शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

८७ हजार शेतकऱ्यांना ६२८ कोटी पीक कर्ज वाटप

By admin | Updated: July 1, 2015 00:19 IST

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचे प्रयत्न व नियमित बैठकांमुळे जिल्ह्यात २७ जुनपर्यंत ८७ हजार शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप झाले आहे.

यावर्षीची टक्केवारी ३७ : मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचे प्रयत्न व नियमित बैठकांमुळे जिल्ह्यात २७ जुनपर्यंत ८७ हजार शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप झाले आहे. या दिवसांपर्यंत एकूण ६२८ कोटी रुपयांचे वितरण झाले असून वितरणाची ही टक्केवारी ३७ टक्के आहे. गेल्यावर्षी या दिवसापर्यंत वाटपाची ही टक्केवारी केवळ २३ टक्के इतकीच होती. जिल्हाधिकारी संचिद्र प्रताप सिंह येथे रुजू झाल्यानंतर पीककर्ज वाटपाचा विषय प्राधान्याने हाती घेतला. गेल्या हंगामात दुष्काळ राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जाची काळजी लागली होती. बँकांनीही आखडता हात घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी बॅकांची ही मानसिकता ओळखून दर आठवड्याला बैठक घेण्याचे धोरण अवलंबविले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व बँकांच्या सर्व शाखांच्या व्यवस्थापकांची पहिल्यांदाच बैठक घेण्यात आली. जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीसह सर्व शाखा व्यवस्थापकांची प्रत्येकी तीनदा बैठक झाल्याने पिककर्ज वाटपास गती आली.गेल्यावर्षी संपूर्ण वर्षात केवळ ५२ टक्के पिककर्ज वाटप झाले होते. तर गेल्यावर्षी २७ जूनपर्यंत कर्ज वाटपाची ही टक्केवारी केवळ २२ टक्के इतकी होती. या तुलनेत यावर्षी पिककर्ज वाटपाची टक्केवारी ३७ टक्के इतकी आहे. गेल्या संपूर्ण वर्षात एक लाख २३ हजार शेतकऱ्यांना ९२२ कोटी रुपयांच्या पिककर्जाचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी मात्र परवापर्यंत ८७ हजार शेतकऱ्यांना ६२८ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप झाले आहे. गेल्या दोन दिवसात यात आणखी २५ कोटीच्या वाटपाची भर पडली असल्याची शक्यता असून २९ जूनपर्यंत ४० टक्केच्या आसपास पीककर्ज वाटप झाले असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या कर्जामध्ये काही राष्ट्रीयकृत बँकांनी कमालीचे कर्ज वाटप केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात पंजाब नॅशनल बँक ६२ टक्के, आयसीआयसीआय बँक ८४ टक्के, विजया बँक ६८ टक्के, इंडियन बँक ४७ टक्के, इंडियन ओवसिज बँक ४३ टक्के, एक्सीस बँक ७९ टक्के तर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४१ टक्के इतके कर्ज वाटप केले आहे. (प्रतिनिधी)