शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

आरटीओ कारवाईपूर्वीच ८८० वाहने परस्पर सोडली

By admin | Updated: August 27, 2016 00:40 IST

रेतीची अवैध वाहतूक, गुटखा, दारू, जनावर तस्करी व अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यात आलेली तब्बल ८८० वाहने

पोलीस यंत्रणा : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत उघड सुरेंद्र राऊत यवतमाळ रेतीची अवैध वाहतूक, गुटखा, दारू, जनावर तस्करी व अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यात आलेली तब्बल ८८० वाहने पोलिसांनी आरटीओकडील कारवाईपूर्वीच परस्परच सोडून दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दोन दिवसापूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत या खळबळजनक बाबीचा भंडाफोड झाला. त्यामुळे ना. अहीर यांनी संबंधितांची चांगलीच झाडाझडती घेतली. कोणत्याही गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी वाहन जप्त केल्यानंतर ते परस्पर सोडू नये, या वाहनावरील कारवाईचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवावा, आरटीओने अशा वाहनांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश काही महिन्यांपूर्वी ना.हंसराज अहीर यांनी दिले होते. मात्र पोलिसांनी गृहराज्यमंत्र्यांचे हे आदेश पायदळी तुडविल्याचा प्रकार पुढे आला. ना. अहीर यांनी नुकतीच विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. त्यावेळी परस्पर वाहने सोडण्याचा गंभीर प्रकार पुढे आला. गुन्ह्यातील वाहनावर मोटर वाहन अधिनियमानुसार कारवाईचे अधिकार हे उपप्रादेशिक परिवहन विभागाला आहे. मात्र आतापर्यंत पोलिसांनी गुन्ह्यात पकडलेल्या वाहनांची माहितीच आरटीओंना जात नव्हती. त्यामुळे असे अपराध करणाऱ्यांना फारसा फटका बसत नाही. गुटखा, जनावर, दारू तस्करीत वापरल्या जाणारी वाहने आरटीओ कारवाईअभावीच सोडण्यात येत होती. त्यामुळे तस्करांमध्ये कारवाईचा कोणताच वचक नव्हता. जनावरांच्या तस्करीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहे. त्यावर कायमस्वरूपी निर्बंध घालण्यासाठी संयुक्त कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यावर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनासंदर्भात तत्काळ माहिती आरटीओंना द्यावी, याच प्रस्तावावर आरटीओंनी मोटर वाहन अधिनियम १९९८ कलम ८६ अंतर्गत ५३ एक ब नुसार कारवाई करावी असे ठरले. त्यांनतर जुलै महिन्यापासून पोलिसांनी आरटीओंकडे पाठविलेल्या वाहनांच्या प्रस्तावावर कारवाई करण्यात आली. यात वाहनांचा परवाना आणि नोंदणी निलंबित करण्यात आली. किमान ३० दिवसांपर्यंत ही वाहने पोलिसांनी त्यांच्याच ठाण्यात जमा करून घ्यावी, असेही आरटीओंकडून कळविण्यात आले. त्यानंतरही संबंधित पोलीस ठाण्यातून वाहने परस्पर सोडून देण्यात आली होती. या भूमिकेमुळे ही कारवाई अडचणीत आली आहे. पोलिसांनी तस्करी अथवा गुन्ह्यात ताब्यात घेतलेली वाहने, न्यायालयाच्या आदेशानंतर सोडून द्यावीच लागतात. आरटीओंकडून येणाऱ्या निलंबन प्रस्तावाला विलंब लागतो. कारवाई केल्याचा अहवाल मिळाल्यानंतर अशी वाहने पुन्हा ताब्यात घेण्यात येणार आहे. यासाठी आरटीओ आणि पोलीस संयुक्त मोहीम राबविणार आहेत. - अखिलेशकुमार सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळपोलिसांनी वाहनाच्या संदर्भात दिलेल्या प्रस्तावावर तत्काळ कारवाई करण्यात येते. आतापर्यंत आलेल्या प्रस्तावापैकी एकही प्रलंबित नाही. पोलिसांना मोटार अधिनियम कायदानुसार केलेल्या कारवाईची प्रतही पोलिसांना देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही वाहने सोडण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले आहे. - श्याम झोळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ