शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

८४ हजार हेक्टर पीक धोक्यात

By admin | Updated: July 1, 2015 00:20 IST

मृगनक्षत्राच्या शेवटच्या चरणात बरसलेल्या पावसाने हुरळलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत.

पावसाची दडी : शेतकऱ्यांच्या नशिबी यंदाही अवर्षणाचा सामना पुसद : मृगनक्षत्राच्या शेवटच्या चरणात बरसलेल्या पावसाने हुरळलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत. गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत असल्याने पुसद कृषी उपविभागातील चार तालुक्यातील ८४ हजार हेक्टरवरील खरीप पीक धोक्यात आले आहे. गत तीन वर्षांपासून पुसद उपविभागात शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशा स्थितीत यंदा मृगनक्षत्रात शेवटच्या चरणात दमदार पाऊस झाला. हवामान खात्यानेही मान्सून सक्रिय झाल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले. पुसद कृषी उपविभागात ८४ हजार ३८७ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. त्यात पुसद तालुक्यात २३ हजार ९१७, दिग्रस १७ हजार ४५०, उमरखेड २६ हजार ८३०, महागाव १६ हजार १८१ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. दमदार पावसाने बियाणे अंकुरले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते समाधान दिसू लागले. मात्र अवघ्या आठ दिवसातच निसर्गाने आपला रंग दाखविणे सुरू केले. उपविभागात आठ दिवसात कुठेही पावसाची साधी सर कोसळली नाही. आज बरसेल, उद्या बरसेल या आशेवर शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र दररोज आकाश निरभ्र दिसते. उन्हाळ्यासारखी उन्ह तपत आहे. त्यामुळे जमिनीतून अंकुरलेले बियाणे कोमेजून जात आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी ओलिताचा प्रयत्न चालविला आहे. परंतु वीज भारनियमनामुळे ओलित करणे शक्य होत नाही. येत्या दोन दिवसात पाऊस झाला नाही तर सोयाबीन उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. कपाशी आणखी चार-पाच दिवस तग धरु शकते. यासोबतच उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांचीही स्थिती गंभीर झाली आहे. पाऊस कोसळला नाही तर दुबार पेरणीचे संकट येणार आहे. (लोकमत वृत्तसेवा) उमरखेड तालुक्यात पिकांची स्थिती गंभीरउमरखेड : गत आठ दिवसांपासून पावसाची एकही सर कोसळली नसल्याने उमरखेड तालुक्यातील पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. उमरखेड तालुक्यात आतापर्यंत १५४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षीच्या सरासरीपेक्षा कितीतरी पाऊस या भागात झाला. गत वर्षी या तारखेला ५२७ मिमी पाऊस कोसळला होता. आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. आणखी दोन दिवस पाऊस आला नाही तर पिकांचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. तालुक्यातील पेरणी जवळपास आटोपली आहे. परंतु पाऊस नसल्याने पिके करपत आहे.