शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

७४ कोटी मिळालेच नाही

By admin | Updated: March 5, 2017 00:54 IST

२०१५ मधील दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली.

दुष्काळी मदत : न्यायालयाच्या निर्देशानंतरही अनुदान नाही यवतमाळ : २०१५ मधील दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली. मात्र दोन वर्षे झाले तरी जिल्ह्याला मदत मिळाली नाही. हा निधी आचारसंहितेपूर्वी जिल्ह्याकडे वळता झाला. अजूनही तो शेतकऱ्यांच्या हातात पडला नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. अपुऱ्या पावसामुळे २०१५ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. यानंतरही जिल्ह्याला मदतीच्या यादीतून वगळण्यात आले होते. यानंतर राज्य शासानाने हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली. मात्र घोषणेनंतरही पैसे मिळाले नाही. यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचे आदेश दिले. यानंतर राज्याने काही दिवसांपूर्वी जिल्ह्याकडे ७४ कोेटी वळते केले. या नंतरच्या काळात आचारसंहिता लागली. सर्वच अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने मदत वाटपाचे काम थांबले. यामुळे घोषणेची मदत शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे.२०१५ मध्ये अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच शेतकऱ्यांना याचा फटका बसला. पीकविमा न उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यानुसार जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार ९९४ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. सोयाबीन उत्पादकांना ५४ कोटी तर कापूस उत्पादकांना १९ कोटी ६५ लाख रूपये मिळणार आहे. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला आहे. यातील सात कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. ६९ कोटी रूपये अजूनही जमा व्हायचे आहे. (शहर वार्ताहर) आचारसंहितेमुळे रक्कम थांबली जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेत ही रक्कम थांबली होती. आचारसंहिता संपताच आयुक्तांन पैसे वितरणाची कारवाई तत्काळ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यातून जिल्हा प्रशासनाने सोमवारी तत्काळ बैठक बोलावली आहे. शेतकऱ्यांची मदत वाटप करण्यासाठी यादीसोबत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. ६ ते ११ मार्चच्या सुमारास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जाणार आहे.