शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

रुग्णालयात दररोज ६०० रुग्ण दाखल

By admin | Updated: September 18, 2014 00:09 IST

उमरखेड तालुक्यात विषाणुजन्य रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील सततचा बदल व मध्यंतरी काही दिवस झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी

अविनाश खंदारे - उमरखेड(कुपटी)उमरखेड तालुक्यात विषाणुजन्य रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील सततचा बदल व मध्यंतरी काही दिवस झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली आहे. अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे विविध आजारांची साथ तालुक्यात पसरली असून, शासकीय रुग्णालयात दररोज ६०० वर रुग्ण दाखल होत आहे. मोठ्या संख्येने शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल होत असले तरी त्यांची योग्य दखल मात्र रुग्णालयाकडून घेतल्या जात नसल्याचे दिसून येते. याला विविध कारणे आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये तापाचे प्रमाण अधिक आहे. शासकीय रुग्णालयात आवश्यक ती औषधी उपलब्ध नसल्याचीे ओरड रुग्णांमधून होत आहे. रुग्णांना त्वरित सेवा देण्यासाठी डॉक्टरसुद्धा वेळेवर हजर नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आयुष वैद्यकीय अधिकारी असलेले दोन डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात. रुग्णांसाठी असलेल्या सोयी-सुविधा बंद पडल्या असून, त्या केवळ कागदावर सुरू आहेत. रक्त, लघवी, थुंकी तपासणीसाठी असलेली प्रयोगशाळा गेल्या तीन महिन्यांपासून तंंत्रज्ञा अभावी रामभरौसे आहे. त्यामुळे विषाणूजन्य रुग्ण, हिवताप, डायफाईड, गरोदर माता यांना रक्ततपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेतचा आधार घ्यावा लागतो. येथील प्रत्येक वार्डात दररोज ३० हून अधिक रुग्ण दाखल होतात. रुग्णसंख्येच्या तुलनेत आवश्यक औषधी पुरवठा नसल्याने अनेक रुग्णांना खासगी मेडिकलमधून आर्थिक भुर्दंड सहन करून औषधी खरेदी करावी लागते. क्षुल्लक आजारांसाठीसुद्धा शासकीय रुग्णालयामधून नांदेडला रेफर केले जाते. स्थानिक रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून वागणूकसुद्धा निट दिल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. येथे दोन रुग्णवाहिका असून, एक अनेक दिवसांपासून नादुरूस्त आहे. त्यामुळे एकाच रुग्णवाहिकेवर भार पडत आहे. अशावेळी एकाचवेळी एक पेक्षा अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज पडल्यास खासगी वाहनांचा अधिक पैसे देऊन वापर करावा लागतो. क्षुल्लक कारणामुळे रुग्णवाहिका बंद आहे, परंतु रुग्णालय प्रशासन मात्र त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. रुग्णालयात असलेल्या अनेक सोयी-सुविधा बंद पडल्या असून, त्या पूर्ववत करण्याबाबत ठोस कारवाईच केल्या जात नसल्याचे दिसून येते. लहान मुलांना लागणारी औषधी उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्याप्रमाणात इतरत्र रेफर केले जात आहे. गोरगरीबांना ऐपत नसतानाही नाईलाजाने खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे.