शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

जिल्ह्यात तांडावस्तीत नऊ कोटींची कामे

By admin | Updated: September 25, 2016 02:53 IST

समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडावस्ती सुधार योजनेवरून नेहमीच राजकीय वादंग उठते. यावर उपया म्हणून पहिल्यांदा

तांडा-वस्त्यांची निवड : तालुक्यासाठी लोकसंख्येचा निकषयवतमाळ : समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडावस्ती सुधार योजनेवरून नेहमीच राजकीय वादंग उठते. यावर उपया म्हणून पहिल्यांदा लोकसंख्येच्या आधारवर तालुक्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात बंजारा तांडा आणि विजाभज वस्त्यांवर आठ कोटी ७२ लाखांची कामे केली जाणार आहे. बंजारा तांडा आणि विजाभज (विमुक्त जाती भटक्या जमाती) वस्त्यांमध्ये विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हास्तावर विशेष समिती तयार करण्यात आली आहे. तांडावस्ती सुधार योजनेची समिती पूर्वी पुर्णत: राजकीय प्रभावाखाली राहत होती. सत्ताधारी पक्षातील सदस्यांना या समितीवर अध्यक्ष नियुक्त होत होते. हा राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी आता पुन्हा तांडावस्ती सुधार समितीचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नियुक्त केले आहे. सीईओ दिपककुमार सिंगला यांनी प्रथमच तांडावस्ती योजनेसाठी गावा प्रमाणेच तालुकानिहाय सुध्दा लोकसंख्येचा निकष लावला आहे. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप करण्यास कोणताच वाव उरला नाही. ज्या गावात बंजारा अथवा विजाभज वस्त्या असतील तिथेच या योजनेतून कामे केली जाणार आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षासात १ हजार ५२ विजाभज वस्त्यामध्ये काम केले जाणार आहे. त्यात पुसद तालुक्यातील १७० वस्त्याचा सर्वाधिक समावेश आहे. त्या खालोखाल दारव्हा १४२ आणि केळापूर तालुक्यातील १२२ वस्त्या आहेत. बंजारा तांड्यावर ४ कोटी ३६ लाखांची विकास कामे होणार आहेत. त्याचा १६१० तांड्यांवरच्या ३ लाख ५१ हजार ८१ बंजारा समाज बांधवाणा लाभ मिळणार आहे. आर्णी तालुक्यातील सर्वाधिक ३१९ तांडे, पुसद ३११, दारव्हा २४३ आणि महागाव तालुक्यातील २४२ तांड्याचा समावेश आहे. यातून प्रामुख्याने रस्ते, नाल्या, पुर संरक्षक भिंत यासारखी कामे केली जाणार आहे. त्याचे प्रारूप तयार झाले असून सीईओंच्या मान्यते नंतर कामांचे वितरण केले जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)