शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

८०० कोटी कर्जाच्या पुनर्गठणाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 22:03 IST

संपूर्ण जिल्हा दुष्काळी परिस्थितीने होरपळला आहे. यामुळे बँकांनी कर्ज परतफेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे. यानंतरही कर्जाची परतफेड न झाल्यास कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना बँक स्तरावर धडकल्या आहेत.

ठळक मुद्दे२०४८ गावांत अंमल : ३० जूनपर्यंत कर्ज परतफेडीची मुदत वाढविली

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्हा दुष्काळी परिस्थितीने होरपळला आहे. यामुळे बँकांनी कर्ज परतफेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे. यानंतरही कर्जाची परतफेड न झाल्यास कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना बँक स्तरावर धडकल्या आहेत. जिल्ह्यातील कर्जवसुलीची स्थिती पाहता ८०० कोटी रूपयांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याच्या हालचाली बँकांना सुरू केल्या असून ३० जूननंतर चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील सर्व २०४८ गावांमध्ये कर्ज पुनर्गठणाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पावणे दोन लाख शेतकऱ्यांना १२११ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. सततच्या दुष्काळी स्थितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जाची परतफेड करता आली नाही. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाने दुष्काळ निवारणाचा अध्यादेश काढला आहे. यामध्ये ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांमधील कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश आहेत. या आदेशानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना बँकांना मिळाल्या आहेत. यानुसार बँकांनी नियोजन करण्यास सुरूवात केली आहे.१२११ कोटींपैकी ३०० कोटी रूपयांची परतफेड शेतकऱ्यांनी केली आहे. ९०० कोटी रूपयांची परतफेड अद्याप बाकी आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कर्जाची परतफेड करणाºया शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळेल. जे शेतकरी २०१८ मध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकले नाही, अशा त्यांच्याच कर्जाचे पुनर्गठण होणार आहे.बँकांच्या प्राथमिक अंदाजानुसार एक महिन्यात १०० कोटींच्या कर्जाची परतफेड झाल्यास ८०० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण बँकांना करावे लागणार आहे.पाच हप्त्यात करावी लागणार परतफेडकर्जाचे पुनर्गठण करताना बँक शेतकऱ्यांना तितक्याच रूपयांचे कर्ज नव्याने देणार आहे. थकित कर्जाचे पाच समान हप्ते पाडून त्याची परतफेड शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी करायची आहे. सोबतच नवीन घेतलेले कर्जही आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरावे लागणार आहे. दोन कर्जांची परतफेड शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. हे कर्ज शेतकऱ्यांना मिळणार असले तरी दोन कर्जाचा बोझा सातबाऱ्यावर राहणार आहे.पुनर्गठणानंतरही प्रश्न कायमच राहणारजुन्या कर्जाचे पुनर्गठण होणार असले तरी याबाबत अद्यापही शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमाची अवस्था कायम आहे. बँकेची यंत्रणा कर्जाची वसुली पाच समान हप्ते पाडून करणार आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळ जाहीर करून सवलती द्यायच्या आणि दुसरीकडे कर्ज वसुली सुरू करायची, असा फंडा शासनाने वापरला आहे. शिवाय पुढच्या हंगामासाठी नवे कर्ज कधी मिळणार याबाबत निश्चित तारीख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामाची पेरणीही उधार-उसनवारीवरच करावी लागणार आहे. बँक स्तरावर पुनर्गठनाच्या हालचाली सुरू असल्यातरी शेतकऱ्यांच्या घरात मात्र उधारीसाठी प्रयत्न सुरु आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक