शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मनरेगातून ४८०० विहिरी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 21:34 IST

वाढीव सिंचनासाठी मनरेगातून ४८०० सिंचन विहिरींना अखेर मंजुरी मिळाली आहे. यातून प्रत्येक तालुक्यातील ३०० शेतकऱ्यांना विहीर मिळणार आहे.

ठळक मुद्दे१२६९ गावांचा समावेश : प्रत्येकी अडीच लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढीव सिंचनासाठी मनरेगातून ४८०० सिंचन विहिरींना अखेर मंजुरी मिळाली आहे. यातून प्रत्येक तालुक्यातील ३०० शेतकऱ्यांना विहीर मिळणार आहे.तत्कालीन आघाडी सरकारने प्र्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी ३०० प्रमाणे जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वाढीव ४८०० सिंचन विहिरींची घोषणा केली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून प्रत्यक्षात विहिरी मंजूर झाल्या नव्हत्या. काही शेतकऱ्यांनी प्रकरण न्यायालयात नेले होते. यानंतर न्यायालयाने या वाढीव विहिरींसाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आदेश दिले. त्यात जिल्ह्यातून तब्बल २६ हजार ५१८ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. यातून शुक्रवारी सोडत पद्धतीने चार हजार ८०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या ४८०० सिंचन विहिरींपैकी ३१४ विहिरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार आहे. आठ एकरपर्यंत शेती असलेल्या ७५६ मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळणार आहे. आठ ते १६ एकरपर्यंत शेती असलेल्या २०४ शेतकऱ्यांना विहिरी मिळणार आहे. याशिवाय खुल्या प्रवर्गातील आठ एकरपर्यंत शेती असलेल्या १५१२, तर १६ एकरपर्यंत शेती असलेलया ४८० शेतकरी लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील १२६९ गावांतील हे सर्व लाभार्थी आहेत. या विहीर बांधकामासाठी प्रत्येकी अडीच लाखांचा निधी मिळणार आहे. सिंचनातून समृद्धीकडे जाण्याचा हा प्रयत्न असून शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.उन्हाळ्यापूर्वी खोदकामाची अपेक्षाया विहिरी अखेर मंजूर झाल्या. संबंधित शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष खोदकामाची प्रतीक्षा आहे. यावर्षी अल्प पावसामुळे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यामुळे त्यांना किमान पुढील वर्षी खरिपातील पिकांच्या ओलितासाठी विहिरींची तातडीने गरज आहे. त्यासाठी उन्हाळ्यापूर्वी विहिरींचे खोदकाम पूर्ण पूर्ण होणे गरजेचे आहे.