शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांसाठी ६६७ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:38 IST

उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, त्यातूनच त्यांची शिकार होऊ नये यासाठी जंगलांमध्ये ६६७ पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ४० पाणवठे सौरपंपाच्या मदतीने भरले जात आहे. इतर ठिकाणी टॅँकर आणि पेयजलाच्या पाईपलाईनाला जोडण्यात आले आहे.

ठळक मुद्दे४० ठिकाणी सौरपंप : वाघांचा वावर असणाऱ्या पाणवठ्यावर कॅमेरे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, त्यातूनच त्यांची शिकार होऊ नये यासाठी जंगलांमध्ये ६६७ पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ४० पाणवठे सौरपंपाच्या मदतीने भरले जात आहे. इतर ठिकाणी टॅँकर आणि पेयजलाच्या पाईपलाईनाला जोडण्यात आले आहे.संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची स्थिती बिकट होत आहे. भूजलस्त्रोतात घसरण होत आहे. गावालगतचे पाझर तलाव कोरडे पडले आहे. जंगलातील नाल्यामध्ये पाणीच नाही. यामुळे वन्यप्राणी धरणाकडे धाव घेत आहे. अशा स्थितीत शिकार होण्याची भीती आहे. वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वनविभागाने खास खबरदारी घेतली आहे. कृत्रिम पाणवठ्यांच्या निर्मितीसोबत त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी वनव्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे. वनरक्षकाचेही त्यावर नियंत्रण राहणार आहे.यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १३ हजार ५८४ चौरस किमीचे आहे. यापैकी दोन हजार १६८ किमीचा परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. एकूण भूभागापैकी १५ टक्के क्षेत्र हे जंगलात मोडणारे आहे. जंगली भागामध्ये नदी, नाले आणि तलावातील पाणी हे मुख्य स्त्रोत आहे. गतवर्षी ७४ टक्के पावसाची नोंद झाली. यामुळे जंगल क्षेत्रातील पाण्याचे साठे वेळेपूर्वीच कोरडे पडले. या कारणाने जंगली प्राणी पाण्याच्या शोधात वनवन भटकत आहे. अनेक जंगली प्राण्यांनी गावाकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे.जिल्ह्याच्या जंगलात बिबट, वाघ, तडस, लांडगा, कोल्हा, अस्वल, चितळ, सांबर, निलगाय, वानर, डुक्कर, ससे आणि इतर तृणभक्षी पक्षीही आहेत. या वन्यप्राण्यांसाठी जंगलामध्ये २२५ नैसर्गिक पाणवठे आहेत. तर ४०२ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.या पाणवठ्यावर टँकर आणि जंगलातून गेलेल्या पाईपलाईनच्या लिकेजवरून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ४० ठिकाणी सौर कृषीपंपाच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात आहे.पाणी टाकण्याची स्वयंचलित सोयटिपेश्वर अभयारण्यातील नैसर्गिक पाणवठ्यांत पाणी आहे. कृत्रिम पाणवठ्यांवर सौरपंपाच्या मदतीने पाणी वितरण करण्यात येते. सूर्य वर आल्यानंतर ९ ते १० वाजता सौरपंप सुरू होतो. पाणी पाणवठ्यात जमा होते. सूर्य मावळताच सौरपंप बंद होतो. यामुळे अभयारण्यात प्राण्यांसाठी मुबलक पाणी असते. जंगलात वाघाचा वावर असणारे ठिकाण आणि रस्त्यापासून जवळ असणाºया पाणवठ्यांवर कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणच्या हालचाली वनविभागाला कळणार आहे.टिपेश्वर आणि पैनगंगा अभयारण्यात नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये पाणी आहे. कृत्रिम पाणवठे मदतीला आहेत. या ठिकाणी सौरपंप जोडण्यात आले आहे. याशिवाय वाघाचा वावर असणाºया ठिकाणी कॅमेरे बसविलेले आहेत.- प्रमोद पंचभाईउपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग