शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

‘अ‍ॅन्युईटी’च्या रस्त्यांसाठी ५०० किमीचे पॅकेज; मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:09 IST

कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी वांध्यात सापडलेल्या ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ रस्त्यांच्या कार्यक्रमांसाठी आता थेट ५०० किलोमीटरचे पॅकेज तयार करून बड्या कंपन्यांना आॅफर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे.

ठळक मुद्देतुकड्यांऐवजी बिग बजेट

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी वांध्यात सापडलेल्या ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ रस्त्यांच्या कार्यक्रमांसाठी आता थेट ५०० किलोमीटरचे पॅकेज तयार करून बड्या कंपन्यांना आॅफर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. २३ फेब्रुवारी रोजी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले.‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’ ही सार्वजनिक बांधकाम खात्याची रस्त्यांसाठी महत्वाकांक्षी योजना आहे. परंतु या योजनेला राज्यातील प्रमुख बांधकाम कंत्राटदारांकडून विदर्भ-मराठवाड्यासह काही भागात प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे कंत्राटदारांची सोय म्हणून कार्यक्रमातील शर्ती-अटींमध्ये काही बदल करण्यात आले. शंभर किलोमीटरच्या पॅकेजचे अंतर ५० किलोमीटरवर आणण्यात आले. परंतु त्यानंतरही ‘नो-रिस्पॉन्स’ कायम आहे. आता आणखी तुकडे पाडून २० किंवा १० किलोमीटरचे पॅकेजेस् (कामे) केले जातील, असा अंदाज अभियंते व कंत्राटदारांचा होता. मात्र शासनाने तुकड्या-तुकड्यांऐवजी बिग बजेटला पसंती दर्शविली.या रस्त्यांच्या पॅकेजेस्साठी दुसऱ्या मागणीत एकच निविदा प्राप्त झाली असेल तर ती आता उघडली जाणार आहे. दुसऱ्यांदा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नसेल तर त्या प्रादेशिक विभागात ५०० किमी किंवा त्यापेक्षा जास्त किलोमीटर अंतराचे एकच पॅकेज तयार करून निविदा काढली जाणार आहे. रस्त्यांच्या पॅकेजेस्मध्ये राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा घोषित झाला असेल तर ती लांबी पॅकेजेस्मधून वगळली जाणार आहे. त्याऐवजी नवी कामे प्रस्तावित केली जाणार आहे. देशातील बांधकाम क्षेत्रातील काही बड्या कंपन्या सरकारला ‘अ‍ॅप्रोच’ झाल्या आहेत. त्यांनी बिग बजेट कामांमध्ये इन्टरेस्ट दाखविला. त्यांची ही तयारी पाहूनच सरकारने किमान ५०० किलोमीटरचे एकच मोठे काम काढण्याचा निर्णय घेतला. चार-पाच जिल्ह्यांमिळून हे एकच पॅकेज राहू शकते.

केवळ पश्चिम महाराष्ट्रात प्रतिसादया रस्त्यांना दुसऱ्या वेळी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, नाशिक या भागात प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यात केवळ औरंगाबादमध्ये तर विदर्भात नागपूर व अमरावतीतच प्रतिसाद मिळाला. अमरावतीमध्ये पाच तर नागपुरात दोन कामे मंजूर झाली. म्हणूनच अन्य जिल्ह्यांसाठी बिग बजेट पॅकेजचा निर्णय घेतला गेला. लांब अंतर व दुर्गम क्षेत्रात येणारी रस्त्यांची काही कामे ‘ईपीसी’पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा