शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

७० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचा चेंडू ‘आयटी’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 21:44 IST

जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांच्या मिसमॅच खात्याचा चेंडू आता मुंबई येथील आयटी विभागाकडे आहे. येत्या दोन दिवसांत हा विभाग ग्रीन लिस्ट प्रकाशित करणार आहे.

ठळक मुद्देमुंबईकडे लक्ष : दोन दिवसात लागणार ग्रीन लिस्ट, ५४ कोटींचे कर्ज अद्यापही कायमच

रूपेश उत्तरवार ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांच्या मिसमॅच खात्याचा चेंडू आता मुंबई येथील आयटी विभागाकडे आहे. येत्या दोन दिवसांत हा विभाग ग्रीन लिस्ट प्रकाशित करणार आहे. त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित शेकऱ्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहे.मुख्यमंत्र्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत कर्जमाफीचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली. त्याचा ११ फेबु्रवारीला आढावा घेण्यात आला. राज्यातील बँकांची स्थिती सहकार आयुक्तांनी जाणून घेतली. आता ‘मिसमॅच’ खाते आणि काही खासगी बँकांचे अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र आयटी विभागाचा ग्रीन सिग्नल शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. यामुळे येत्या दोन दिवसात सर्व कर्ज खाते निल होईल का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कर्जमाफीचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे म्हणून सहकार विभागाची यंत्रणा झटत आहे. त्यांनी मिसमॅच दस्तावेजाची फेरतपासणी करून मुंबईच्या आयटी विभागाकडे अहवाल पाठविला. आता मुंबईचा आयटी विभाग ग्रीन लीस्ट प्रकाशित करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे वळते होणार आहे. जिल्ह्यातील ७० हजार शेतकऱ्यांचे कर्जखाते अद्याप क्लिअर झाले नाही. यापैकी तब्बल ६४ हजार खाते मिसमॅच आहे. इतर खात्यातील कर्ज प्रक्रिया राष्ट्रीयीकृत बँकाकडून पूर्ण केली जात आहे. सहकार विभागाने जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांच्या खात्याचा अहवाल दुरूस्त करून पाठविला. यामुळे ग्रीन लीस्ट लागताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते होतील. मात्र केवळ दोन दिवसांत हे काम पूर्ण होणे सध्या तरी तारेवरची कसरत ठरणारे आहे.८९२ कोटींची कर्जमाफीजिल्ह्यातील दोन लाख ४७ हजार ९५६ हजार शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी अर्ज दाखल केले. या खात्यांवर ९४७ कोटी ६१ लाखांचे कर्ज आहे. यातील एक लाख ७७ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात ८९२ कोटी रूपयांची रक्कम वळती झाली आहे. ७० हजार शेतकऱ्यांच्या ५४ कोटींच्या कर्जावरील मंजुरीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.