शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षांच्या वृद्धांची न्यायासाठी पायपीट

By admin | Updated: June 23, 2017 01:50 IST

निवृत्त होऊन २५ वर्षे लोटली, तरी शेकडो शिक्षकांचा संघर्ष काही संपला नाही. ८० वर्षांपलीकडे वय गेलेले असतानाही

शिक्षण विभागात अनास्था : न्यायालयाच्या आदेशानंतरही मिळेना निवडश्रेणीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवृत्त होऊन २५ वर्षे लोटली, तरी शेकडो शिक्षकांचा संघर्ष काही संपला नाही. ८० वर्षांपलीकडे वय गेलेले असतानाही त्यांना पायपीट करावी लागतेय. न्यायालयात जाऊन आदेश मिळविला तरी जिल्हा परिषदेतून अंमलबजावणीचा थांगपत्ता नाही. सेवानिवृत्त शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न अखेर बुधवारी शिक्षण समितीच्या सभेत उपस्थित झाला, तेव्हाही अधिकाऱ्यांनी सहकार्याऐवजी ‘बघूया, करूया’ अशी उपरी भूमिका घेतल्याने या वयोवृद्धांच्या संयमाचा बांध फुटला.आयुष्यभर खेड्यापाड्यांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा निवृत्तीचा काळ समाधानी असणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात निवृत्तीनंतरही विविध लाभ मिळविण्यासाठी वयोवृद्ध शिक्षकांना जिल्हा परिषदेपासून न्यायालयापर्यंत वारंवार पायपिट करावी लागत आहे. नियमानुसार, आपल्याला निवडश्रेणीचा लाभ मिळावा, ही या शिक्षकांची मागणी आहे. कुणी २५ वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहे, तर कुणाच्या निवृत्तीला त्याहीपेक्षा अधिक काळ लोटला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागात हेलपाटे मारता-मारता अनेकांच्या प्रकृतीची वासलात लागली. काही निवृत्तांनी तर जगाचा निरोप घेतला. अधिकाऱ्यांकडून सातत्याने टोलवाटोलवी झाल्यावर हे वयोवृद्ध शिक्षक संघटित झाले आणि त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. फेब्रुवारीमध्ये न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला. संबंधित शिक्षकांना निवडश्रेणीच्या यादीत समाविष्ट करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. निकाल येऊन तीन महिने झाले तरी यादी शिक्षकांना पाहायलासुद्धा मिळालेली नाही. अखेर वंचित शिक्षकांनी काँग्रेसच्या देऊरवाडी (ता. आर्णी) सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यांनी बुधवारच्या शिक्षण समितीच्या सभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र, आमच्याकडे जीआर नाही, आम्ही तो शासनाकडे मागविला आहे, याद्या तयार होत आहेत, कच्ची यादी आहे, ती पक्की झाल्यावर शिक्षकांच्या घरी पाठवून देण्यात येईल, असे उत्तर देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी चर्चा टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभेत चर्चेसाठी हा मुद्दा १५ दिवसांपूर्वी देण्यात आला होता, तरीही ऐनवेळी मुद्दा आल्याचे सांगत चर्चा टाळली. सभेत चर्चाच होणार नसेल, तर केवळ चहापाण्यासाठी सभा घ्यायची का, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला.