शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या ९७ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

जून महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु नंतर पावसाने दडी मारली. मात्र पुन्हा वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळला. त्यात शेतकºयांनी पेरण्या उरकल्या. मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. त्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या सहा हजारांवर तक्रारी आहेत. त्यापैकी केवळ एक हजार शेतकऱ्यांना कंपन्यांनी बियाणे बदलवून दिले आहे.

ठळक मुद्देबोगस सोयाबीन बियाण्यांचा हजारो शेतकऱ्यांना फटका, दुबार पेरणीसाठी उधारीवर आणले बियाणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस सोयाबीन बियाण्यांच्या सावटात जिल्ह्यातील खरिपाच्या ९७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. बियाणे बोगस निघाल्याने दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे खरेदी करावे लागले.जून महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु नंतर पावसाने दडी मारली. मात्र पुन्हा वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळला. त्यात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. त्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या सहा हजारांवर तक्रारी आहेत. त्यापैकी केवळ एक हजार शेतकऱ्यांना कंपन्यांनी बियाणे बदलवून दिले आहे. मात्र पाच हजार शेतकरी पंचनामे होऊनही अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. कंपन्यांकडून तत्काळ बियाणे बदलवून देण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे पाहून अखेर काही शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले तर काहींना नाईलाजाने कृषी केंद्रांमधून उधारीवर बियाणे दुबार पेरणीसाठी घ्यावे लागले. कृषी केंद्रांनीही मग आपल्याकडून पडून असलेल्या बियाण्यांच्या बॅग उधारीत शेतकऱ्यांच्या माथी मारल्या. आता हे बियाणेसुद्धा उगवते की नाही याबाबत शेतकरी साशंक आहेत. आतापर्यंत ९७ टक्के पेरण्या आटोपल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. आणखी तीन टक्के पेरण्या बाकीच आहेत. कदाचित बियाणे कंपन्यांकडून सोयाबीनचे बियाणे बदलवून मिळेल या प्रतीक्षेत हे तीन टक्के शेतकरी थांबले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूणच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाण्यांचा चांगलाच फटका बसला. जेवढ्या तक्रारी दाखल झाल्या त्यापेक्षा कितीतरी अधिक पट शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यवतमाळातील ठोक बियाणे विक्रेत्यांनी सुरुवातीला कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने सोयाबीन बियाणे विकले तर येथील शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणे दुसऱ्या जिल्ह्यात परस्परच विकले गेले. ठोक विक्रेत्यांनी निर्माण केलेल्या कृत्रिम टंचाईपासूनच जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीला जणू ग्रहण लागले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या झालेल्या नुकसानीसाठी बियाणे कंपन्यांसोबतच यवतमाळातील ठोक विक्रेते आणि त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकरी दोषी मानत आहे.यवतमाळच्या हक्काचा १५०० मेट्रिक टन युरिया पुन्हा पळविलायवतमाळ जिल्ह्याच्या हक्काचा १४०० मेट्रिक टन युरिया नांदेड व धामणगावच्या रॅक पॉईंटवरून पळविल्याचे उदाहरण ताजे असताना शुक्रवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. धामणगावच्या रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्यासाठी २४०० मेट्रिक टन युरिया आला होता. परंतु त्यातील एक हजार मेट्रिक टन अमरावतीने तर ५०० मेट्रिक टन युरिया वर्धेने रॅक पॉईंटवरूनच पळविला. यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला अवघा ९०० मेट्रिक टन युरिया आला. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा युरियासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती