शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या १७ लाखाने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गत ५० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या पावणे तीन पटीने वाढली आहे. पूर्वी १० लाख असलेली ...

ठळक मुद्दे४८ टक्के नागरिकांवर ५२ टक्के नागरिकांचा भार : जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न केवळ १८१ रूपये

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत ५० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या पावणे तीन पटीने वाढली आहे. पूर्वी १० लाख असलेली लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २७ लाख झाली आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येत १७ लाख वाढ नोंदविण्यात आली आहे. लोकसंख्या वाढत असली तरी निम्मे लोक कामकाज करतात आणि निम्मे लोक त्यावर विसंबून आहेत. वाढत्या गरजांच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न मात्र कमी आहे. यामुळे बहुतांश कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा आहे.१९६१ केंद्र शासनाने जिल्ह्याची जनगणना केली, त्यावेळी जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख ९८ हजार ४७० होती. त्यावेळी लोकसंख्येचा दशवार्षिक वृध्दीदर १७.८६ होता. त्यावेळी ग्रामीण भागात नऊ लाख ५९ हजार ९४५ नागरिक राहत होते. तर एक लाख ३८ हजार ५२५ नागरिकांचा भार शहरावर होता. ५० वर्षापूर्वीपासून शहर आणि ग्रामीण भागात विकासाची स्पर्धा होती. प्रारंभी काही वर्षे ग्रामीण भागाकडे नागरिकांचा ओढा होता. यानंतरच्या कालखंडात शहरातील विकास कामांची गती वाढत गेली. तसतसा शहराकडे जाणारा नागरिकांचा लोंढा वाढत गेला.गत वर्षामध्ये जिल्ह्यात लोकसंख्येचा वृध्दीदर सतत वाढत राहिला आहे. रोजगाराच्या संधी शोधत काही नागरिक शहरात वास्तव्याला आले आहे. यामुळे शहराची लोकसंख्या वाढत गेली आहे. २०११ मध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय जनगणना पूर्ण केली. या जनगणने नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २७ लाख ७२ हजार ३४८ झाली आहे. एकूण लोक संख्येच्या ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्याला आहे. तर तीस टक्के नागरिक शहरात वास्तव्याला आहे. २१ लाख ७२ हजार ३४८ लोक ग्रामीण भागात राहतात. तर पाच लाख ९८ हजार १५३ नागरिक शहरात राहतात. सध्याचा लोकसंख्येचा वृध्दीदर १२.७८ पर्यंत खाली आला आहे. परंतु ५० वर्षांचा तुलनात्मक अभ्यास केला तर ५० वर्षापूर्वी एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक शहरात राहत होते. आता हा आकडा ३० टक्क्यांवर आला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे.शिक्षण, रोजगार आणि सोई सुविधा यामुळे शहरी भागात लोकसंख्या वर्षागणिक वाढत आहे. शहराचा भूभागही वाढत आहे. याशिवाय गावाची लोकसंख्या कमी होत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत रोजगारामध्ये पाहिजे तशी वाढ झाली नाही. याचे कारणही तसेच आहे.जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न १८२ रूपयेअंकेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न १८२ रूपये आहे. हातात पडणारे हे उत्पन्न कुटुंबासाठी अपुरे आहे. यामुळे कृषीसह इतर क्षेत्रात कर्ज घेऊन उद्योग उभारण्यासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळतात.स्त्री पुरूष असमानता कायमचजिल्ह्याच्या दरहजारी स्त्री पुरूष गणनेचा विचार केला तर जिल्ह्यात सरासरी दरहजारी पुरूषामागे ९५२ स्त्रिया आहेत. ग्रामीण भागामध्ये दर हजारी पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण ९५० आहे. तर शहरी भागात दर हजारी पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण ९६२ आहे.