शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हक्काच्या घरकुलासाठी ९५२ कुटुंब १७ वर्षांपासून प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST

प्रकाश सातघरे दिग्रस : १७ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी मध्यरात्री पुसद मार्गावरील नांदगव्हाण धरणाचा सांडवा अचानक फुटला. यामुळे ...

प्रकाश सातघरे

दिग्रस : १७ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी मध्यरात्री पुसद मार्गावरील नांदगव्हाण धरणाचा सांडवा अचानक फुटला. यामुळे धावंडा नदीची पाणी पातळी वाढून महापूर आला होता. त्यात १४ निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते. ९५२ कुटुंब बाधित झाले होते. त्या सर्वांना अद्याप घरकुलाची प्रतीक्षा आहे.

महापुरात संजय पांडुरंग सोनोने, त्यांची पत्नी मीना, मुलगी भाग्यश्री व तेजस्विनी, मुलगा वैभव असे एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. याशिवाय शशिकला नवरे, वासुदेव नवरे, शांता शिंदे, बाली शिंदे, श्याम पाचंगे, दिवाकर शेलकर, पंचीबाई राठोड, प्रभाकर विलायते व स्वाती विलायते असे एकूण १४ जण वाहून गेले होते. मध्यरात्री अचानक आलेल्या महापुरात कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानीसह १४ जणांचे निष्पाप बळी गेले होते.

महापुरात अनेक घरे जमीनदोस्त झाली. पुरानंतर शासन, विविध सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी मलमपट्टी केली. मात्र अनेकांना अद्यापही हक्काचे घरकुल मिळाले नाही. महापुरानंतर प्रशासनाने सर्वेक्षण करून ९५२ कुटुंबांच्या घरकुलासाठी २२ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातून शहरातील भवानी माता मंदिर मार्गावर ९५२ घरांसाठी जागा घेऊन घरकुल बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. तेथे अंदाजे ४३० घरे बांधण्यात आली. मात्र, कमिशन खोरीमुळे अर्धवट व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याने आज ते घरकुल जीर्ण अवस्थेत आहेत. लाभार्थी त्या ठिकाणी वास्तव्य करू शकत नाही.

बॉक्स

पूरग्रस्तांमध्ये अद्याप दहशतीचे वातावरण कायम

१७ वर्षांपासून धावंडा नदीकाठी ९५२ घरकुल लाभार्थी मोडक्या झोपड्यात संसार थाटून आहेेत. या परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत. सांडपाणी साचले आहे. विजेची सुविधा नाही. त्यामुळे रात्री अंधार असतो. या परिसरात कोणत्याच नागरी सुविधा नाही. याकडे प्रशासन कधी लक्ष देणार, असा प्रश्न आहे. ९ जुलै २००५नंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी मुसळधार पावसामुळे धानंडा नदीला पूर आल्याने तेथील नागरिकांचे नुकसान झाले होते. आजही पावसाळ्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते.