शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

६६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल

By admin | Updated: March 27, 2015 01:37 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यातील ६६३ ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी होत आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यातील ६६३ ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी होत आहे. बुधवार मध्यरात्रीपासून निवडणुकीची आचारसंहिता ग्रामपंचायत क्षेत्रासाठी लागू झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकीसोबतच जिल्ह्यातील ८१ ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीने ग्रामीण राजकीय वातावरण आता ढवळून निघणार आहे. लोकसभा, विधानसभेनंतर खऱ्या अर्थाने आता गावपातळीवरच्या मंत्रालयासाठी चढाओढ सुरू आहे. सुरूवातीला मे महिन्यापर्यंत कालावधी संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्याच निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. आता मात्र आयोगाने मे ते आॅगस्टपर्यंत कालावधी संपणाऱ्या ६६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यापूर्वी ७ एप्रिल अगोदर प्रशासनाकडून सरपंचाचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. या निवडणुकींच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. निवडणूक खर्चासाठी विधानसभेप्रमाणे निकष ठेवण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते काढून खर्चाचा हिशोब सादर करावा लागणार आहे. नामांकन दाखल करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला ५०० रुपये अनामत अनुसूचित जाती, जमाती आणि नामाप्र प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ग्रामीण भागावर सातत्याने संकटाची मालिका सुरू असताना या निवडणुका लागल्या आहेत. रोजगार आणि कर्जात बुडालेला शेतकरी या दोन समस्यांवर नव्या सरकारला उपाय सापडलेला नाही. त्यामुळे अतिशय विदारक स्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. सध्या गावपुढाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असून, शासनाने उमेदवारांकरिता असलेली जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केली आहे. त्यानंतरही अनेक संवर्गातील उमेदवारांजवळ जात प्रमाणपत्रसुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे एसडीओ कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)