शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हक्काच्या घरकुलासाठी ९५२ कुटुंब १७ वर्षांपासून प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST

प्रकाश सातघरे दिग्रस : १७ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी मध्यरात्री पुसद मार्गावरील नांदगव्हाण धरणाचा सांडवा अचानक फुटला. यामुळे ...

प्रकाश सातघरे

दिग्रस : १७ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी मध्यरात्री पुसद मार्गावरील नांदगव्हाण धरणाचा सांडवा अचानक फुटला. यामुळे धावंडा नदीची पाणी पातळी वाढून महापूर आला होता. त्यात १४ निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते. ९५२ कुटुंब बाधित झाले होते. त्या सर्वांना अद्याप घरकुलाची प्रतीक्षा आहे.

महापुरात संजय पांडुरंग सोनोने, त्यांची पत्नी मीना, मुलगी भाग्यश्री व तेजस्विनी, मुलगा वैभव असे एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. याशिवाय शशिकला नवरे, वासुदेव नवरे, शांता शिंदे, बाली शिंदे, श्याम पाचंगे, दिवाकर शेलकर, पंचीबाई राठोड, प्रभाकर विलायते व स्वाती विलायते असे एकूण १४ जण वाहून गेले होते. मध्यरात्री अचानक आलेल्या महापुरात कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानीसह १४ जणांचे निष्पाप बळी गेले होते.

महापुरात अनेक घरे जमीनदोस्त झाली. पुरानंतर शासन, विविध सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी मलमपट्टी केली. मात्र अनेकांना अद्यापही हक्काचे घरकुल मिळाले नाही. महापुरानंतर प्रशासनाने सर्वेक्षण करून ९५२ कुटुंबांच्या घरकुलासाठी २२ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातून शहरातील भवानी माता मंदिर मार्गावर ९५२ घरांसाठी जागा घेऊन घरकुल बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. तेथे अंदाजे ४३० घरे बांधण्यात आली. मात्र, कमिशन खोरीमुळे अर्धवट व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याने आज ते घरकुल जीर्ण अवस्थेत आहेत. लाभार्थी त्या ठिकाणी वास्तव्य करू शकत नाही.

बॉक्स

पूरग्रस्तांमध्ये अद्याप दहशतीचे वातावरण कायम

१७ वर्षांपासून धावंडा नदीकाठी ९५२ घरकुल लाभार्थी मोडक्या झोपड्यात संसार थाटून आहेेत. या परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत. सांडपाणी साचले आहे. विजेची सुविधा नाही. त्यामुळे रात्री अंधार असतो. या परिसरात कोणत्याच नागरी सुविधा नाही. याकडे प्रशासन कधी लक्ष देणार, असा प्रश्न आहे. ९ जुलै २००५नंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी मुसळधार पावसामुळे धानंडा नदीला पूर आल्याने तेथील नागरिकांचे नुकसान झाले होते. आजही पावसाळ्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते.