शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ७५ कोटींची मदत

By admin | Updated: January 3, 2017 02:05 IST

खरीप हंगाम हातचा गेल्यानंतरही अंतिम आणेवारीने २०१५ मध्ये शेतकऱ्यांचा घात केला. दुष्काळी

न्यायालयाने फटकारले : २०१५ तील खरीप नुकसानीची रक्कम २०१७ मध्ये यवतमाळ : खरीप हंगाम हातचा गेल्यानंतरही अंतिम आणेवारीने २०१५ मध्ये शेतकऱ्यांचा घात केला. दुष्काळी परिस्थिती असतानाही मदत मिळाली नाही. यावर प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने शासनाला फटकारत शेतकऱ्यांना तत्काळ दुष्काळी मदत देण्याची सूचना केली. त्यावरून अमरावती येथे आयुक्तांनी तातडीची बैठक बोलाविली. आता जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार शेतकऱ्यांना २०१५ च्या खरीप हंगामातील नुकसानीचे ७४ कोटी ८८ लाख रुपये मिळणार आहे. २०१५ च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अपुऱ्या पावसाने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला होता. मात्र त्यानंतरही जिल्ह्याची आणेवारी उत्तम दर्शविण्यात आली. परिणामी शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. यावर जिल्ह्यात चांगलेच वादळ उठले. दुष्काळाची मदत मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने शासनाला फटकारत शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची सूचना केली. न्यायालयाने निर्देश देताच अमरावती येथे आयुक्तांनी शनिवारी तातडीची बैठक बोलाविली. पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याची सूचना दिली. यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार शेतकऱ्यांना २०१५ साली झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. मात्र ही मदतही तोकडीच राहणार असल्याचे संकेत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांंना केवळ १९ कोटी ६५ लाख ९४ हजार ९४८ रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५४ कोटी ३४ लाख रुपये मिळणार आहे. विशेष म्हणजे या पेक्षा किती तरी पट अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मदत वितरणासाठी शासनाने काही निकष जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अपुऱ्या निधीमुळे शेतकऱ्यांच्या हातात किती मदत पडते हे मात्र यादी जाहीर झाल्यानंतरच पुढे येणार आहे. पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांंना जी मदत मिळते त्या मदतीच्या ५० टक्के मदत पीक विमा न काढणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याची सूचना आहे. दुष्काळी मदत देण्यासाठी सहा हजार २०० रुपये हेक्टरी मदतीचा निकष असला तरी पीक विम्याच्या निम्मीच रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे.यामुळे राज्य शासन प्रत्येक शेतकऱ्यांंना हेक्टरी किती रुपये मदत देणार ही बाब शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतरच कळणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना आहे. त्यामुळे मदतीस मुकलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर) ब्रिटीशकालीन आणेवारीने घात ४२०१५ सारखी स्थिती २०१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. मात्र ब्रिटीशकालीन आणेवारीने शेतकऱ्यांची स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा दिला आहे. यामुळे यावर्षी परिस्थिती चिंताजनक असताना बँक वसुलीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शासनाकडे ७४ कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. आदेश येताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते केले जातील. - राजेश खवले निवासी उपजिल्हाधिकारी.