शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मनरेगातून ४८०० विहिरी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 21:34 IST

वाढीव सिंचनासाठी मनरेगातून ४८०० सिंचन विहिरींना अखेर मंजुरी मिळाली आहे. यातून प्रत्येक तालुक्यातील ३०० शेतकऱ्यांना विहीर मिळणार आहे.

ठळक मुद्दे१२६९ गावांचा समावेश : प्रत्येकी अडीच लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढीव सिंचनासाठी मनरेगातून ४८०० सिंचन विहिरींना अखेर मंजुरी मिळाली आहे. यातून प्रत्येक तालुक्यातील ३०० शेतकऱ्यांना विहीर मिळणार आहे.तत्कालीन आघाडी सरकारने प्र्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी ३०० प्रमाणे जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वाढीव ४८०० सिंचन विहिरींची घोषणा केली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून प्रत्यक्षात विहिरी मंजूर झाल्या नव्हत्या. काही शेतकऱ्यांनी प्रकरण न्यायालयात नेले होते. यानंतर न्यायालयाने या वाढीव विहिरींसाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आदेश दिले. त्यात जिल्ह्यातून तब्बल २६ हजार ५१८ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. यातून शुक्रवारी सोडत पद्धतीने चार हजार ८०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या ४८०० सिंचन विहिरींपैकी ३१४ विहिरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार आहे. आठ एकरपर्यंत शेती असलेल्या ७५६ मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळणार आहे. आठ ते १६ एकरपर्यंत शेती असलेल्या २०४ शेतकऱ्यांना विहिरी मिळणार आहे. याशिवाय खुल्या प्रवर्गातील आठ एकरपर्यंत शेती असलेल्या १५१२, तर १६ एकरपर्यंत शेती असलेलया ४८० शेतकरी लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील १२६९ गावांतील हे सर्व लाभार्थी आहेत. या विहीर बांधकामासाठी प्रत्येकी अडीच लाखांचा निधी मिळणार आहे. सिंचनातून समृद्धीकडे जाण्याचा हा प्रयत्न असून शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.उन्हाळ्यापूर्वी खोदकामाची अपेक्षाया विहिरी अखेर मंजूर झाल्या. संबंधित शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष खोदकामाची प्रतीक्षा आहे. यावर्षी अल्प पावसामुळे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यामुळे त्यांना किमान पुढील वर्षी खरिपातील पिकांच्या ओलितासाठी विहिरींची तातडीने गरज आहे. त्यासाठी उन्हाळ्यापूर्वी विहिरींचे खोदकाम पूर्ण पूर्ण होणे गरजेचे आहे.