शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

५२ ग्रामपंचायतीत ९७० उमेदवार रिंगणात

By admin | Updated: July 17, 2015 02:36 IST

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यातील चार ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ...

उमरखेड तालुका : चार ग्रामपंचायती अविरोध, अनेक गावात रंगतदार लढतीअविनाश खंदारे उमरखेडतालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यातील चार ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ५२ ग्रामपंचायतींसाठी ९७० उमेदवार रिंगणात आहे. अनेक ग्रामपंचायतीत कडवा संघर्ष होण्याची चिन्हे आहे.उमरखेड तालुक्यातील ५६ गावात निवडणुका घोषित झाल्या होत्या. ५६ ग्रामपंचायतींसाठी १२२१ उमेदवारांनी नामांकन भरले होते. त्यातील २५१ जणांनी माघार घेतली. तर नागापूर, चिंचोली, आमडापूर, परजना ही चार गावे अविरोध झाली आहे. आता ५२ ग्रामपंचायतींत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात सुकळी न., कुपटी, बोथा वन, धनज, कळमुला, तिवरंग, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस बु., उंचवडद, डोंगरगाव, सोईट घ., सोनदाबी, खरूस खु., टेंभुरदरा, हातला, दिवट पिंपरी, पोफाळी, पार्डी बंगला, चिंचोली संगम, तिवडी, बिटरगाव खु., लिंबगव्हाण, वरुड बिबी, चुरमुरा, वाणेगाव, दहागाव, मन्याळी, बाळदी, कृष्णापूर, कारखेड, लोहरा खु., देवसरी, दिंडाळा, ढाणकी, मेट, गाजेगाव, निगनूर, टाकळी इजारा, कोपरा बु., पिंपळगाव, चिखली, अकोली, भवानी, सावळेश्वर, करंजी, बोरगाव, दराटी आदी गावांचा समावेश आहे.अनेक गावातील उमेदवार हे गावातील समस्या घेऊन रिंगणात उभे ठाकले आहे. निवडणुकीत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. पोफाळी येथे अतिशय चुरशीची निवडणूक होत असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण व विद्यमान महिला व बालकल्याण सभापती विमल चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्वच पक्षाचे लोक एकत्र येवून पॅनल तयार केले आहे. तर त्यांच्याविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव तालनकर यांच्या नेतृत्वात पॅनल उभे केले आहे. विडूळ गावात उमरखेड पंचायत समितीच्या सभापती प्रयागबाई कोत्तेवार, जिल्हा परिषद सदस्य संदीप हिंगमिरे यांच्या नेतृत्वातील पॅनल उभे आहे. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा यांनी मिळून भगवान धोपटे, अनिल देशमुख, मिलिंद धुळे, बापुराव धुळे यांनी लढत देण्याची तयारी चालविली आहे.पाणीटंचाईच्या गावात निवडणूक जोमातपोफाळी : दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने उमरखेड तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येकजण निवडणुकीसाठी सज्ज आहे. अशा स्थितीत पावसाची दडी आणि पाणीटंचाईचे सावट आहे. मात्र गावकऱ्यांना त्याचे काही देणे-घेणे दिसत नाही. पाणीटंचाई असलेल्या गावात निवडणुकीने जोर मात्र चांगलाच धरला आहे. उमरखेड तालुक्यातील कळमुला गावातील नळयोजना कित्येक दिवसांपासून बंद आहे. नागरिक आपली तहान कशीबशी भागवत आहे. पोफाळीजवळच्या वसंतनगर येथेही अशीच अवस्था आहे. बाराही महिने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पाणीटंचाईचा प्रश्न मात्र दुर्लक्षिला जात आहे.