शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वर्षभरात आठ हजार नागरिकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:15 IST

जिल्हाभरात श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी काळ ठरू पाहात आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात आठ हजार जणांना श्वानदंश झाल्याची गंभीर नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देप्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार अ‍ॅन्टी रॅबीज लस : पावसाळ्यात प्रमाण वाढण्याची चिन्हे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरात श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी काळ ठरू पाहात आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात आठ हजार जणांना श्वानदंश झाल्याची गंभीर नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. जिल्हाभरात श्वानाची संख्या खूप आहे. श्वान विविध कारणांमुळे दिवसेंदिवस हिंसक होत आहे. स्वजातीतील वर्चस्वाच्या लढाईतून श्वानामधील हल्ले वाढत आहेत. जखमी झालेल्या श्वानावर उपचार मात्र होत नाही. उपचाराअभावी जखम चिघळते. यातून श्वान पिसाळण्याची संख्या वाढते. यामुळे श्वानदंशाची संख्या वाढली आहे.अशा श्वानावर उपचार करणारे पशु वैद्यकीय डॉक्टर गावात फिरताना दिसत नाही. उपचाराअभावी श्वान गावभर सैरभैर होतो. तो वाटेत येईल त्याला चावतो. श्वान चावल्याची जखम अधिक धोकादायक आहे. त्याचे जंतू थेट मानवी शरीरात शिरतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास श्वानदंश झालेला व्यक्ती प्राण्याप्रमाणेच विव्हळतो. यात त्याच्या मृत्यूची संभावना अधिक असते. असे असले तरी श्वानाची काळजी घेतली जात नाही. यातून जिल्ह्यात श्वान चावण्याचे प्रकार वाढले आहे. याला नियंत्रित करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अ‍ॅन्टी रॅबीजची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अशा घटना घडल्यास गावपातळीवर उपचार शक्य होणार आहे.जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढलेयवतमाळचा भूभाग जंगलाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यानंतर या ठिकाणी सर्वत्र हिरवळ पहायला मिळते. या हिरवळीत सापांचा मुक्तसंचार पहायाला मिळतो. यातूनच ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. गत वर्षभरात ३२३ सर्पदंशाची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. यावर मात करणारे अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम औषधाची ट्रिटमेंट त्यावर केली जाते. या प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांना पाठविले जाते. यामुळे सर्पदंशनानंतरही रूग्णाचे प्राण वाचले आहेत.सुधारित इंजेक्शनपूर्वी अ‍ॅन्टी रॅबीज लस पोटात बेंबीच्या बाजूला दिली जात होती. आता यात बदल झाले आहे. सुधारित लसचे इंजेक्शन हातात दिले जाते. ०, ३, ७, १४ आणि २८ दिवसानंतर ही लस दिली जाते. त्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रांनी उपाययोजना केल्या आहेत.