शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

पैनगंगेच्या काठावरील ५४ गावे तहानलेली

By admin | Updated: May 25, 2014 00:00 IST

तालुक्यातील पैनगंगा नदीकाठीच्या ५४ गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र अधिकार्‍यांच्या नियोजनशून्यतेमुळे टंचाईग्रस्त

उमरखेड (कुपटी) : तालुक्यातील पैनगंगा नदीकाठीच्या ५४ गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र अधिकार्‍यांच्या नियोजनशून्यतेमुळे टंचाईग्रस्त गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे पाणीटंचाई कायम असून माजी आमदारासह गावकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर उमरखेडच्या तहसीलदारांनी संबंधित उपअभियंत्याच्या विरोधात अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे.

उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीतीरावरील ५४ गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडवावे या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. शेवटी इसापूर धरणातून पाच दशलक्ष पाणी सोडण्याचा निर्णय झाला. पाणी सोडण्यात आले. मात्र प्रत्यक्षात टंचाईग्रस्त गावापर्यंंत पाणी पोहोचलेच नाही. पाणीटंचाईसंदर्भात परिस्थिती पाहून आमदार विजय खडसे व तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या प्रयत्नाला खो देत प्रकल्पाच्या उपविभाग क्र. १ चे उपअभियंत्याच्या चुकीच्या नियोजनाने ३.१५ टीसीएम पाणी टंचाईग्रस्तांना मिळाले नाही. याबाबत आमदार खडसे यांनी चांगलीच कान उघाडणी केली. तर तहसीलदार सचिन शेजाळ यांनी अभियंत्याच्या विरोधात अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे. पाच दशलक्ष घनमीटर पाणी पात्रात सोडण्यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश आला होता. त्यानुसार भीषण पाणीटंचाई असणार्‍या लिंगी, मुरली, सहस्त्रकुंड, पेंदा, बिटरगाव, सावळेश्‍वर, पिंपळगाव, लोहरा, देवसरी, चातारी, संगम चिंचोलीसह अनेक गावांना पाणी कसे द्यायचे याचा आराखडा तहसीलदार शेजाळ यांनी उध्र्व पैनगंगा प्रकल्पाच्या अभियंत्याला दिला. परंतु त्यांनी ३.१५ टीसीएम पाण्याचा अपव्यय केला. यासंदर्भात दत्तराव शिंदे, भीकू जाधव, डॉ. भगवान देवसरकर, प्रेमराव वानखडे, चक्रधर देवसरकर, शिवाजी वानखडे यांच्यासह अनेकांनी संबंधित अधिकार्‍याच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन दिले. तर उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी चुकीचे काम करणार्‍या उपअभियंत्यावर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या विरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. नियोजनशून्यतेमुळे पैनगंगा तीरावरील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकात तीव्र असंतोष पसरला आहे. (वार्ताहर)