शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

८० वर्षांच्या वृद्धांची न्यायासाठी पायपीट

By admin | Updated: June 23, 2017 01:50 IST

निवृत्त होऊन २५ वर्षे लोटली, तरी शेकडो शिक्षकांचा संघर्ष काही संपला नाही. ८० वर्षांपलीकडे वय गेलेले असतानाही

शिक्षण विभागात अनास्था : न्यायालयाच्या आदेशानंतरही मिळेना निवडश्रेणीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवृत्त होऊन २५ वर्षे लोटली, तरी शेकडो शिक्षकांचा संघर्ष काही संपला नाही. ८० वर्षांपलीकडे वय गेलेले असतानाही त्यांना पायपीट करावी लागतेय. न्यायालयात जाऊन आदेश मिळविला तरी जिल्हा परिषदेतून अंमलबजावणीचा थांगपत्ता नाही. सेवानिवृत्त शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न अखेर बुधवारी शिक्षण समितीच्या सभेत उपस्थित झाला, तेव्हाही अधिकाऱ्यांनी सहकार्याऐवजी ‘बघूया, करूया’ अशी उपरी भूमिका घेतल्याने या वयोवृद्धांच्या संयमाचा बांध फुटला.आयुष्यभर खेड्यापाड्यांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा निवृत्तीचा काळ समाधानी असणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात निवृत्तीनंतरही विविध लाभ मिळविण्यासाठी वयोवृद्ध शिक्षकांना जिल्हा परिषदेपासून न्यायालयापर्यंत वारंवार पायपिट करावी लागत आहे. नियमानुसार, आपल्याला निवडश्रेणीचा लाभ मिळावा, ही या शिक्षकांची मागणी आहे. कुणी २५ वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहे, तर कुणाच्या निवृत्तीला त्याहीपेक्षा अधिक काळ लोटला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागात हेलपाटे मारता-मारता अनेकांच्या प्रकृतीची वासलात लागली. काही निवृत्तांनी तर जगाचा निरोप घेतला. अधिकाऱ्यांकडून सातत्याने टोलवाटोलवी झाल्यावर हे वयोवृद्ध शिक्षक संघटित झाले आणि त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. फेब्रुवारीमध्ये न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला. संबंधित शिक्षकांना निवडश्रेणीच्या यादीत समाविष्ट करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. निकाल येऊन तीन महिने झाले तरी यादी शिक्षकांना पाहायलासुद्धा मिळालेली नाही. अखेर वंचित शिक्षकांनी काँग्रेसच्या देऊरवाडी (ता. आर्णी) सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यांनी बुधवारच्या शिक्षण समितीच्या सभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र, आमच्याकडे जीआर नाही, आम्ही तो शासनाकडे मागविला आहे, याद्या तयार होत आहेत, कच्ची यादी आहे, ती पक्की झाल्यावर शिक्षकांच्या घरी पाठवून देण्यात येईल, असे उत्तर देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी चर्चा टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभेत चर्चेसाठी हा मुद्दा १५ दिवसांपूर्वी देण्यात आला होता, तरीही ऐनवेळी मुद्दा आल्याचे सांगत चर्चा टाळली. सभेत चर्चाच होणार नसेल, तर केवळ चहापाण्यासाठी सभा घ्यायची का, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला.