शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वर्षभरात आठ हजार नागरिकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:15 IST

जिल्हाभरात श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी काळ ठरू पाहात आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात आठ हजार जणांना श्वानदंश झाल्याची गंभीर नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देप्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार अ‍ॅन्टी रॅबीज लस : पावसाळ्यात प्रमाण वाढण्याची चिन्हे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरात श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी काळ ठरू पाहात आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात आठ हजार जणांना श्वानदंश झाल्याची गंभीर नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. जिल्हाभरात श्वानाची संख्या खूप आहे. श्वान विविध कारणांमुळे दिवसेंदिवस हिंसक होत आहे. स्वजातीतील वर्चस्वाच्या लढाईतून श्वानामधील हल्ले वाढत आहेत. जखमी झालेल्या श्वानावर उपचार मात्र होत नाही. उपचाराअभावी जखम चिघळते. यातून श्वान पिसाळण्याची संख्या वाढते. यामुळे श्वानदंशाची संख्या वाढली आहे.अशा श्वानावर उपचार करणारे पशु वैद्यकीय डॉक्टर गावात फिरताना दिसत नाही. उपचाराअभावी श्वान गावभर सैरभैर होतो. तो वाटेत येईल त्याला चावतो. श्वान चावल्याची जखम अधिक धोकादायक आहे. त्याचे जंतू थेट मानवी शरीरात शिरतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास श्वानदंश झालेला व्यक्ती प्राण्याप्रमाणेच विव्हळतो. यात त्याच्या मृत्यूची संभावना अधिक असते. असे असले तरी श्वानाची काळजी घेतली जात नाही. यातून जिल्ह्यात श्वान चावण्याचे प्रकार वाढले आहे. याला नियंत्रित करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अ‍ॅन्टी रॅबीजची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अशा घटना घडल्यास गावपातळीवर उपचार शक्य होणार आहे.जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढलेयवतमाळचा भूभाग जंगलाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यानंतर या ठिकाणी सर्वत्र हिरवळ पहायला मिळते. या हिरवळीत सापांचा मुक्तसंचार पहायाला मिळतो. यातूनच ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. गत वर्षभरात ३२३ सर्पदंशाची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. यावर मात करणारे अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम औषधाची ट्रिटमेंट त्यावर केली जाते. या प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांना पाठविले जाते. यामुळे सर्पदंशनानंतरही रूग्णाचे प्राण वाचले आहेत.सुधारित इंजेक्शनपूर्वी अ‍ॅन्टी रॅबीज लस पोटात बेंबीच्या बाजूला दिली जात होती. आता यात बदल झाले आहे. सुधारित लसचे इंजेक्शन हातात दिले जाते. ०, ३, ७, १४ आणि २८ दिवसानंतर ही लस दिली जाते. त्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रांनी उपाययोजना केल्या आहेत.