शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

७० हजार शेतकरी वेटींगवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:01 IST

जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीसाठी वेटींगवर आहेत. या शेतकºयांच्या याद्या नव्याने सादर करण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी शंका बँकांना सतावत आहे.

ठळक मुद्देकर्जमाफीचा गुंता कायम : मुख्यमंत्र्यांनी ‘व्हीसी’द्वारे घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीसाठी वेटींगवर आहेत. या शेतकºयांच्या याद्या नव्याने सादर करण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी शंका बँकांना सतावत आहे. दरम्यान, बुधवारी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँक अधिकाºयांकडून व्हीसीव्दारे यातील अडचणी समजून घेतल्या.जिल्हा बँकेचे एक लाख ७९ हजार १५० शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले. त्यांचा अहवाल तब्बल ९७८ फाईलमध्ये शासनाकडे आॅनलाईन सादर करण्यात आला. आॅनलाईनमध्ये यातील ६६४ फाईलच यशस्वीपणे दाखल झाल्या. उर्वरित २५६ फाईल अद्याप वेटींगवर आहे. १० दिवसांपूर्वी फाईल दाखल झाल्यानंतरही ही स्थिती असल्याने बँकेच्या शाखांमध्ये विविध शंकेला उधाण आले. या २५६ फाईलमध्ये ७० हजार शेतकºयांच्या नावाची नोंद आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या दाखल करताना बँक स्तरावर आधार नंबरच चुकीचे नोंदविले गेले. अनेकांचे बँक अकाउंटही चुकविले गेले. यामुळे पुढील महिनाभरात शेतकºयांच्या खात्यात वळत्या होणाºया कर्ज रकमेचा गुंता वाढला आहे.या बाबीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी मुंबईत बैठक घेत बँकांना जाब विचारला. यामुळे कर्जमाफीच्या फेरयाद्या तयार करण्याची नामुष्की बँकावर ओढवण्याचा धोका वाढला आहे. मुख्यमंत्र्यांनी आयटी विभाग, बँंकर्स व प्रधान सचिवांसह राज्यातील सर्व जिल्ह्यातील बँक अधिकाºयांशी ‘व्हीसी’च्या माध्यमातून संपर्क साधला. त्यात त्यांनी बँकांच्या अडचणी समजून घेतल्या. फडणवीस यांनी याद्यांमधील घोळ सर्वांपुढे मांडला. शेतकºयांच्या नावापुढे झिरो-झिरो, एक-एक अथवा एकच नंबर पती-पत्नीच्या नावापुढे नोंदविला गेल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. यामुळे कर्जाची रक्कम बँकेत वळती करताना गोंधळ उडणार असल्याचे लक्षात आले.कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांची नावे बँक स्तरावर जाहीर न करता, ग्रामपंचायत स्तरावर जाहीर करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या अखत्यारित अनेक बँका येतात. त्यामुळे काही नावे दोनदा समाविष्ट झाली. या अडचणीही यावेळी निदर्शनास आल्या. यात बँकांनी आयटी विभागाला दोषी ठरविले. फाईल अपलोड करताना ‘एरर मॅसेज’ येतो. दुरूस्त केलेल्या फाईलमध्येही तोच मॅसेज येतो. मात्र ‘एरर’ काय आहे, हे सांगितले गेले नाही, असे बँक अधिकाºयांनी व्हीसीत सांगितले.नवीन सूचनांकडे लागल्या नजराकर्जमाफीच्या याद्या तयार करताना जिल्हा बँकच नव्हे, तर राष्ट्रीयकृत बँकांनीही अशाच चुका केल्या आहे. यामुळे संपूर्ण याद्याच अडचणीत सापडल्या. परिणामी सध्या कर्जमाफीची प्रक्रिया थांबली. या प्रमुख कारणाने बँकांना नवीन याद्या तयार करण्याची सूचना दिली जाण्याची शक्यता बळावली आहे.१५ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण याद्या क्लिअर होतील. ग्रीन झोनमध्ये सर्वच नावे येतील. मर्यादित कालावधीतच हा संपूर्ण कार्यक्रम पार पडेल.- अमन गावंडेअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक