शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात दररोज ६०० रुग्ण दाखल

By admin | Updated: September 18, 2014 00:09 IST

उमरखेड तालुक्यात विषाणुजन्य रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील सततचा बदल व मध्यंतरी काही दिवस झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी

अविनाश खंदारे - उमरखेड(कुपटी)उमरखेड तालुक्यात विषाणुजन्य रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील सततचा बदल व मध्यंतरी काही दिवस झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली आहे. अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे विविध आजारांची साथ तालुक्यात पसरली असून, शासकीय रुग्णालयात दररोज ६०० वर रुग्ण दाखल होत आहे. मोठ्या संख्येने शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल होत असले तरी त्यांची योग्य दखल मात्र रुग्णालयाकडून घेतल्या जात नसल्याचे दिसून येते. याला विविध कारणे आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये तापाचे प्रमाण अधिक आहे. शासकीय रुग्णालयात आवश्यक ती औषधी उपलब्ध नसल्याचीे ओरड रुग्णांमधून होत आहे. रुग्णांना त्वरित सेवा देण्यासाठी डॉक्टरसुद्धा वेळेवर हजर नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आयुष वैद्यकीय अधिकारी असलेले दोन डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात. रुग्णांसाठी असलेल्या सोयी-सुविधा बंद पडल्या असून, त्या केवळ कागदावर सुरू आहेत. रक्त, लघवी, थुंकी तपासणीसाठी असलेली प्रयोगशाळा गेल्या तीन महिन्यांपासून तंंत्रज्ञा अभावी रामभरौसे आहे. त्यामुळे विषाणूजन्य रुग्ण, हिवताप, डायफाईड, गरोदर माता यांना रक्ततपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेतचा आधार घ्यावा लागतो. येथील प्रत्येक वार्डात दररोज ३० हून अधिक रुग्ण दाखल होतात. रुग्णसंख्येच्या तुलनेत आवश्यक औषधी पुरवठा नसल्याने अनेक रुग्णांना खासगी मेडिकलमधून आर्थिक भुर्दंड सहन करून औषधी खरेदी करावी लागते. क्षुल्लक आजारांसाठीसुद्धा शासकीय रुग्णालयामधून नांदेडला रेफर केले जाते. स्थानिक रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून वागणूकसुद्धा निट दिल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. येथे दोन रुग्णवाहिका असून, एक अनेक दिवसांपासून नादुरूस्त आहे. त्यामुळे एकाच रुग्णवाहिकेवर भार पडत आहे. अशावेळी एकाचवेळी एक पेक्षा अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज पडल्यास खासगी वाहनांचा अधिक पैसे देऊन वापर करावा लागतो. क्षुल्लक कारणामुळे रुग्णवाहिका बंद आहे, परंतु रुग्णालय प्रशासन मात्र त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. रुग्णालयात असलेल्या अनेक सोयी-सुविधा बंद पडल्या असून, त्या पूर्ववत करण्याबाबत ठोस कारवाईच केल्या जात नसल्याचे दिसून येते. लहान मुलांना लागणारी औषधी उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्याप्रमाणात इतरत्र रेफर केले जात आहे. गोरगरीबांना ऐपत नसतानाही नाईलाजाने खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे.