शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वनविभागाच्या ८४ रोपवाटिका धोक्यात

By admin | Updated: March 7, 2017 01:24 IST

जिल्ह्यात वनविभागाकडून रोजगार हमी योजनेंतर्गत ८४ रोपवाटिका चालविण्यात येतात. यातून ६९ लाख ५ पाच हजार ८४५ रोपांची निर्मिती अपेक्षित आहे.

कुशलचे ३४ लाख रखडले : ७० लाख रोपनिर्मितीचा प्रश्न यवतमाळ : जिल्ह्यात वनविभागाकडून रोजगार हमी योजनेंतर्गत ८४ रोपवाटिका चालविण्यात येतात. यातून ६९ लाख ५ पाच हजार ८४५ रोपांची निर्मिती अपेक्षित आहे. मात्र कुशल कामाचे अनुदान रखडल्याने या रोपवाटिका धोक्यात आल्या आहेत. ३४ लाख रुपये मिळविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. वेळेत अनुदान न मिळाल्यास रोपांची निर्मिती करणे शक्य होणार नाही. वनविभागाकडून ८४ रोपवाटिकेचे प्रस्ताव रोहयो विभागाला पाठविण्यात आले. याला मंजुरीसुद्धा मिळाली. मात्र अजूनपर्यंत अनुदानच न आल्यामुळे रोपवाटिकेत बियांच्या लागवडीचे काम रखडले आहे. एकीकडे शासन दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून आहे. मात्र त्या दृष्टिकोनातून कोणतीच तयारी होताना दिसत नाही. वनविभाग रोजगार हमी योजनेच्या अनुदानातूनच रोपवाटिकेची कामे करतात. अकुशल कामाचे अनुदान भरपूर असले तरी ५० टक्के कामे ही कुशलमध्ये मोडतात. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांना ३४ लाख रूपयांची आवश्यकता आहे. हा निधी वेळेत न मिळाल्यास रोपवाटिकांचा फज्जा उडणार आहे. या रोपवाटिकांसाठी रोहयोतून अकुशल कामांसाठी सात कोटी २३ लाख १८ हजार रूपये मंजूर झाले. तर कुशल कामासाठी ३ कोटी ९ लाख २५ हजार तरतूद आहे. अशी एकूण १० कोटी ३२ लाख ४३ हजार रूपयांची तरतूद केली आहे. यापैकी केवळ एक कोटी एक लाख चार हजार रूपये अग्रीम प्राप्त झाला आहे. यातून रोपवाटिकेचे काम करणे शक्य नाही. रोपवाटिकेत खते, बिया व प्लास्टिक पिशव्या खरेदी कराव्या लागतात. यासह अनेक कुशल घटकांत मोडणाऱ्या कामांसाठी पैसाच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)