शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
2
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
3
IndiGo Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
4
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
5
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
6
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
7
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
8
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
9
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
10
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
11
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
12
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
13
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
14
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
15
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
16
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
17
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
19
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
20
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?

दिग्रसचे ९५२ घरकूल पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 21:57 IST

नांदगव्हाण धरण फुटल्याने शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदीला आलेल्या महापूरात उद्ध्वस्त कुटुंबाच्या पूनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. १३ वर्ष झाले तरी पूरग्रस्ताना हक्काच्या घरात जाता आले नाही. आता ९५२ घरकुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून ९ जुलै रोजी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न

प्रकाश सातघरे।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : नांदगव्हाण धरण फुटल्याने शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदीला आलेल्या महापूरात उद्ध्वस्त कुटुंबाच्या पूनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. १३ वर्ष झाले तरी पूरग्रस्ताना हक्काच्या घरात जाता आले नाही. आता ९५२ घरकुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून ९ जुलै रोजी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.दिग्रस शहराला पाणी पुरवठा करणारे नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ रोजी फुटले. यामुळे आलेल्या महापूरात १३ जणांना जलसमाधी मिळाली. अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. पुराचे पाणी हजारो घरात शिरल्याने कोट्यवधी रुपयांची हानी झाली. धावंडा नदी तीरावरील कुटुंबांच्या पूनर्वसनाचा प्रश्न आला.शासकीय सर्वेक्षणानुसार ९५२ कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यांच्या पूनर्वसनासाठी मंजुरी मिळाली. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ९५२ घरकुलाच्या बांधकामाचा ठेका देण्यात आला. दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु आता १३ वर्ष पूर्ण झाले तरी घरकुलाचा प्रश्न कायम आहे. येत्या ९ जुलै रोजी या महापूराच्या घटनेच्या आठवणी ताज्या होणार असून त्याच दिवशी घरकुलांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त गजानन हाडके हा युवक आंदोलन करणार आहे. सदर घरकूल सुस्थितीत आणि दर्जेदार बांधकाम करून मिळण्यासाठी गजानन हाडके गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यापासून मंत्र्यांपर्यंत पाठपुरवा केला. परंतु परिणाम शून्य निघाला. ९५२ घरकुलांपैकी ४०० घरकुल तयार होऊन अंतिम टप्प्यात आहे. जनतेच्या कोट्यवधी रुपयाची माती करणाऱ्या कंत्राटदाराला दरदिवशी ५०० रुपये दंड ठोठावण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे.राजकीय उदासीनतादिग्रसमध्ये महापूर आल्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी पूरग्रस्तांचे सांत्वन केले. त्यात राज्यस्तरीय आणि स्थानिक नेत्यांचा समावेश होता. लवकरात लवकर पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता १३ वर्ष झाले तरी घरकुल मिळाले नाही. याला राजकीय उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप पूरग्रस्त करीत आहे.