शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

पैनगंगेच्या काठावरील ५४ गावे तहानलेली

By admin | Updated: May 25, 2014 00:00 IST

तालुक्यातील पैनगंगा नदीकाठीच्या ५४ गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र अधिकार्‍यांच्या नियोजनशून्यतेमुळे टंचाईग्रस्त

उमरखेड (कुपटी) : तालुक्यातील पैनगंगा नदीकाठीच्या ५४ गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र अधिकार्‍यांच्या नियोजनशून्यतेमुळे टंचाईग्रस्त गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे पाणीटंचाई कायम असून माजी आमदारासह गावकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर उमरखेडच्या तहसीलदारांनी संबंधित उपअभियंत्याच्या विरोधात अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे.

उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीतीरावरील ५४ गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडवावे या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. शेवटी इसापूर धरणातून पाच दशलक्ष पाणी सोडण्याचा निर्णय झाला. पाणी सोडण्यात आले. मात्र प्रत्यक्षात टंचाईग्रस्त गावापर्यंंत पाणी पोहोचलेच नाही. पाणीटंचाईसंदर्भात परिस्थिती पाहून आमदार विजय खडसे व तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या प्रयत्नाला खो देत प्रकल्पाच्या उपविभाग क्र. १ चे उपअभियंत्याच्या चुकीच्या नियोजनाने ३.१५ टीसीएम पाणी टंचाईग्रस्तांना मिळाले नाही. याबाबत आमदार खडसे यांनी चांगलीच कान उघाडणी केली. तर तहसीलदार सचिन शेजाळ यांनी अभियंत्याच्या विरोधात अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे. पाच दशलक्ष घनमीटर पाणी पात्रात सोडण्यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश आला होता. त्यानुसार भीषण पाणीटंचाई असणार्‍या लिंगी, मुरली, सहस्त्रकुंड, पेंदा, बिटरगाव, सावळेश्‍वर, पिंपळगाव, लोहरा, देवसरी, चातारी, संगम चिंचोलीसह अनेक गावांना पाणी कसे द्यायचे याचा आराखडा तहसीलदार शेजाळ यांनी उध्र्व पैनगंगा प्रकल्पाच्या अभियंत्याला दिला. परंतु त्यांनी ३.१५ टीसीएम पाण्याचा अपव्यय केला. यासंदर्भात दत्तराव शिंदे, भीकू जाधव, डॉ. भगवान देवसरकर, प्रेमराव वानखडे, चक्रधर देवसरकर, शिवाजी वानखडे यांच्यासह अनेकांनी संबंधित अधिकार्‍याच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन दिले. तर उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी चुकीचे काम करणार्‍या उपअभियंत्यावर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या विरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. नियोजनशून्यतेमुळे पैनगंगा तीरावरील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकात तीव्र असंतोष पसरला आहे. (वार्ताहर)