शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

जिल्हा परिषद सभागृहात दिसणार ५७ नवीन चेहरे

By admin | Updated: February 27, 2017 00:47 IST

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ५७ सदस्य नवखे निवडून आले असून १९६२ मध्ये जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर जशी सदस्यांची स्थिती होती,

केवळ चारच अनुभवी : प्रशासनाला पहिल्या सभेची उत्सुकता रवींद्र चांदेकर  यवतमाळ जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ५७ सदस्य नवखे निवडून आले असून १९६२ मध्ये जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर जशी सदस्यांची स्थिती होती, तशीच यंदा जिल्हा परिषद सभागृहाची झाली आहे. केवळ चार सदस्य अनुभवी असून तेही आपल्या कार्यकाळात फारसे आक्रमक नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सदस्यांवर प्रशासन हावी होणार, हे निश्चित. ६१ सदस्यांपैकी तब्बल ५७ सदस्य पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची पायरी चढत आहे. यापूर्वी ते कधीही जिल्हा परिषदेचे सदस्य नव्हते. उर्वरित चार सदस्य एकदा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यामुळे यावेळी अननुभवी सदस्यांची गर्दी वाढली आहे. यापूर्वीच्या सभागृहात अनेक अनुभवी आणि अभ्यासू सदस्य होते. त्यात बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, देवानंद पवार, अमोल राठोड आदींचा समावेश होता. हे सर्व सदस्य दोन किंवा त्यापेक्षा जास्तवेळ जिल्हा परिषदेत निवडून आले होते. मात्र यावेळी काहींनी रिंगणातूनच माघार घेतली, तर काहींना निवडणूक लढवूनही अपयश आले. परिणामी अनेक अननुभवी सदस्य जिल्हा परिषदेत पोहोचले आहेत. चार अनुभवी सदस्यांमध्ये वरध-झाडगाव गटातून विजयी झालेले भाजपाचे चित्तरंजन कोल्हे, नांझा-मेंढला गटातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या जया पोटे, मुडाणा-फुलसावंगीतून विजयी झालेले शिवसेनेचे डॉ. बी.एन. चव्हाण आणि मोख-आरंभी गटातून विजयी झालेल्या शिवसेनेच्या विद्यमान सदस्य डॉ. रूक्मीणी उकंडे यांचा समावेश आहे. हे चारही सदस्य अभ्यासू असल्याचे यापूर्वी दिसून आले. या निवडणुकीत तातू देशमुख, देवानंद पवार, दादाराव गव्हाळे, महादेव सुपारे, सीमा तेलंगे, शरद चिकाटे, मंगल मडावी, योगेश पारवेकर, सुलोचना भोयर, सुभाष ठोकळ, लता खांदवे, आरती फुपाटे, मुबारक तंवर, ययाती नाईक, गोदावरी इंगळे आदी आजी-माजी सदस्यांचा पराभव झाला. ते सभागृहात पोहोचले असते, तर अभ्यास व सभागृह दणाणून सोडणाऱ्या सदस्यांचा कोरम पूर्ण झाला असता. आता ही जबाबदारी नवख्या सदस्यांवर येऊन पडली आहे. अन्यता प्रशासन त्यांच्यावर भारी पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा वचक राहणार जिल्हा परिषदेत बहुतांश सदस्य नवखे असले, तरी यापुढे प्रशासनावर शिवसेनेचा वचक राहण्याची शक्यता आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विश्वासातील सदस्य अध्यक्षपदी आरूढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांचा जिल्हा परिषदेतील वावर वाढणार आहे. त्यांचे बंधू विजय राठोड यांच्या हाती सर्व सूत्रे राहण्याची शक्यता आहे. कदाचित उपाध्यक्षपदी विजय राठोड विराजमान होण्याचीही दाट शक्यता आहे. एकप्रकारे आता जिल्हा परिषदेवर भगवे वादळ घोंगावण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी प्रशासनाच्या वरचढ ठरण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार आहे.