शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

यवतमाळ जिल्ह्यात ५०९० शेततळे पूर्ण; राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 14:22 IST

राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेत यवतमाळ जिल्ह्यात ५०९० शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. लक्षांकापेक्षा अधिक शेततळे निर्माण करून यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

ठळक मुद्देकोरडवाहू क्षेत्रात संरक्षित सिंचनात वाढ

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेत यवतमाळ जिल्ह्यात ५०९० शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. लक्षांकापेक्षा अधिक शेततळे निर्माण करून यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या शेततळ्यांमुळे संरक्षित सिंचनात वाढ होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.

राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याने सिंचन क्रांतीकडे वाटचाल सुरू केली आहे.यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा. सिंचनाचे सात ते आठ टक्के जेमतेम क्षेत्र. उर्वरित ९२ टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून. त्यातही अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी आणि अनिश्चित झाले. त्याचा परिणाम विपरित उत्पादनावर होऊ लागला. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढले तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, हेच हेरून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी मागेल त्याला शेततळे योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. शासनाने ७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयाने ही योजना जिल्ह्यात सुरू केली. २४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यात केवळ १६४९ शेततळे पूर्ण झाले. मात्र जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्याचे सूत्र हाती घेतले आणि अवघ्या ९० दिवसात ३०१६ शेततळे पूर्ण केले. विशेष म्हणजे, जिल्ह्याला ४५०० शेततळ्यांचा लक्षांक असताना ५०९० शेततळे पूर्ण झाले.ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपाय योजले. महसूल आणि कृषी विभागात समन्वय निर्माण करून शेततळ्यासाठी नियोजन करण्यात आले. प्रसार माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. लोक प्रतिनिधींचा सहभागही वाढविला. समूह पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले. एवढेच नाही तर दररोज सायंकाळी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप व ई-मेलद्वारे योजनेची प्रगती आणि अहवालाचे संकलन करण्यात आले. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच जिल्ह्यात शेतशिवारात शेततळे निर्माण झाले. प्रशासकीय अधिकाऱ्याने मनावर घेतले तर योजना कशी यशस्वी होते, याचे हे उदाहरण ठरले आहे. विशेष म्हणजे, अल्पावधीत लक्षांक पूर्ण करून शेततळे निर्मितीत यवतमाळ जिल्ह्यात राज्यात अव्वल ठरला आहे.भूजल स्त्रोत वाढणारजिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे भूजल स्त्रोत वाढण्यास मदत होणार आहे. शेततळ्यांमुळे संरक्षित सिंचनाद्वारे जवळपास ५०९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून रबीच्या क्षेत्रातही वाढ होणार आहे. भविष्यात पडलेला पाऊस जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरविण्यासाठी ही योजना वरदान ठरणार आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी शेततळे ही योजना वरदान आहे. यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर सर्वप्रथम सिंचन क्षेत्र वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. शेततळे योजना प्रभावीपणे राबविण्यात जिल्ह्यात राबविण्यात आली. प्रत्येक विभागनिहाय बैठक घेऊन शेतकऱ्यांना शेततळ्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. सर्वांच्या सहकार्यामुळे लक्षांकापेक्षा अधिक शेततळे निर्माण झाले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी निश्चितच होणार आहे.- डॉ.राजेश देशमुखजिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती