शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

६० दिवसात ८५२ ग्रामपंचायतींच्या आॅडिटचे ‘टार्गेट’

By admin | Updated: January 23, 2016 02:27 IST

शासनाकडून दबाव वाढताच ग्रामपंचायतींचे वेगाने आॅडिट पूर्ण करण्याचा सपाटा सुरू झाला आहे.

यवतमाळ : शासनाकडून दबाव वाढताच ग्रामपंचायतींचे वेगाने आॅडिट पूर्ण करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ८५२ ग्रामपंचायतींचे दोन वर्षाचे आॅडिट पूर्ण करायचे असून त्यासाठी २५ आॅडिटर्सला ६० दिवसात हे ‘दिव्य’ पार पाडायचे आहे. या आव्हानाने आॅडिटर्सचे डोके चक्रावले आहे. स्थानिक निधी लेखा विभागाचे सहायक संचालक प्रशांत डाबरे यांनी गुरुवारी दुपारी आपल्या विभागाच्या लेखा परीक्षकांची बैठक घेतली. त्यात त्यांना ६० दिवसात ८५२ ग्रामपंचायतींचे सन २०१-१४ आणि २०१४-१५ या आर्थिक वर्षातील लेखा परीक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले. २५ आॅडिटर्स, ६० दिवस आणि तब्बल ८५२ ग्रामपंचायती हे समीकरण जुळवायचे कसे याचा पेच या आॅडिटर्सपुढे निर्माण झाला आहे. स्थानिक निधी लेखा विभागाचे मुंबई येथील संचालक विधाते यांनी दिलेला आदेश डाबरे यांनी आपल्या अधिनस्त आॅडिटर्सकडे ‘फॉरवर्ड’ केला असला तरी प्रत्यक्षात ते शक्य आहे का याचे चिंतन केले जात नसल्याची खंत लोकल फंड कार्यालयातून ऐकायला मिळते. ३१ मार्चपूर्वी ग्रामपंचायतींचे आॅडिट पूर्ण करायचे असेल तर प्रत्येक आॅडिटर्सला दरदिवशी एक ग्रामपंचायत उरकावी लागेल. कमी खर्चाची लहान ग्रामपंचायतीत हे शक्य आहे. मात्र जिल्ह्यात मोठ्या ग्रामपंचायतींची संख्याच अधिक आहे. एका आॅडिटरला २५ ते ३० ग्रामपंचायतींचे आॅडिट करावे लागणार आहे. पूर्व नियोजित दौरा पाठवूनही ग्रामसेवकांचा फोन बंद असणे, वेळेवर दप्तर उपलब्ध न करून देणे, त्यासाठी टाळाटाळ करणे हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आॅडिटला विलंब होतो. आजही जिल्ह्यातील ८५२ ग्रामपंचायतींचे गेल्या दोन वर्षांपासून आॅडिट झाले नाही. सामान्य निधी, पाणीपुरवठा, बीआरजीएफ १३ वा वित्त आयोग, दलित वस्ती, राष्ट्रीय पेयजल अशा विविध हेडवर येणाऱ्या निधीचे आॅडिट करावे लागत असल्याने त्याला विलंब होतो. अनेक आॅडिटर्स ग्रामपंचायतीचे हे आव्हान पूर्ण करण्यासाठी आपल्या अर्जित रजांचे बलिदान देतात. अनेकदा घरी रात्री उशिरापर्यंत बसून रिपोर्ट तयार करतात. त्यानंतरही ग्रामपंचायतीचे रिपोर्ट वेळेत सादर होत नसल्याची वरिष्ठांची ओरड कायम आहे. यापूर्वी आठ ते दहा वर्षांचे ग्रामपंचायतींचे आॅडिट प्रलंबित राहत होते. आता हे अंतर दोन वर्षावर आले आहे. आॅडिट न झाल्याने गेल्या दोन वर्षात कोण्या ग्रामपंचायतीत किती गैरव्यवहार झाला ही बाब गुलदस्त्यात आहे. विशेष असे ८५२ ग्रामपंचायतीसोबत या आॅडिटर्सला नगरपंचायतींचे आॅडिट करावे लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)