शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

९० हजार हेक्टर जमीन सामूहिक वनहक्कात

By admin | Updated: September 12, 2016 01:16 IST

वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्यांच्याच प्रयत्नातून ९० हजार हेक्टर जमिनीवर आदिवासी

३६७ गावे : एक लाख आदिवासी कुटुंबांना मिळणार रोजगाररूपेश उत्तरवार  यवतमाळ वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्यांच्याच प्रयत्नातून ९० हजार हेक्टर जमिनीवर आदिवासी बांधवांच्या मालकीची मोहर उमटली आहे. ३६७ गावांमध्ये सामूहिक वनदाव्यांना महसूल विभागाने मंजुरी दिली असून वनउपजावर आता त्यांचा कायदेशीर हक्क राहणार आहे. यामुळे तब्बल एक लाख कुटुंबांना रोजगार उपलब्ध होणार आहे. वन हक्क कायद्यानुसार आदिवासींचा वनावरील हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे. वंश परंपरागत जंगल रक्षणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यासाठी सामूहिक वनदाव्यांची जिल्हाभरातून मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८९३ गावे जंगलालगत वसली आहेत. या गावांना वनहक्क कायद्यानुसार सामूहिक वनदावे सादर करता येणार आहेत. यामुळे जंगलावरील अधिकार या गावाच्या ग्रामसभेला मिळणार आहे. जिल्ह्यातील ३६७ ग्रामपंचायतीचे सामूहिक वनहक्काचे दावे जिल्हा समितीने मंजूर केले आहेत. या गावामधील ग्रामसभेला वनावर संपूर्ण अधिकार देण्याची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केली आहे. यामुळे वनाचा संपूर्ण अधिकार ग्रामसभेला मिळाला आहे. यातून ग्रामपंचायतीला वनोपज गोळा करणे आणि त्याचा लिलाव करण्याचा अधिकार मिळाला आहे. जिल्ह्यातील ३६७ गावांमध्ये ९० हजार हेक्टर वनजमीन ग्रामसभेच्या मालकीची झाली आहे. या ठिकाणी पर्यावरणाला हानी न करता निसर्गाचे संवर्धन करीत वनोपज ग्रामसभेला गोळा करता येणार आहे. यामुळे गावातील एक लाख नागरिकांना गावातच रोजगार मिळणार आहे. यामध्ये डिंक, चारोळ्या, बांबू, लाख, तेंदूपत्ता, मध, बेहाडा या वनोपजावर ग्रामसभेला मालकी मिळाली आहे. यासोबतच वनौषधी, तलावातील मत्स्यबिज, शिंगाडे किंवा तलावातील कमळ शेती यासारख्या व्यवसायालाही चालना मिळणार आहे. या उद्योगाचे संवर्धन आणि लिलाव करण्याचा अधिकारी पुढील काळात ग्रामसभेचा राहणार आहे. हे वनोपज गावात विकायचे किंवा मोठ्या शहरात विक्री करायचे त्यावर प्रक्रिया करायची या सर्व बाबीचा अधिकार गावकऱ्यांचा राहणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत जाणारा महसूल ग्रामसभेला मिळणार आहे. यातून गावांचा विकास होणार आहे. जंगलाचे संवर्धन होण्यास मोठा हातभार लागणार आहे. यासोबतच आदिवासींंना हक्काचा रोजगार यातून उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.