शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

७० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचा चेंडू ‘आयटी’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 21:44 IST

जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांच्या मिसमॅच खात्याचा चेंडू आता मुंबई येथील आयटी विभागाकडे आहे. येत्या दोन दिवसांत हा विभाग ग्रीन लिस्ट प्रकाशित करणार आहे.

ठळक मुद्देमुंबईकडे लक्ष : दोन दिवसात लागणार ग्रीन लिस्ट, ५४ कोटींचे कर्ज अद्यापही कायमच

रूपेश उत्तरवार ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांच्या मिसमॅच खात्याचा चेंडू आता मुंबई येथील आयटी विभागाकडे आहे. येत्या दोन दिवसांत हा विभाग ग्रीन लिस्ट प्रकाशित करणार आहे. त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित शेकऱ्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहे.मुख्यमंत्र्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत कर्जमाफीचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली. त्याचा ११ फेबु्रवारीला आढावा घेण्यात आला. राज्यातील बँकांची स्थिती सहकार आयुक्तांनी जाणून घेतली. आता ‘मिसमॅच’ खाते आणि काही खासगी बँकांचे अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र आयटी विभागाचा ग्रीन सिग्नल शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. यामुळे येत्या दोन दिवसात सर्व कर्ज खाते निल होईल का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कर्जमाफीचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे म्हणून सहकार विभागाची यंत्रणा झटत आहे. त्यांनी मिसमॅच दस्तावेजाची फेरतपासणी करून मुंबईच्या आयटी विभागाकडे अहवाल पाठविला. आता मुंबईचा आयटी विभाग ग्रीन लीस्ट प्रकाशित करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे वळते होणार आहे. जिल्ह्यातील ७० हजार शेतकऱ्यांचे कर्जखाते अद्याप क्लिअर झाले नाही. यापैकी तब्बल ६४ हजार खाते मिसमॅच आहे. इतर खात्यातील कर्ज प्रक्रिया राष्ट्रीयीकृत बँकाकडून पूर्ण केली जात आहे. सहकार विभागाने जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांच्या खात्याचा अहवाल दुरूस्त करून पाठविला. यामुळे ग्रीन लीस्ट लागताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते होतील. मात्र केवळ दोन दिवसांत हे काम पूर्ण होणे सध्या तरी तारेवरची कसरत ठरणारे आहे.८९२ कोटींची कर्जमाफीजिल्ह्यातील दोन लाख ४७ हजार ९५६ हजार शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी अर्ज दाखल केले. या खात्यांवर ९४७ कोटी ६१ लाखांचे कर्ज आहे. यातील एक लाख ७७ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात ८९२ कोटी रूपयांची रक्कम वळती झाली आहे. ७० हजार शेतकऱ्यांच्या ५४ कोटींच्या कर्जावरील मंजुरीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.