शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

प्राण्यांसाठी ६६७ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:38 IST

उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, त्यातूनच त्यांची शिकार होऊ नये यासाठी जंगलांमध्ये ६६७ पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ४० पाणवठे सौरपंपाच्या मदतीने भरले जात आहे. इतर ठिकाणी टॅँकर आणि पेयजलाच्या पाईपलाईनाला जोडण्यात आले आहे.

ठळक मुद्दे४० ठिकाणी सौरपंप : वाघांचा वावर असणाऱ्या पाणवठ्यावर कॅमेरे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, त्यातूनच त्यांची शिकार होऊ नये यासाठी जंगलांमध्ये ६६७ पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ४० पाणवठे सौरपंपाच्या मदतीने भरले जात आहे. इतर ठिकाणी टॅँकर आणि पेयजलाच्या पाईपलाईनाला जोडण्यात आले आहे.संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची स्थिती बिकट होत आहे. भूजलस्त्रोतात घसरण होत आहे. गावालगतचे पाझर तलाव कोरडे पडले आहे. जंगलातील नाल्यामध्ये पाणीच नाही. यामुळे वन्यप्राणी धरणाकडे धाव घेत आहे. अशा स्थितीत शिकार होण्याची भीती आहे. वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वनविभागाने खास खबरदारी घेतली आहे. कृत्रिम पाणवठ्यांच्या निर्मितीसोबत त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी वनव्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे. वनरक्षकाचेही त्यावर नियंत्रण राहणार आहे.यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १३ हजार ५८४ चौरस किमीचे आहे. यापैकी दोन हजार १६८ किमीचा परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. एकूण भूभागापैकी १५ टक्के क्षेत्र हे जंगलात मोडणारे आहे. जंगली भागामध्ये नदी, नाले आणि तलावातील पाणी हे मुख्य स्त्रोत आहे. गतवर्षी ७४ टक्के पावसाची नोंद झाली. यामुळे जंगल क्षेत्रातील पाण्याचे साठे वेळेपूर्वीच कोरडे पडले. या कारणाने जंगली प्राणी पाण्याच्या शोधात वनवन भटकत आहे. अनेक जंगली प्राण्यांनी गावाकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे.जिल्ह्याच्या जंगलात बिबट, वाघ, तडस, लांडगा, कोल्हा, अस्वल, चितळ, सांबर, निलगाय, वानर, डुक्कर, ससे आणि इतर तृणभक्षी पक्षीही आहेत. या वन्यप्राण्यांसाठी जंगलामध्ये २२५ नैसर्गिक पाणवठे आहेत. तर ४०२ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.या पाणवठ्यावर टँकर आणि जंगलातून गेलेल्या पाईपलाईनच्या लिकेजवरून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ४० ठिकाणी सौर कृषीपंपाच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात आहे.पाणी टाकण्याची स्वयंचलित सोयटिपेश्वर अभयारण्यातील नैसर्गिक पाणवठ्यांत पाणी आहे. कृत्रिम पाणवठ्यांवर सौरपंपाच्या मदतीने पाणी वितरण करण्यात येते. सूर्य वर आल्यानंतर ९ ते १० वाजता सौरपंप सुरू होतो. पाणी पाणवठ्यात जमा होते. सूर्य मावळताच सौरपंप बंद होतो. यामुळे अभयारण्यात प्राण्यांसाठी मुबलक पाणी असते. जंगलात वाघाचा वावर असणारे ठिकाण आणि रस्त्यापासून जवळ असणाºया पाणवठ्यांवर कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणच्या हालचाली वनविभागाला कळणार आहे.टिपेश्वर आणि पैनगंगा अभयारण्यात नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये पाणी आहे. कृत्रिम पाणवठे मदतीला आहेत. या ठिकाणी सौरपंप जोडण्यात आले आहे. याशिवाय वाघाचा वावर असणाºया ठिकाणी कॅमेरे बसविलेले आहेत.- प्रमोद पंचभाईउपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग