत सरपंच आणि उपसरपंच निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. दीपक कांबळे यांना ९२ पैकी ५१ मते मिळाली. त्यामुळे त्यांना सरपंच तर मोहन जाधव याला उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले.    मतदान म्हणजे काय? मतदान कसे आणि कोणाला केले जाते. मतदान करताना कुठल्या बाजू लक्षात घेतल्या पाहिजे. निवडून येणाºया लोकप्रतिनिधींच्या काय जबाबदाºया असतात. याची माहीती मुलांना देण्यात आली. बालनगरीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची जबाबदारी योग्य पध्दतीने कोण हाताळणार याविषयी चर्चा करण्यात आली. सुरुवातीला दहा नावे पुढे आली. त्यानंतर पाच नावे अंतीम करण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी काय पात्रता असावी, हेसूध्दा मुलांनीच ठरविले. उमेदवार ठरल्यानंतर त्यांना शैक्षणिक स्वरुपातील निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आली. त्यानंतर खºया अर्थाने प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झाली. काही दिवस हा प्रचार चालला.      निवडणूकीच्या दिवशी मताधिकार बजावण्यासाठी मुले गोळा झाली. गावातील नागरिकही या प्रक्रियेत सहभागी झाले. मतदान करताना यादीत नाव कसे शोधायचे. आपले ओखळपत्र दाखवावे लागते. बोटाला शाई लावावी लागते. आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या चिट्टीवर शिक्का अथवा बटन दाबून मतदान करावे लागते. मतदान कोणाला केले हे सांगायचे नसते. याची माहीती विद्यार्थ्यांना दिल्यानंतर त्यांनी ही प्रक्रिया बॅलेट पेपरवर स्वत: राबविली.     मतमोजणीची प्रक्रिया गावातील मोठ्या मंडळीच्या पुढाकारातून पार पडली. विजयी उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले. जिंकलेल्या मुलाच्या नावाची घोषणा होताच मुलांनी  मोठा जल्लोष केला. जिंकुन आलेल्या आपल्या सहकाºयांना गुलाल लावून, फेटा घालून, ताशा वाजवित गावातील नंदूभाऊच्या सायकलवर रॅली काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला. मतदान प्रक्रिया नेमकी कशी असते आणि त्याचे महत्व विषद करण्यासाठी या वास्तववादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा प्रत्यय मुलांना आला. यासाठी प्रणाली जाधव, धम्मानंद बोंदाडे यांचा पुढाकार होता.