शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

७४ कोटी मिळालेच नाही

By admin | Updated: March 5, 2017 00:54 IST

२०१५ मधील दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली.

दुष्काळी मदत : न्यायालयाच्या निर्देशानंतरही अनुदान नाही यवतमाळ : २०१५ मधील दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली. मात्र दोन वर्षे झाले तरी जिल्ह्याला मदत मिळाली नाही. हा निधी आचारसंहितेपूर्वी जिल्ह्याकडे वळता झाला. अजूनही तो शेतकऱ्यांच्या हातात पडला नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. अपुऱ्या पावसामुळे २०१५ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. यानंतरही जिल्ह्याला मदतीच्या यादीतून वगळण्यात आले होते. यानंतर राज्य शासानाने हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली. मात्र घोषणेनंतरही पैसे मिळाले नाही. यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचे आदेश दिले. यानंतर राज्याने काही दिवसांपूर्वी जिल्ह्याकडे ७४ कोेटी वळते केले. या नंतरच्या काळात आचारसंहिता लागली. सर्वच अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने मदत वाटपाचे काम थांबले. यामुळे घोषणेची मदत शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे.२०१५ मध्ये अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच शेतकऱ्यांना याचा फटका बसला. पीकविमा न उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यानुसार जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार ९९४ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. सोयाबीन उत्पादकांना ५४ कोटी तर कापूस उत्पादकांना १९ कोटी ६५ लाख रूपये मिळणार आहे. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला आहे. यातील सात कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. ६९ कोटी रूपये अजूनही जमा व्हायचे आहे. (शहर वार्ताहर) आचारसंहितेमुळे रक्कम थांबली जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेत ही रक्कम थांबली होती. आचारसंहिता संपताच आयुक्तांन पैसे वितरणाची कारवाई तत्काळ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यातून जिल्हा प्रशासनाने सोमवारी तत्काळ बैठक बोलावली आहे. शेतकऱ्यांची मदत वाटप करण्यासाठी यादीसोबत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. ६ ते ११ मार्चच्या सुमारास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जाणार आहे.