शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

दिग्रसचे ९५२ घरकूल पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 21:57 IST

नांदगव्हाण धरण फुटल्याने शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदीला आलेल्या महापूरात उद्ध्वस्त कुटुंबाच्या पूनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. १३ वर्ष झाले तरी पूरग्रस्ताना हक्काच्या घरात जाता आले नाही. आता ९५२ घरकुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून ९ जुलै रोजी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न

प्रकाश सातघरे।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : नांदगव्हाण धरण फुटल्याने शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदीला आलेल्या महापूरात उद्ध्वस्त कुटुंबाच्या पूनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. १३ वर्ष झाले तरी पूरग्रस्ताना हक्काच्या घरात जाता आले नाही. आता ९५२ घरकुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून ९ जुलै रोजी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.दिग्रस शहराला पाणी पुरवठा करणारे नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ रोजी फुटले. यामुळे आलेल्या महापूरात १३ जणांना जलसमाधी मिळाली. अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. पुराचे पाणी हजारो घरात शिरल्याने कोट्यवधी रुपयांची हानी झाली. धावंडा नदी तीरावरील कुटुंबांच्या पूनर्वसनाचा प्रश्न आला.शासकीय सर्वेक्षणानुसार ९५२ कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यांच्या पूनर्वसनासाठी मंजुरी मिळाली. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ९५२ घरकुलाच्या बांधकामाचा ठेका देण्यात आला. दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु आता १३ वर्ष पूर्ण झाले तरी घरकुलाचा प्रश्न कायम आहे. येत्या ९ जुलै रोजी या महापूराच्या घटनेच्या आठवणी ताज्या होणार असून त्याच दिवशी घरकुलांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त गजानन हाडके हा युवक आंदोलन करणार आहे. सदर घरकूल सुस्थितीत आणि दर्जेदार बांधकाम करून मिळण्यासाठी गजानन हाडके गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यापासून मंत्र्यांपर्यंत पाठपुरवा केला. परंतु परिणाम शून्य निघाला. ९५२ घरकुलांपैकी ४०० घरकुल तयार होऊन अंतिम टप्प्यात आहे. जनतेच्या कोट्यवधी रुपयाची माती करणाऱ्या कंत्राटदाराला दरदिवशी ५०० रुपये दंड ठोठावण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे.राजकीय उदासीनतादिग्रसमध्ये महापूर आल्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी पूरग्रस्तांचे सांत्वन केले. त्यात राज्यस्तरीय आणि स्थानिक नेत्यांचा समावेश होता. लवकरात लवकर पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता १३ वर्ष झाले तरी घरकुल मिळाले नाही. याला राजकीय उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप पूरग्रस्त करीत आहे.