शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

९३५ कोटी थकबाकीतून केवळ पाच कोटी वसूल

By admin | Updated: January 23, 2017 00:59 IST

नोटाबंदी, सततचा दुष्काळ आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळे जिल्हा बँकेची कर्ज वसुली ठप्प झाली आहे.

जिल्हा बँक चिंतेत : नोटाबंदी, दुष्काळी स्थिती कारणीभूत यवतमाळ : नोटाबंदी, सततचा दुष्काळ आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळे जिल्हा बँकेची कर्ज वसुली ठप्प झाली आहे. थकीत आणि चालू असे ९३५ कोटी रुपये शेतकऱ्यांकडे थकीत असताना आतापर्यंत केवळ पाच कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. यामुळे जिल्हा बँक चिंतेत पडली असून वसुली कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. राष्ट्रीयकृत बँकांच्या दुप्पटीने शेतकऱ्यांंना कर्जाचे वितरण केले जाते. दरवर्षी या बँकेची वसुली समाधानकारक असते. परंतु यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटाबंदी निर्णयाने जिल्हा बँक अडचणीत आली. या बँकेला नोटाबंदीत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलवून देण्यास बंदी होती, ती आजही कायम आहे. तसेच नवीन नोटाही या बँकेला महिनाभरानंतर मिळाल्या. त्यामुळे या बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. गतवर्षी जिल्हा बँकेने ४३५ कोटी रुपयांच्या खरीप पीक कर्जाचे वाटप केले होते. तर ५३४ कोटी रुपये आतापर्यंतचे थकीत आहे. दोनही मिळून हा आकडा ९३५ कोटींवर जाऊन पोहोचला. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीची आशा होती. परंतु बाजारात शेतमालाचे भाव गडगडले. परिणामी जिल्हा बँकेला वसुली करणे कठीण झाले आहे. दुसरीकडे उत्तम पीक परिस्थिती दर्शविल्याने आणेवारीही अधिक आली. त्यामुळे बँकांचा कर्ज वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे पैसेच नाही. त्यामुळे नोटीस आल्यानंतरही कर्जाची परतफेड करताच आली नाही. आतापर्यंत केवळ पाच कोटी २३ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी चार कोटी ६४ लाख रुपयांची तर थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी ५९ लाख रुपयांची परतफेड केली आहे. थकीत कर्जाच्या तुलनेत अर्धाटक्काही वसुली झाली नाही. त्यामुळे आता जिल्हा बँकेचे अधिकारी चिंतेत सापडले आहे. वसुलीसाठी पथकांची नेमणूक केली आहे. परंतु नोटाबंदीमुळे आजही ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत झाले नसल्याने नोटाबंदीचे कारण दिले जाते. (शहर वार्ताहर)