शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

५९ गावांत रबी उद्ध्वस्त

By admin | Updated: February 29, 2016 01:57 IST

वादळी पावसासह झालेल्या गारपिटीचा जिल्ह्यातील ५९ गावांना जबर फटका बसला.

कोट्यवधींचे नुकसान : पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देशयवतमाळ : वादळी पावसासह झालेल्या गारपिटीचा जिल्ह्यातील ५९ गावांना जबर फटका बसला. शेकडो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांचे रबी पीक उद्ध्वस्त झाले आहे. सर्वाधिक नुकसान पुसद आणि उमरखेड तालुक्यात झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीचा फटका उमरखेड, पुसद, महागाव, दिग्रस, नेर, बाभूळगाव या तालुक्यांना बसला. पुसद तालुक्यातील २० गावांना गारपिटीने झोडपून काढले. यात साडेतीन हजार हेक्टरवरील रबी पिक उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. उमरखेड तालुक्यातील ११ गावांना गारपिटीचा तडाखा बसला असून एक हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. दुसऱ्या दिवशीही शेतामध्ये गारांचे खच दिसत होते. महागाव तालुक्यातील सात गावांना गारपिटीचा फटका बसला असून ३५८ हेक्टरवर नुकसान झाले. बाभूळगाव तालुक्यातील १३ गावांना फटका बसला. शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, केळी, संत्रा आणि आंबा मोहोरचे नुकसान झाले आहे. (लोकमत चमू) उमरखेड-पुसदमध्ये सर्वाधिक नुकसानगारांचा तडाखा : बाभूळगावच्या १३ गावांना फटका यवतमाळ : शनिवारी झालेल्या गारपिटीचा सर्वाधिक तडाखा पुसद आणि उमरखेड तालुक्याला बसला आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून उमरखेड तालुक्यातील काही गावात दुसऱ्या दिवशीही गारांचा खच दिसून आला. तर बाभूळगाव तालुक्यातील १३ गावांना या गारपिटीचा फटका बसला. पुसद प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यात यावर्षी साडेचार हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली होती. शनिवारी झालेल्या वादळी पावसासह गारपिटीत साडेतीन हजार हेक्टरवरील गहू, हरभरा आणि फळबागांचे नुकसान झाले. यात अंदाजे २० कोटी रुपये नुकसान झाल्याची माहिती आहे. सर्वाधिक फटका वरूड, गौळ आणि पुसद सर्कलला बसला. वरुड आणि पुसदमध्ये प्रत्येकी एक हजार हेक्टर, गौळमध्ये ५०० हेक्टर, खंडाळा सर्कलमध्ये १०० हेक्टर, बेलोरा ५०० हेक्टर, शेंबाळपिंपरी १०० हेक्टर, जांबबाजार आणि ब्राम्हणगाव येथे प्रत्येकी दहा हेक्टर गहू पिकाचे नुकसान झाले. तालुक्यात कुठेही प्राणहानी झाली नाही. मात्र रबीचे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शनिवारी गारपीट थांबल्यानंतर उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले आणि नायब तहसीलदार देवानंद धबाले यांनी गारपीटग्रस्त मोहा, भाटंबा, इंदिरानगर परिसराची पाहणी केली. उमरखेड येथील शहर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील टाळकी, राजापूर, तिवडी, विडूळ, झाडगाव, चालगणी, साखरा, लिंबगव्हाण, नागेशवाडी, वरुड बिबी आदी ११ गावांना गारपिटीचा तडाखा बसला. २४ तासानंतरही अनेक गावात गारांचे थर दिसून येत होते. एक हजार ३२ हेक्टरवरील पिकांचे झाले. आमदार राजेंद्र नजरधने यांनी ११ गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या सोबत महसूल व कृषी विभागाचे अधिकारी होते. टाकळी शिवारात झालेल्या जोरदार गारपिटीत एक म्हैस, शेळी आणि गाय असे तीन जनावरे दगावली. बाभूळगाव प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी धो-धो पावसासह गारांचा पाऊस कोसळला. त्यामुळे बाभूळगाव तालुक्यातील आलेगाव, आसेगाव, गळव्ही, पिंपळगाव, बाभूळगाव, कोपरा जानकर, यावली, माहुली, राणी अमरावती, दाभा, पहूर, नागरी, नागरगाव, चेंडकापूर, डेहणी आदी गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार अशोक उईके यांनी नुकसानग्रस्त गावाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी तहसीलदार एम.बी. मेश्राम, गटविकास अधिकारी रमेश दोडके, तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर, लक्ष्मण लखमोड, सतीश मानलवार, चुडामण मदारे, किशोर दामोधर, डॉ. सुद्दलवार, अविनाश दहेकर, विनोद लोखंडे, सुमतीलाल लुणावत आदी उपस्थित होते. नुकसानीच्या सर्वेक्षणासंदर्भात सोमवारी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी विभागांच्या कर्मचाऱ्यांची सभा तहसील कार्यालयात आयोजित असून नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. (लोकमत चमू)सतर्कतेचा इशारा बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या वाट्यावर असल्याने जिल्ह्याला आठ दिवस सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यात पावसासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली असून काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.