शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

‘मजीप्रा’च्या सेवानिवृत्तांना ६० टक्केच पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 21:36 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या निवृत्ती वेतनाला कात्री लावली आहे. आॅगस्ट महिन्याची पेन्शन ६० टक्केच दिल्याने ११ हजार सेवानिवृत्तांमध्ये चीड व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसन्मानाला ठेच : आर्थिक टंचाईचा कांगावा, संपूर्ण डोलारा निवृत्त कर्मचाºयांवर, मार्गदर्शनाचा यंत्रणेला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या निवृत्ती वेतनाला कात्री लावली आहे. आॅगस्ट महिन्याची पेन्शन ६० टक्केच दिल्याने ११ हजार सेवानिवृत्तांमध्ये चीड व्यक्त होत आहे. आर्थिक टंचाईचा कांगावा करत पेन्शन कमी देऊन ‘मजीप्रा’ने सेवानिवृत्तांच्या सन्मानाला ठेच पोहोचविली आहे.शासनाने उत्पन्नाचे स्रोत कमी केल्याने ‘मजीप्रा’चा आर्थिक डोलारा कोसळत चालला आहे. पाणीकराच्या वसुलीवर तेवढा हा विभाग तग धरून आहे. हातावर आणून पानावर खाने सुरू आहे. आता तर कार्यरत कर्मचाºयांचे वेतन आणि निवृत्तांना सेवानिवृत्ती वेतनाचेही वांदे निर्माण झाले आहे. सेवानिवृत्तांना आॅगस्ट महिन्याचे सप्टेंबरमध्ये ६० टक्केच वेतन देण्यात आले आहे.ज्येष्ठ नागरिक या कक्षेत येत असलेल्या ‘मजीप्रा’तील काही सेवानिवृत्तांना गाठचाच मोठा आधार आहे. नियमित औषधोपचार, कुटुंबाचा खर्च भागविताना त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. मिळणाºया सेवानिवृत्ती वेतनातून खर्च भागत नाही. अशातच आॅगस्टची ६० टक्केच पेन्शन देऊन त्यांच्या अडचणीत भरच घातली गेली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. अनेक सेवानिवृत्तांना वर्षभराचा कालावधी लोटूनही अंशदान, उपदान मिळालेले नाही. निवृत्तीनंतर मिळणाºया रकमेतून घराचे स्वप्न पूर्ण करण्याची मनीषा बाळगणाºयांना अजूनही भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. पेन्शनमधून भाडे चुकवून उरलेल्या रकमेतून घर चालविताना सर्कस करावी लागत आहे. असे असताना आता त्यालाही कात्री लाऊन त्यांच्या अडचणीत भर टाकली आहे. वास्तविक सेवानिवृत्तांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी सेवानिवृत्ती वेतन दिले जाते. मात्र या वेतनातच कपात करण्यात आल्याने खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.आर्थिक लाभाला ब्रेक‘मजीप्रा’ने कर्मचाºयांच्या बहुतांश आर्थिक लाभाला ब्रेक दिला आहे. वाढीव महागाई भत्ता, २४ वर्षानंतरची कालबध्द पदोन्नती, वाढीव वाहतूक भत्ता, अंशदान, उपदान देण्यात आलेले नाही. सहा महिन्यांपूर्वी शासन निर्णय घेण्यात आला. मजीप्रा कर्मचाºयांच्या वेतन भत्त्याचे दायित्व स्वीकारत असल्याचे याद्वारे जाहीर करण्यात आले. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. हा निर्णय सुमारे १५ हजार कर्मचाºयांच्या तोंडाला पाने पुसणारा ठरल्याची भावना या कर्मचाºयांमध्ये निर्माण झाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नसल्याची ओरड आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारीच या विभागाचे मार्गदर्शक ठरत आहे. अनेक सेवानिवृत्तांनी या विभागात काही मानधनावर सेवा देणे सुरू केले आहे. त्यांचे मार्गदर्शन आणि अनुभवाचा फायदा या विभागाला होत आहे. तरीही त्यांच्याच सेवानिवृत्ती वेतनाला विभागाकडून कात्री लावली जात असल्याने रोष व्यक्त होत आहे.कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना पूर्ण वेतन देण्यात आले. सेवानिवृत्तांच्या वेतनात कपात करण्यात आली. हा दुजाभाव आहे. ‘मजीप्रा’ सेवानिवृत्त कर्मचाºयांचे शिष्टमंडळ वरिष्ठांना भेटून हा गंभीर प्रश्न मांडणार आहे.- आर.एन. विठाळकर,सरचिटणीस ‘मजीप्रा’ कर्मचारी महासंघ