शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

दोन लाख शेतकऱ्यांचे ७४ कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:53 IST

सततच्या दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. यातच गतवर्षीच्या दुष्काळी ...

सरकारने शब्द फिरविला : सर्कलनिहाय मदतीत ५० टक्के कपातयवतमाळ : सततच्या दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. यातच गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. विमा उतरविणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची तोकडी मदत मिळाली. याच सुमारास विमा न उतरविणारे शेतकरी मदतीस मुकले. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० टक्के मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात केली होती. प्रत्यक्षात मंजूर विम्याच्या निकषाच्या ५० टक्केच मदत मिळणार आहे. राज्य शासनाने शब्द फिरविल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे.दुष्काळी स्थितीत राज्य शासनाने केलेली मदतीची घोषणा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक होती. असे असले तरी या घोषणेनंतर राज्य शासनाने सोयीनुसार मदतीचा शब्द फिरविला आहे. हेक्टरी मदत देताना जिरायती आणि बागायती असा फरक केला जातो. यासाठी ६ हजार ते २५ हजार रूपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात. याला पर्याय म्हणून पीकविमा कंपनीने जाहीर केलेल्या मदतीच्या ५० टक्के मदत देण्याचे निकष राज्य शासनाने जाहीर केले आहेत. यातही सर्कलनिहाय मिळालेली मदत वेगवेगळी आहे. कुणाला १५० रूपये हेक्टरी मदतही दिली गेली आहे. याच्या निम्मी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही मदत एक ते दोन हेक्टरपर्यंतच मर्यादित आहे. यामुळे जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणेच शेतकऱ्यांना अत्यल्प मदत वितरित होणार आहे. (शहर वार्ताहर)