शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

सिंचन विहिरींचे ६० कोटी रखडले

By admin | Updated: July 17, 2014 00:19 IST

सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पाहत शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरी बांधल्यात. वेळेवर निधी मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उधार उसणे पैसे घेऊन बांधकाम केले.

पाच हजार विहिरी : दोन वर्षांपासून काम प्रक्रियेतचयवतमाळ : सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पाहत शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरी बांधल्यात. वेळेवर निधी मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उधार उसणे पैसे घेऊन बांधकाम केले. केवळ ३५ कोटी १३ लाख रुपयेच लाभार्थ्यांना देण्यात आले असून अद्यापही ५९ कोटी ६० लाख रुपयांचे वाटप प्रक्रियेत रखडले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.जिल्ह्यात चार हजार ९८६ विहिरींना मंजुरी देण्यात आली. त्यासाठी ९४ कोटी ७३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २०१२ पासूनच्या विहिरींचा समावेश आहे. फेब्रुवारी २०१४ पर्यंत या विहिरींचे काम सुरूच होते. यातील अनेक विहिरी अर्धवटही सोडून देण्यात आल्या आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना ३५ कोटी १३ लाख रुपये अनुदान वाटण्यात आले. रोहयोच्या विहिरीसाठी ईश्वर चिठ्ठीने तर काही ठिकाणी ग्रामसभेने लाभार्थी निवड केली. त्यानंतर हे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले. सिंचनाचे स्वप्न पूर्ण होणार म्हणून निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानाची वाट न पाहताच कामाला सुरुवात केली. दुहेरी उद्देशाने ही योजना शासनाकडून राबविली जात आहे. यामध्ये अकुशल आणि कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा उद्देश होता. शिवाय शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहीर उपलब्ध करून देणे होता. याच उद्देशाने योजनाही राबविण्यात आली. ग्रामपंचायतीकडून भरभरून प्रतिसादही मिळाला. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने जवळच्या रकमा विहिरीच्या कामात गुंतविल्या. काहींना तर पदरमोड करून कर्जाऊ रकमा घ्याव्या लागल्या. शासनाचे काम आहे. वेळेवर पैसा मिळणारच नाही, हे हेरून शेतकऱ्यांनी अगोदरच कर्ज उचलताना परतफेडीसाठी अधिकची मुदत मागून घेतली. मात्र मंजुरी आणि फाईलचा टेबल टू टेबल चालणारा प्रवास या कचाट्यात शेतकऱ्याचे बजेट कोलमडले. अनेकांना कर्जाची मुदतही संपल्यानंतर विहिरीचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली. काहींना तर चक्क पंचायत समितीस्तरावर कमिशनचीच मागणी करण्यात येऊ लागली. ठेकेदारांनी पोसलेल्या यंत्रणेला कमिशनचे बोट दाखविल्याशिवाय फाईल सरकत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)