शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

जिल्हा बँकेची माफीतून ९०० कोटी कर्जवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:29 IST

शासन शेतकºयांना दीड लाखांपर्यंत पीक कर्जमाफी देत असले तरी त्याचा खरा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलासुद्धा होणार आहे.

ठळक मुद्देसात वर्षातील थकबाकी : शासनाच्या तिजोरीतून होणार थेट लाभ

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासन शेतकºयांना दीड लाखांपर्यंत पीक कर्जमाफी देत असले तरी त्याचा खरा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलासुद्धा होणार आहे. जिल्हा बँकेची गेल्या सात वर्षातील ९०० कोटी रुपयांची थकबाकी या कर्जमाफीतून आयतीच वसूल होणार आहे.नापिकी व दुष्काळाचा सामना करणाºया शेतकºयांना दीड लाखांपर्यंत पीक कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या दृष्टीने अनेक दिवसांपासून प्रक्रिया राबविली जात आहे. खाते ओके असलेल्या शेतकºयांना तातडीने लाभ देण्याचे आदेश आहेत. या कर्जमाफीचा शेतकºयांना कमी आणि बँकांनाच अधिक लाभ होणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.जिल्हा बँकेत थकीत कर्जाच्या वसुलीसाठी स्वतंत्र विभाग आहे. तेथे अधिकारी-कर्मचारी नियुक्त आहेत. त्यांच्याकडे वसुलीसाठी वाहने आहेत. आपल्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँक दरवर्षी मोहीम राबविते. त्यासाठी नोटीस पाठविणे, घरोघरी भेटी देणे, वृत्तपत्रांमध्ये लिलावाच्या जाहिराती देणे, अधिकारी-कर्मचाºयांवरील टीए-डीए असा विविध खर्च बँकेला करावा लागतो. परंतु यावर्षी असा कोणताही खर्च न करता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गेल्या सात वर्षातील थकीत पीक कर्जाची तब्बल ९०० कोटी रुपयांची वसुली होणार आहे. थकबाकीची ही रक्कम शासनाच्या तिजोरीतून थेट बँकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. त्यामुळे बँकेच्या यंत्रणेवरील वसुलीचा ताण आपसुकच कमी होणार असून पुढील वर्षी पीक कर्ज वाटपासाठी बँकेला पैशाची चणचणही भासणार नाही.काँग्रेस सरकारमध्येही झाली होती २२९ कोटींची वसुलीएकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २००९ पासून थकीत असलेल्या एक लाख ६८ हजार शेतकºयांची यादी कर्जमाफीसाठी शासनाला सादर केली आहे. त्याची रक्कम ९०० कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. शासनाच्या नव्या निकषानुसार यातून काही शेतकरी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकाळात केंद्र सरकारने देशभरात ७२ हजार कोटींंची कर्जमाफी केली होती. त्यात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २२९ कोटी रुपयांचा वसुलीच्या माध्यमातून लाभ झाला होता. शासनाच्या अशा कर्जमाफीतून आयत्याच वसुलीची आशा राहत असल्यामुळेच जिल्हा बँक शेतकºयांना सढळ हस्ते कर्ज वाटप करताना दिसते. वर्षानुवर्षे शेतकरी बुडित कर्जदार होऊनही बँकेला फारशी चिंता राहत नाही. कारण कोणतेही सरकार आले तरी शेतकºयांना कर्जमाफीचा आग्रह असतोच. त्याचा फायदा जिल्हा बँकेला मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. कदाचित त्यामुळेच की काय जिल्हा बँक थकीत कर्ज वसुलीसाठी सरसकट जप्ती-लिलाव या सारखी टोकाची भूमिका घेताना दिसत नाही.